शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळ्याला अवकाळी पावसाने झोडपले

By admin | Updated: May 31, 2017 06:15 IST

शहरासह संपूर्ण तालुक्यात मंगळवारी अवकाळी पाऊस पडला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसळा : शहरासह संपूर्ण तालुक्यात मंगळवारी अवकाळी पाऊस पडला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र अचानक आलेल्या पावसाने एसटी पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाल्याचेही चित्र म्हसळा स्थानकावर पाहावयास मिळाले. मंगळवारी शहरामध्ये वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली.३४ लाखांचे सफाई कंत्राट संपल्याने म्हसळा नगरपंचायतीमार्फत यंदा गटारांची सफाई करण्यात आली नाही. यामुळे शहरातील बहुतांश गटारे तुंबलेल्या अवस्थेत दिसत होती. या गटारांमधून वाहणारे पाणी शहरातून जाणाऱ्या म्हसळा-बोर्ली या राज्यमार्गावर आल्याने काहीकाळ राज्यमार्ग पाण्याखाली गेले होते. पावसाबरोबर वादळी वारा आल्याने शहरातील डॉ.चोचे यांच्या इमारतीवरील भलामोठा पत्र्याचा शेड रहदारीच्या रस्त्यावर चाळीस फूट उंचीवरून खाली कोसळला. शेड पडलेल्या ठिकाणी काही काळ लहान मुले खेळत होती. मात्र पाऊस पडण्यास सुरवात झाल्याने ती मुले आपापल्या घरी गेल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या पत्र्याने विद्युत वाहक तारा तुटून नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे बस प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांना भिजलेल्या अवस्थेतच बसमधून प्रवास करावा लागला. नागरिकांनी घरात पाणी घुसू नये म्हणून ताडपत्रीच्या दुकानात गर्दी केली होती. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून छोटी छोटी डबकी तयार झाली होती. अशा रस्त्यावरून चालणे पादचारी आणि वाहनचालकांसाठी कठिण झाले होते. या अवकाळी पावसामुळे छत्री, रेनकोटच्या दुकानामध्ये खरेदीसाठी गर्दी के ली होती.महाडमध्ये जनजीवन विस्कळीतलोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : महाड तालुक्यात मंगळवारी आलेल्या अवकाळी पावसाने साऱ्यांची तारांबळ उडवली. अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे संपूर्ण तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते.मे महिन्यामध्ये तापमानाचा पारा ४३ अंशाच्या वर गेला होता. नागरिक गरमीने हैराण झाले होते. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.ग्रामीण भागात तसेच शहरी भागात ठिकठिकाणी रस्त्यावर तसेच शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. हा पाऊस शेतीला लाभदायक ठरणार आहे. गेल्या महिनाभरात तापलेली जमीन आणि तरवे भाजणीनंतर करण्यात आलेल्या पेरणीला हा पाऊस लाभदायक ठरणार असून पेरे चांगले रुजणार अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पेऱ्याला आवश्यक पाऊस पडल्याने बळीराजा अधिक शेतीच्या कामाला लागला आहे.जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात होते. पावसाच्या बचावासाठी रेनकोट, छत्री खरेदी, तसेच खेड्यापाड्यातील गटार सफाई हे सर्व जूनच्या सुरुवातीला करण्यात येते. अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी डबक्यामध्ये रस्त्यावर पाणी साचले तर मोठ्या प्रमाणात गटारे वाहू लागल्याने सफाई न झालेली गटारे सरळसरळ रस्त्यावरून ओलांडून वाहू लागली. याचा फटका नागरिकांना बसला. शेवटच्या टप्प्यात असताना वातावरणातील उष्णता आणि दमदार पावसामुळे आंबा नाशिवंत होणार आहे. यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.