शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
7
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
8
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
9
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
10
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
11
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
12
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
13
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
14
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
15
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
16
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
17
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
18
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
19
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
20
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळा ग्रामपंचायतीत निवडणुकीचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 02:27 IST

तालुक्यातील एकूण ४० ग्रामपंचायत निवडणुकांपैकी बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तारीख निश्चित झाल्याने तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे.

म्हसळा : तालुक्यातील एकूण ४० ग्रामपंचायत निवडणुकांपैकी बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तारीख निश्चित झाल्याने तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे. ग्रामपंचायतीतील अस्तित्वासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणी, प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.तालुक्यात सध्या राष्ट्रवादीच प्रबळ असून गेल्या काही महिन्यांपासून परिसरात सभा घेण्यात येत आहेत. आमदार सुनील तटकरे, अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे व अन्य कार्यकर्ते यांनी आपली ताकद पणाला लावली आहे, तर भाजपानेही पालकमंत्री यांच्या दौऱ्याने विकासकामाला वेग आणला आहे. ग्रामीण भागात भाजपाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रस्ते, पाणी, वीज, मूलभूत सुविधा याकडे विशेष लक्ष दिले आहे. रायगड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकास अजेंडा घेऊन या निवडणुका लढवणार असल्याचे समजते तर शिवसेना व काँग्रेस यांची युती असल्याने त्यांची ताकद देखील पणाला लागणार आहे. गतवेळी शिवसेनेला जास्त सरपंच प्राप्त झाले होते, तर ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादीला प्राप्त झाले होते.मे महिन्यात होणाºया बारा ग्रामपंचायतींमध्ये वरवठणे, चिखलप, भेकºयाचा कोंड, कुडगाव, कोलवट, ठाकरोली, पांगलोळी, नेवरूळ, घूम, सालविंडे, जांभूळ, आडी, महाड खाडी तर तुरु ंबाडी, खरसई, देवघर रेवली लिपनी वावे, फलसप या ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका होत असून राजकीय पक्षांमध्ये चुरस वाढत आहे. सध्या वरवठणे, भेकाºयाचा कोंड, कोळवट, ठाकरोली, आडी महाड खाडी या ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे. तर चिखलप, कुडगाव, पांगलोळी, नेवरूळ, घूम, साळविंडे या ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. तर तालुक्यातील एकमेव जांभूळ ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आहे. पांगलोळी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता असून भविष्यात ही ग्रामपंचायत हिसकावून घेतली जाईल, असे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. मुईज शेख यांचे स्वप्न आहे.आडी महाड खाडी ही ग्रामपंचायत गेली अनेक वर्षे शिवसेनेकडे असून इथे शिवसेनेत नाराजी पसरल्यामुळे याचा फायदा विरोधी पक्षाला होण्याची शक्यता आहे. शिवसेनेमध्ये अनेक वर्षे काम केलेले माजी तालुका प्रमुख समीर बनकर व विरोधी पक्षनेते बाळशेठ करडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे नक्कीच शिवसेना पक्षाला आपली सारी ताकद पणाला लावावी लागणार आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अली कौचाली यांना देखील आपली ग्रामपंचायत सहीसलामत ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तालुक्यात सध्या शिवसेना-काँग्रेस युती असल्याने पांगलोळी ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. दुसरीकडे जांभूळ ग्रामपंचायत गेली २५ वर्षे शेकापकडे आहे. त्यामुळे जांभूळ ग्रामपंचायत यावेळी आपल्याकडे ठेवण्यात कोण यशस्वी होते, याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.