शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

म्हसळ्याला अवकाळी पावसाने झोडपले

By admin | Updated: May 31, 2017 06:15 IST

शहरासह संपूर्ण तालुक्यात मंगळवारी अवकाळी पाऊस पडला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसळा : शहरासह संपूर्ण तालुक्यात मंगळवारी अवकाळी पाऊस पडला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र अचानक आलेल्या पावसाने एसटी पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाल्याचेही चित्र म्हसळा स्थानकावर पाहावयास मिळाले. मंगळवारी शहरामध्ये वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली.३४ लाखांचे सफाई कंत्राट संपल्याने म्हसळा नगरपंचायतीमार्फत यंदा गटारांची सफाई करण्यात आली नाही. यामुळे शहरातील बहुतांश गटारे तुंबलेल्या अवस्थेत दिसत होती. या गटारांमधून वाहणारे पाणी शहरातून जाणाऱ्या म्हसळा-बोर्ली या राज्यमार्गावर आल्याने काहीकाळ राज्यमार्ग पाण्याखाली गेले होते. पावसाबरोबर वादळी वारा आल्याने शहरातील डॉ.चोचे यांच्या इमारतीवरील भलामोठा पत्र्याचा शेड रहदारीच्या रस्त्यावर चाळीस फूट उंचीवरून खाली कोसळला. शेड पडलेल्या ठिकाणी काही काळ लहान मुले खेळत होती. मात्र पाऊस पडण्यास सुरवात झाल्याने ती मुले आपापल्या घरी गेल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या पत्र्याने विद्युत वाहक तारा तुटून नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे बस प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांना भिजलेल्या अवस्थेतच बसमधून प्रवास करावा लागला. नागरिकांनी घरात पाणी घुसू नये म्हणून ताडपत्रीच्या दुकानात गर्दी केली होती. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून छोटी छोटी डबकी तयार झाली होती. अशा रस्त्यावरून चालणे पादचारी आणि वाहनचालकांसाठी कठिण झाले होते. या अवकाळी पावसामुळे छत्री, रेनकोटच्या दुकानामध्ये खरेदीसाठी गर्दी के ली होती.महाडमध्ये जनजीवन विस्कळीतलोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : महाड तालुक्यात मंगळवारी आलेल्या अवकाळी पावसाने साऱ्यांची तारांबळ उडवली. अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे संपूर्ण तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते.मे महिन्यामध्ये तापमानाचा पारा ४३ अंशाच्या वर गेला होता. नागरिक गरमीने हैराण झाले होते. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.ग्रामीण भागात तसेच शहरी भागात ठिकठिकाणी रस्त्यावर तसेच शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. हा पाऊस शेतीला लाभदायक ठरणार आहे. गेल्या महिनाभरात तापलेली जमीन आणि तरवे भाजणीनंतर करण्यात आलेल्या पेरणीला हा पाऊस लाभदायक ठरणार असून पेरे चांगले रुजणार अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पेऱ्याला आवश्यक पाऊस पडल्याने बळीराजा अधिक शेतीच्या कामाला लागला आहे.जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात होते. पावसाच्या बचावासाठी रेनकोट, छत्री खरेदी, तसेच खेड्यापाड्यातील गटार सफाई हे सर्व जूनच्या सुरुवातीला करण्यात येते. अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी डबक्यामध्ये रस्त्यावर पाणी साचले तर मोठ्या प्रमाणात गटारे वाहू लागल्याने सफाई न झालेली गटारे सरळसरळ रस्त्यावरून ओलांडून वाहू लागली. याचा फटका नागरिकांना बसला. शेवटच्या टप्प्यात असताना वातावरणातील उष्णता आणि दमदार पावसामुळे आंबा नाशिवंत होणार आहे. यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.