- कांता हाबळे, नेरळनेरळ-माथेरान मिनीट्रेनचे प्रवासी डब्बे ८ मे, २०१६ रोजी नॅरोगेज रुळावरून घसरल्यानंतर रेल्वेने मिनीट्रेनची वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. सहा महिने उलटूनही ही वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता, मिनीट्रेन तोट्यात असल्याने कारण देण्यात येत आहे. मात्र, दरवर्षी जवळपास अडीच लाख प्रवाशांची वाहतूक करणारी मिनीट्रेन तोट्यात कशी, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. ही सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या चार वर्षांत मिनीट्रेन आणि शटल सेवेतील प्रवाशांची संख्या अडीच-तीन लाखांवर पोहोचली आहे. नेरळ-माथेरान मार्गावरील प्रवासी वाहतूक यातून मिळालेले उत्पन्न दरवर्षी जवळपास सव्वादोन ते अडीच कोटींच्या घरात आहे. मात्र, तरीही उत्पन्न न देणारा मार्ग म्हणून मिनीट्रेन बंद करण्यात आल्याचे बोलले जात आहे. नेरळ-माथेरान या २० कि.मी.च्या घाटमार्गावर मिनीट्रेन चालवली जाते. १९०७ मध्ये ब्रिटिश राजवट असताना सुरू झालेली मिनीट्रेन जागतिक वारसासाठी प्रस्तावित आहे. जागोजागी वळणे, अरुंद मार्गाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून पर्यटक आणि अभ्यासक याठिकाणी नेहमीच येत असतात. मिनिट्रेन सुरू झाल्यापासून पावसाळ्यात ती बंद ठेवण्याचा पायंडा आजतागायत कायम आहे. २९ सप्टेंबर, २०१२मध्ये मिनीट्रेनची शटल सेवा सुरू केल्यानंतर पावसाळ्यात अमन लॉज -माथेरान या शटल सेवेला पर्यटक तसेच स्थानिक प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. माथेरानमधील विद्यार्थी, तसेच दैनंदिन नोकरदार वर्ग, स्थानिकांनाही शटल सेवा सोयीची पडते. नॅरोगेज रु ळावरून प्रवासी डब्बे घसरल्याने ९ मे, २०१६ पासून हा मार्ग बंद करण्यात आला. मात्र, आता मार्ग तोट्यात असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार करता, मिनीट्रेनमधून दरवर्षी साधारण २ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर अमन लॉज-माथेरान शटल सेवेतून एक ते सव्वालाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यांच्या प्रवासातून साधारण अडीच कोटीचे उत्पन्न दरवर्षी मिळत आहे. त्यामुळे २० कि.मी. लांबीचा हा नॅरोगेज मार्ग तोट्यात कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मालवाहू गाडी सुरू केल्यास उत्पन्नात वाढ२९ सप्टेंबर, २०१२मध्ये सुरू करण्यात आलेल्या नेरळ-अमन लॉज शटल सेवेचा फायदा दरवर्षी साधारण लाखाहून अधिक प्रवाशांनी घेतला आहे. माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठिकाणी जाण्यास सर्व वाहनांना बंदी आहे, त्यामुळे मालवाहू गाडी सुरू केल्यास त्याचा परिणाम रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी होऊ शकतो.सहा महिन्यापासून मिनिट्रेन बंद आहे. यामुळे पर्यटनावर परिणाम परिणाम झाला आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये वाढणारा पर्यटकांचा ओघ कमी झाल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पर्यटनक्षेत्र आणि पर्यावरण दृष्ट्या संरक्षित असल्याने माथेरानमध्ये रिक्षा टॅक्सी आदी वाहनांना बंदी आहे. त्यामुळे पर्यटकांना मिनिट्रेन, शटलाच आधार वाटतो. माथेरान आणि मिनीट्रेनचे १०० वर्षांपासून नाते निर्माण झाले आहे. पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने मिनीट्रेन माथेरानचा अविभाज्य भाग बनली आहे. मागील काही वर्षांत आणि प्रामुख्याने शटल सेवा सुरू झाल्यापासून पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तरी नेरळ-माथेरान मार्ग तोट्यात आहे, हे रेल्वेचे म्हणणे पटण्यासारखे नाही. - वंदना शिंदे, नगराध्यक्षा, माथेरानमिनीट्रेनचा मार्ग तोट्यात आहे म्हणून बंद केल्याचे बोलले जात असले तरी ते खरे कारण नाही. प्रवासी डब्बे रु ळावरून घसरल्याने वाहतूक बंद आहे. मिनीट्रेन कायमची बंद केली नसून नॅरोगेज मार्गावरील सर्व कामे पूर्ण करण्यात आल्यानंतर मिनीट्रेन सुरू करण्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील.- वाय. के. सिंग, रेल्वे वाहतूक नियंत्रक, कल्याण विभाग
मिनीट्रेन फायद्यात की तोट्यात ?
By admin | Updated: November 13, 2016 01:22 IST