शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

म्हसळ्याला अवकाळी पावसाने झोडपले

By admin | Updated: May 31, 2017 06:15 IST

शहरासह संपूर्ण तालुक्यात मंगळवारी अवकाळी पाऊस पडला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसळा : शहरासह संपूर्ण तालुक्यात मंगळवारी अवकाळी पाऊस पडला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र अचानक आलेल्या पावसाने एसटी पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाल्याचेही चित्र म्हसळा स्थानकावर पाहावयास मिळाले. मंगळवारी शहरामध्ये वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली.३४ लाखांचे सफाई कंत्राट संपल्याने म्हसळा नगरपंचायतीमार्फत यंदा गटारांची सफाई करण्यात आली नाही. यामुळे शहरातील बहुतांश गटारे तुंबलेल्या अवस्थेत दिसत होती. या गटारांमधून वाहणारे पाणी शहरातून जाणाऱ्या म्हसळा-बोर्ली या राज्यमार्गावर आल्याने काहीकाळ राज्यमार्ग पाण्याखाली गेले होते. पावसाबरोबर वादळी वारा आल्याने शहरातील डॉ.चोचे यांच्या इमारतीवरील भलामोठा पत्र्याचा शेड रहदारीच्या रस्त्यावर चाळीस फूट उंचीवरून खाली कोसळला. शेड पडलेल्या ठिकाणी काही काळ लहान मुले खेळत होती. मात्र पाऊस पडण्यास सुरवात झाल्याने ती मुले आपापल्या घरी गेल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या पत्र्याने विद्युत वाहक तारा तुटून नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे बस प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांना भिजलेल्या अवस्थेतच बसमधून प्रवास करावा लागला. नागरिकांनी घरात पाणी घुसू नये म्हणून ताडपत्रीच्या दुकानात गर्दी केली होती. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून छोटी छोटी डबकी तयार झाली होती. अशा रस्त्यावरून चालणे पादचारी आणि वाहनचालकांसाठी कठिण झाले होते. या अवकाळी पावसामुळे छत्री, रेनकोटच्या दुकानामध्ये खरेदीसाठी गर्दी के ली होती.महाडमध्ये जनजीवन विस्कळीतलोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : महाड तालुक्यात मंगळवारी आलेल्या अवकाळी पावसाने साऱ्यांची तारांबळ उडवली. अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे संपूर्ण तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते.मे महिन्यामध्ये तापमानाचा पारा ४३ अंशाच्या वर गेला होता. नागरिक गरमीने हैराण झाले होते. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.ग्रामीण भागात तसेच शहरी भागात ठिकठिकाणी रस्त्यावर तसेच शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. हा पाऊस शेतीला लाभदायक ठरणार आहे. गेल्या महिनाभरात तापलेली जमीन आणि तरवे भाजणीनंतर करण्यात आलेल्या पेरणीला हा पाऊस लाभदायक ठरणार असून पेरे चांगले रुजणार अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पेऱ्याला आवश्यक पाऊस पडल्याने बळीराजा अधिक शेतीच्या कामाला लागला आहे.जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात होते. पावसाच्या बचावासाठी रेनकोट, छत्री खरेदी, तसेच खेड्यापाड्यातील गटार सफाई हे सर्व जूनच्या सुरुवातीला करण्यात येते. अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी डबक्यामध्ये रस्त्यावर पाणी साचले तर मोठ्या प्रमाणात गटारे वाहू लागल्याने सफाई न झालेली गटारे सरळसरळ रस्त्यावरून ओलांडून वाहू लागली. याचा फटका नागरिकांना बसला. शेवटच्या टप्प्यात असताना वातावरणातील उष्णता आणि दमदार पावसामुळे आंबा नाशिवंत होणार आहे. यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.