शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

म्हसळा ग्रामपंचायतीत निवडणुकीचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 02:27 IST

तालुक्यातील एकूण ४० ग्रामपंचायत निवडणुकांपैकी बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तारीख निश्चित झाल्याने तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे.

म्हसळा : तालुक्यातील एकूण ४० ग्रामपंचायत निवडणुकांपैकी बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तारीख निश्चित झाल्याने तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे. ग्रामपंचायतीतील अस्तित्वासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणी, प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.तालुक्यात सध्या राष्ट्रवादीच प्रबळ असून गेल्या काही महिन्यांपासून परिसरात सभा घेण्यात येत आहेत. आमदार सुनील तटकरे, अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे व अन्य कार्यकर्ते यांनी आपली ताकद पणाला लावली आहे, तर भाजपानेही पालकमंत्री यांच्या दौऱ्याने विकासकामाला वेग आणला आहे. ग्रामीण भागात भाजपाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रस्ते, पाणी, वीज, मूलभूत सुविधा याकडे विशेष लक्ष दिले आहे. रायगड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकास अजेंडा घेऊन या निवडणुका लढवणार असल्याचे समजते तर शिवसेना व काँग्रेस यांची युती असल्याने त्यांची ताकद देखील पणाला लागणार आहे. गतवेळी शिवसेनेला जास्त सरपंच प्राप्त झाले होते, तर ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादीला प्राप्त झाले होते.मे महिन्यात होणाºया बारा ग्रामपंचायतींमध्ये वरवठणे, चिखलप, भेकºयाचा कोंड, कुडगाव, कोलवट, ठाकरोली, पांगलोळी, नेवरूळ, घूम, सालविंडे, जांभूळ, आडी, महाड खाडी तर तुरु ंबाडी, खरसई, देवघर रेवली लिपनी वावे, फलसप या ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका होत असून राजकीय पक्षांमध्ये चुरस वाढत आहे. सध्या वरवठणे, भेकाºयाचा कोंड, कोळवट, ठाकरोली, आडी महाड खाडी या ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे. तर चिखलप, कुडगाव, पांगलोळी, नेवरूळ, घूम, साळविंडे या ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. तर तालुक्यातील एकमेव जांभूळ ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आहे. पांगलोळी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता असून भविष्यात ही ग्रामपंचायत हिसकावून घेतली जाईल, असे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. मुईज शेख यांचे स्वप्न आहे.आडी महाड खाडी ही ग्रामपंचायत गेली अनेक वर्षे शिवसेनेकडे असून इथे शिवसेनेत नाराजी पसरल्यामुळे याचा फायदा विरोधी पक्षाला होण्याची शक्यता आहे. शिवसेनेमध्ये अनेक वर्षे काम केलेले माजी तालुका प्रमुख समीर बनकर व विरोधी पक्षनेते बाळशेठ करडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे नक्कीच शिवसेना पक्षाला आपली सारी ताकद पणाला लावावी लागणार आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अली कौचाली यांना देखील आपली ग्रामपंचायत सहीसलामत ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तालुक्यात सध्या शिवसेना-काँग्रेस युती असल्याने पांगलोळी ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. दुसरीकडे जांभूळ ग्रामपंचायत गेली २५ वर्षे शेकापकडे आहे. त्यामुळे जांभूळ ग्रामपंचायत यावेळी आपल्याकडे ठेवण्यात कोण यशस्वी होते, याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.