शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित क्षय रुग्णांमुळे धोका कायम - सुरेश देवकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 02:52 IST

रायगड जिल्ह्यामध्ये क्षयरोगाने मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या तीन टक्क्यांनी घटली असली तरी, उत्तर रायगडमध्ये स्थलांतरित क्षय रुग्णांमुळे रायगड जिल्ह्यावरील धोका हा कायम आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये क्षयरोगाने मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या तीन टक्क्यांनी घटली असली तरी, उत्तर रायगडमध्ये स्थलांतरित क्षय रुग्णांमुळे रायगड जिल्ह्यावरील धोका हा कायम आहे. रुग्णांना शोधून रुग्ण बरा होईपर्यंत उपचार करणे हा त्यावरील एकमेव उपाय आहे. तसे झाले तरच क्षयमुक्त रायगडचे स्वप्न पूर्ण होईल, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर यांनी येथील पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.४ मार्च रोजी जगभरामध्ये जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जात आहे. ‘क्षयमुक्त जगासाठी शिलेदार होऊ या सारे मिळून नवा इतिहास घडवू या’ हे घोषवाक्य घेऊन १७ मार्चपासून क्षयरोग जनजागर सप्ताह जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. जिल्हा क्षयरोगमुक्त राहण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने २४ मार्च या जागतिक क्षयरोग दिनी मॅरेथान रॅली, विविध स्पर्धा यासह अन्य कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. देवकर यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार एक लाख लोकसंख्येमागे १९४ व्यक्तींना क्षयरोग होतो. त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये एक लाख लोकसंख्येमागे १४३ क्षयरोगाचे रुग्ण सापडतात. १९४ मधील ८५ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे, तर रायगड जिल्ह्यामध्येही ते १४३ ला ८४ टक्के आहे. त्यामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण हे चार टक्क्यावर आले असले, तरी मृत्यूचे प्रमाण शून्य टक्क्यापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.९९ डॉट हे वेब पोर्टल सरकारने नुकतेच सुरु केले आहे. त्यामध्ये क्षयरोग झालेल्या नवीन रुग्णांची संख्या सुमारे ७५० आहे. त्या रुग्णांचे फोन नंबर त्याची माहिती या पोर्टलवर अपलोड केलेली आहे. त्याला उपचारासाठी ज्या गोळ्या दिल्या जातात त्या गोळ््या ठरावीक पध्दतीने खाल्ल्यानंतर रुग्णांनी टोल फ्री क्रमांकावर फोन करायचा आहे. त्याने औषध घेतल्याची नोंद त्या पोर्टलवर तातडीने होते. त्याचा डेटा कोठूनही पाहता येऊ शकतो. हे पोर्टल अतिशय चांगले असल्याचेही डॉ. देवकर यांनी सांगितले.क्षयरोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण हे सात टक्के होते त्यामध्ये तीन टक्क्यांनी घट होऊन तो आकडा चार टक्क्यांवर आला आहे. परंतु पनवेल, उरण, कर्जत या तालुक्यांमध्ये विकासकामे झपाट्याने होत आहेत. त्यामुळे तेथे विविध कामानिमित्त येणाºयांची संख्या प्रचंड आहे. येथील स्थलांतरित रुग्णांची संख्या ही जिल्ह्यातील नागरिकांसाठी धोकादायक असल्याकडेही डॉ. देवकर यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Raigadरायगड