शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

भूस्खलनाचा धोका जाणवल्यास जिल्ह्यातील गावांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 04:13 IST

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने रायगड जिल्ह्यातील १०३ भूस्खलनग्रस्त गावांपैकी २० अतितीव्र धोका असलेल्या गावांत मुसळधार पावसामुळे सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, याची पाहणी केली आहे.

- जयंत धुळपअलिबाग -  भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने रायगड जिल्ह्यातील १०३ भूस्खलनग्रस्त गावांपैकी २० अतितीव्र धोका असलेल्या गावांत मुसळधार पावसामुळे सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, याची पाहणी केली आहे. भूस्खलनाचा धोका जाणवल्यास गामस्थांचे स्थलांतरण करण्याकरिता रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आदेश दिले आहे. त्यानुसार २० अतितीव्र भूस्खलन धोका असलेल्या गावांत उप विभागीय महसूल अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी अशा पथकांनी पाहणी केली आहे.माती, गावांतील उतार, डोंगर कड्यांची भौगोलिक रचना, जलस्रोत, माती-जल परिणाम आदी वैज्ञानिक निकषांवर भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. त्या निकषांमध्ये अतिवृष्टीमुळे कोणत्याही गावांस सद्यस्थितीत धोकादायक परिस्थिती निर्माण नसल्याचा निष्कर्ष पाहणी पथकाने केल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनअधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.जिल्ह्यातील १०३ भूस्खलन धोकाग्रस्त गावांमध्ये ५०० मि.मी. वा त्यापेक्षा अधिक सतत अतिवृष्टी झाल्यास भूस्खलनाचा धोका उद्भवू शकतो, असे अनुमान भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने नमूद केले आहे. परिणामी, या गावांतील पर्जन्यमानावर सतत लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.दहा गावांना मिळून एक पर्जन्यमापक यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यांच्या नोंदी सातत्याने घेण्यात येत आहेत.यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंतच्या काळात या १०३ भूस्खलन धोकाग्रस्त गावांपैकी एकाही गावात ५०० मि.मी.पेक्षा अधिक पर्जन्यमान झालेले नसल्याने धोका उद्भवलेला नाही; परंतु आगामी काळात ५०० मि.मी.पेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्यास संभाव्य धोक्यातून बचावासाठी तात्पुरते स्थलांतर करण्याचा पर्याय ग्रामस्थांनी मान्य केला आहे.एक लाख ग्रामस्थांच्या स्थलांतराची व्यवस्थातात्पुरत्या स्थलांतराकरिता आवश्यक सुरक्षित इमारतीची व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून सज्ज ठेवण्यात आली आहे. या १०३ संभाव्य भूस्खलन धोकाग्रस्त गावांची एकूण लोकसंख्या सुमारे एक लाख असल्याचे पाठक यांनी अखेरीस सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड