शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

एमआयडीसी कार्यालयासमोर भातशेतीतला चिखल टाकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:55 IST

संरक्षक खारबांध फुटीच्या गंभीर समस्येकडे लक्ष घालून गावातील मानवी वसाहतींना धोका पोचण्याअगोदर उपाययोजनेकरिता संयुक्तिक बैठकीचे आयोजन करावे, अन्यथा शेतकरी जनतेला एमआयडीसीच्या कार्यालयासमोर भातशेतीतला चिखल आणून टाकण्यावाचून कोणताही पर्याय नाही

- जयंत धुळपअलिबाग : संरक्षक खारबांध फुटीच्या गंभीर समस्येकडे लक्ष घालून गावातील मानवी वसाहतींना धोका पोचण्याअगोदर उपाययोजनेकरिता संयुक्तिक बैठकीचे आयोजन करावे, अन्यथा शेतकरी जनतेला एमआयडीसीच्या कार्यालयासमोर भातशेतीतला चिखल आणून टाकण्यावाचून कोणताही पर्याय नाही,असा लेखी इशारा नवीन पनवेलमधील खांदा वसाहतीतील महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयातील प्रादेशिक अधिकारी आर.के. ठोंबरे यांना देण्यात आला. याबाबतची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.अलिबाग तालुक्यातील शहापूर, धेरंड या गावांच्या हद्दीतील महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) संपादित केलेल्या; परंतु प्रकल्पाखाली आणल्या नसलेल्या जमिनींच्या संरक्षणार्थ असलेल्या खारभूमी बंधाºयाची निगा राखण्याचे काम एमआयडीसीने करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित संपादन क्षेत्राच्या संपादित जमिनीला पुनर्वसन कायदा व पुनर्वसन करार लागू असल्याने व अपेक्षित रोजगार मिळाला नसल्याने शेतकºयांच्या ताब्यात असलेल्या भातशेतीमध्ये समुद्र उधाणाचे खारे पाणी घुसून जे नुकसान झाले आहे त्याची नुकसानभरपाई एमआयडीसीकडून मिळावी,अशी मागणी शेतकºयांनी संघटनेच्या माध्यमातून केली आहे.धेरंड-शहापूर औद्योगिक क्षेत्राकरिता जरी एम.आय.डी.सी. कायद्यान्वये जमिनी संपादित केल्या असल्या तरी तेथे गेली पाच वर्षे एमआयडीसी कोणताही प्रकल्प आणू शकलेली नाहीत. तेथे प्रकल्प होऊ शकत नाही याची पूर्वकल्पना व जाणीव असताना देखील एमआयडीसीने बेकायदा भूसंपादन केले आहे. शेतकरी ‘ना नोकरी, ना शेती’ अशा अवस्थेमध्ये जगू शकत नाही, हे आपणास देखील माहीत आहे. त्यामुळे शेतकºयाने उपजीविकेसाठी शेती करणे चालू ठेवले आहे. संपादित जमिनीच्या सातबारा सदरात एमआयडीसी मालक असल्याने त्या जमिनीशी निगडित असलेले संरक्षित बंधारे,त्यांची निगा, दुरुस्ती व नूतनीकरण याची संपूर्ण जबाबदारी एमआयडीसीचीच असल्याचे या लेखी इशाºयात लक्षात आणून देण्यात आले आहे.संयुक्त बैठकीच्या मागणीकडे दुर्लक्ष१शहापूर परिसरात धरमतर खाडीच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन्ही बाजूला संरक्षित बंधाºयांना खांडी (बंधारे फुटणे) जाऊ न पिकत्या भातशेतीमध्ये, तसेच तयार पिकात खारे पाणी घुसून शेतकºयाचे अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.२ही बाब सातत्याने होणार असल्याने यावर सहमतीने मार्ग काढण्यासाठी सप्टेंबर २०१७पासून संघटना आपणाकडे पुनर्वसन विभाग, खारभूमी विभाग व श्रमिक मुक्ती दल यांच्यासहित संयुक्त बैठकीची मागणी केली आहे. त्याचबरोबर संपादित क्षेत्रातील भागास भेट देण्याचीदेखील विनंती केली होती.३परंतु आपण यामध्ये कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नसल्याचेही या इशारापत्रात नमूद करण्यात आले असून, यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडावी इतका हा ज्वलंत प्रश्न आहे. यामध्ये लक्ष घालून मानवी वसाहतींना धोका पोहोचण्याअगोदर संयुक्त बैठकीचे आयोजन करावे, अन्यथा ‘चिखल टाका’आंदोलनाशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे इशारापत्रांत नमूद करण्यात आले आहे.४एमआयडीसीला पाठवण्यात आलेल्या या इशारापत्रांच्या प्रती रायगड जिल्हाधिकाºयांसह पनवेल व पोयनाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनादेखील पाठविण्यात आल्या आहे.

टॅग्स :Raigadरायगड