शहरं
Join us  
Trending Stories
1
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
4
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
5
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
6
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
7
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
8
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
9
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
10
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
11
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
13
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
14
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
15
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
16
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
17
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
18
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
19
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
20
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

गाळ काढण्यासाठी कोट्यवधींच्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 05:06 IST

मांडवा बंदरात १६ कोटी ५० लाख खर्च : एमएमबीने पुन्हा काढली निविदा

आविष्कार देसाईअलिबाग : महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड (एमएमबी)ने मांडवा येथे गाळ काढण्याच्या कामासाठी पाच महिन्यांत खासगी यंत्रणेवर तब्बल १६ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च केला. यावरून वाद निर्माण झाला असतानाच, आता एमएमबीने पुन्हा गाळ काढण्याबाबत चार कोटी ५० लाख रुपयांची निविदा काढली आहे. त्यानुसार एक लाख २५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात येणार आहे. सातत्याने गाळ काढण्यासाठीच कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्याने याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

पाच महिन्यांपूर्वी मांडवा बंदरातील गाळ काढण्यासाठी एमएमबीने १६ कोटी ५० लाख रुपये खर्च केले आहेत. मांडवा बंदरातून काढलेला गाळ, त्यावर देखरेखीसाठी नेमलेले व्हेसल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस) लाँगबुकमधील नोंदी, त्यांची छायाचित्रे, गाळ कुठे टाकला, गाळाचे वजन कोणत्या प्रकारे केले, यासर्व बाबी माहिती अधिकारात उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. निविदेची चौकशी करून सरकारचे झालेले साडेसोळा कोटींचे नुकसान संबंधितांकडून वसूल करून फसवणूक केल्याबद्दल त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार अलिबाग येथील आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी राज्य सरकारच्या गृहविभागाकडे केली आहे. साडेसोळा कोटी रुपयांच्या गाळ उपसण्याच्या कामाबाबत तक्रारी असतानाच एमएमबीने पुन्हा साडेचार कोटी रुपयांचेगाळ काढण्याचे नवीन टेंडर काढल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य सरकारच्या ४ जानेवारी २०१८ अन्वये मांडवा ते भाऊचा धक्का या दरम्यानच्या रो-रो सेवेकरिता नौकानयन मार्गातील गाळ काढण्याच्या कामाकरिता सुमारे १८ कोटी १२ लाख रुपये किमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानुसार महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून मे. रॉक अ‍ॅण्ड रिफ ड्रेझिंग प्रा. लि. या कंपनीस काम देण्यात आले होते. या कामासाठी एकूण १६ कोटी ५४ लाख २ हजार ५१० इतके बिल कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहे. या खर्चाबाबत सावंत यांनी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडे माहिती अधिकाराखाली अर्ज करून महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डामार्फत रॉक अ‍ॅण्ड रिफ ड्रेझिंग प्रा. लि. कंपनीला गाळ काढण्यासाठी बंधकारक असलेल्या विहित अटी व शर्ती यांची माहिती मागितली होती.याशिवाय कामावर निरीक्षण ठेवणाऱ्या अधिकाºयाने हे काम प्रमाणित केल्याबाबतचे प्रमाणपत्र, गाळ काढण्यासाठी कंपनीकडून वापरण्यात आलेल्या बोटींची माहिती, गाळ कोठे टाकला, कंपनीला अदा करण्यात आलेल्या बिलाची प्रत, गाळ काढण्याचे काम केलेल्या बोटींना ट्रॅकिंग सिस्टीमनुसार बोटींनी किती कालावधीमध्ये गाळ काढण्याचे काम केले, याबाबतची माहिती मागितली होती.महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डामार्फत सावंत यांना जी माहिती पुरविण्यात आली ती माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टकडून प्रमाणित करण्यात आलेली नाही.व्हीटीएस यंत्रणेचा उल्लेख नाहीच्महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून मांडवा येथील गाळ उपसण्याच्या कामाचे २०१७-१८ मध्ये साडेसोळा कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले. त्यामध्ये व्हेसल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस)नुसार यंत्रणेला माहिती पुरविण्याच्या अटीचा उल्लेख नाही.च्याउलट २०१८-१९ साठी जे साडेचार कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये व्हेसल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस)नुसार यंत्रणेला माहिती पुरविण्याच्या अटीचा उल्लेख आहे. १६ कोटी रुपयांच्या निविदेमध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परवानगीमधील व्हेसल ट्रॅकिंग सिस्टीमनुसार यंत्रणेचा उल्लेख नसणे ही बाब संशयास्पद असल्याचे दिसून येते.च्१६ कोटी रुपयांच्या गाळाचा उपसा करून कंपनीच्या जहाजांनी तो डम्पिंग ग्राउंडवर टाकला आहे किंवा नाही, हे तपासणे त्यामुळे शक्य झालेले नाही.च्मेरीटाइम बोर्डाने संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली नसल्याने कंत्राटदाराने किती गाळ उपसला व किती टाकला, याबाबत साशंकता निर्माण होते, असे सावंत यांनी सांगितले.च्दरम्यान, एमएमबीचे कार्यकारी अभियंता देवरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड