शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

म्हसळा ग्रामपंचायतीत निवडणुकीचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 02:27 IST

तालुक्यातील एकूण ४० ग्रामपंचायत निवडणुकांपैकी बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तारीख निश्चित झाल्याने तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे.

म्हसळा : तालुक्यातील एकूण ४० ग्रामपंचायत निवडणुकांपैकी बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तारीख निश्चित झाल्याने तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे. ग्रामपंचायतीतील अस्तित्वासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणी, प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.तालुक्यात सध्या राष्ट्रवादीच प्रबळ असून गेल्या काही महिन्यांपासून परिसरात सभा घेण्यात येत आहेत. आमदार सुनील तटकरे, अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे व अन्य कार्यकर्ते यांनी आपली ताकद पणाला लावली आहे, तर भाजपानेही पालकमंत्री यांच्या दौऱ्याने विकासकामाला वेग आणला आहे. ग्रामीण भागात भाजपाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रस्ते, पाणी, वीज, मूलभूत सुविधा याकडे विशेष लक्ष दिले आहे. रायगड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकास अजेंडा घेऊन या निवडणुका लढवणार असल्याचे समजते तर शिवसेना व काँग्रेस यांची युती असल्याने त्यांची ताकद देखील पणाला लागणार आहे. गतवेळी शिवसेनेला जास्त सरपंच प्राप्त झाले होते, तर ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादीला प्राप्त झाले होते.मे महिन्यात होणाºया बारा ग्रामपंचायतींमध्ये वरवठणे, चिखलप, भेकºयाचा कोंड, कुडगाव, कोलवट, ठाकरोली, पांगलोळी, नेवरूळ, घूम, सालविंडे, जांभूळ, आडी, महाड खाडी तर तुरु ंबाडी, खरसई, देवघर रेवली लिपनी वावे, फलसप या ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका होत असून राजकीय पक्षांमध्ये चुरस वाढत आहे. सध्या वरवठणे, भेकाºयाचा कोंड, कोळवट, ठाकरोली, आडी महाड खाडी या ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे. तर चिखलप, कुडगाव, पांगलोळी, नेवरूळ, घूम, साळविंडे या ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. तर तालुक्यातील एकमेव जांभूळ ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आहे. पांगलोळी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता असून भविष्यात ही ग्रामपंचायत हिसकावून घेतली जाईल, असे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. मुईज शेख यांचे स्वप्न आहे.आडी महाड खाडी ही ग्रामपंचायत गेली अनेक वर्षे शिवसेनेकडे असून इथे शिवसेनेत नाराजी पसरल्यामुळे याचा फायदा विरोधी पक्षाला होण्याची शक्यता आहे. शिवसेनेमध्ये अनेक वर्षे काम केलेले माजी तालुका प्रमुख समीर बनकर व विरोधी पक्षनेते बाळशेठ करडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे नक्कीच शिवसेना पक्षाला आपली सारी ताकद पणाला लावावी लागणार आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अली कौचाली यांना देखील आपली ग्रामपंचायत सहीसलामत ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तालुक्यात सध्या शिवसेना-काँग्रेस युती असल्याने पांगलोळी ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. दुसरीकडे जांभूळ ग्रामपंचायत गेली २५ वर्षे शेकापकडे आहे. त्यामुळे जांभूळ ग्रामपंचायत यावेळी आपल्याकडे ठेवण्यात कोण यशस्वी होते, याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.