शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मानसिक आजार वाढतोय; वर्षभरात १०८ जणांना आत्महत्या करावीशी का वाटली..?

By निखिल म्हात्रे | Updated: September 25, 2023 17:00 IST

जिल्हा रुग्णालयाकडून आत्महत्या प्रतिबंध सप्ताहानिमित्त जनजागृती.

अलिबाग :रायगड जिल्ह्यात केवळ नैराश्येपोटी १०८ जणांनी आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. ही बाब अतिशय गंभीर असून लोक आत्महत्या हे शेवटचे पाऊल का उचलत आहेत हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाने जागतिक आत्महत्या प्रतिबंध सप्ताहानिमित्त मानसिक आजार मुक्तीसाठी फलकांद्वारे जनजागृती व व्याख्यानांचे आयोजन केले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत १०८ जणांनी नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ञांमार्फत योग्य उपचार आणि समुपदेशन केले. त्यामुळे त्या १०८ जणांचे प्राण वाचवण्यात त्यांना यश आले. त्यात ४९ पुरुष व ५९ महिलांचा समावेश आहे.

गावागावांत जनजागृतीआत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. १० ते १६ सप्टेंबर या कालावधीत आत्महत्या प्रतिबंध सप्ताह सुरू केला होता. सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यक्रम घेतले. आत्महत्या न करण्याचा संदेश वेगवेगळ्या फलकांमार्फत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकांद्वारे हा संदेश गावागावांत पोहचवण्यासाठी पुढाकार घेतला.

नैराश्या कशामुळेमोबाइलच्या जगतामध्ये नागरिक एकमेकांच्या जवळ आला असला, तरीही संवाद कमी झाला आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे व्यक्त होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे नैराश्यापोटी आत्महत्या करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

१४४१६ नंबर ठरतोय वरदान 

मानसिक आरोग्यसंबंधित मोफत मार्गदर्शन करण्यासाठी १४४१६ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. मानसिक आजाराच्या आहारी जाणाऱ्यांना या क्रमांकामार्फत मार्गदर्शन करून त्यांची आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात ६० जणांचे समुपदेशन करून मानसिक संतुलन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा क्रमांक मानसिक रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.

बदलत्या राहणीमानामुळे मनमोकळेपणाने संवाद थांबले आहे. त्यामुळे मानसिक तणावातून आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नैराश्य हा मानसिक आजार आहे. मनाने खचून न आता प्रत्येकाने संवाद साधला पाहिजे. - डॉ. अर्चना सिंह, मानसोपचार तज्ज्ञ.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग