शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आजार वाढतोय; वर्षभरात १०८ जणांना आत्महत्या करावीशी का वाटली..?

By निखिल म्हात्रे | Updated: September 25, 2023 17:00 IST

जिल्हा रुग्णालयाकडून आत्महत्या प्रतिबंध सप्ताहानिमित्त जनजागृती.

अलिबाग :रायगड जिल्ह्यात केवळ नैराश्येपोटी १०८ जणांनी आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. ही बाब अतिशय गंभीर असून लोक आत्महत्या हे शेवटचे पाऊल का उचलत आहेत हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाने जागतिक आत्महत्या प्रतिबंध सप्ताहानिमित्त मानसिक आजार मुक्तीसाठी फलकांद्वारे जनजागृती व व्याख्यानांचे आयोजन केले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत १०८ जणांनी नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ञांमार्फत योग्य उपचार आणि समुपदेशन केले. त्यामुळे त्या १०८ जणांचे प्राण वाचवण्यात त्यांना यश आले. त्यात ४९ पुरुष व ५९ महिलांचा समावेश आहे.

गावागावांत जनजागृतीआत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. १० ते १६ सप्टेंबर या कालावधीत आत्महत्या प्रतिबंध सप्ताह सुरू केला होता. सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यक्रम घेतले. आत्महत्या न करण्याचा संदेश वेगवेगळ्या फलकांमार्फत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकांद्वारे हा संदेश गावागावांत पोहचवण्यासाठी पुढाकार घेतला.

नैराश्या कशामुळेमोबाइलच्या जगतामध्ये नागरिक एकमेकांच्या जवळ आला असला, तरीही संवाद कमी झाला आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे व्यक्त होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे नैराश्यापोटी आत्महत्या करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

१४४१६ नंबर ठरतोय वरदान 

मानसिक आरोग्यसंबंधित मोफत मार्गदर्शन करण्यासाठी १४४१६ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. मानसिक आजाराच्या आहारी जाणाऱ्यांना या क्रमांकामार्फत मार्गदर्शन करून त्यांची आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात ६० जणांचे समुपदेशन करून मानसिक संतुलन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा क्रमांक मानसिक रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.

बदलत्या राहणीमानामुळे मनमोकळेपणाने संवाद थांबले आहे. त्यामुळे मानसिक तणावातून आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नैराश्य हा मानसिक आजार आहे. मनाने खचून न आता प्रत्येकाने संवाद साधला पाहिजे. - डॉ. अर्चना सिंह, मानसोपचार तज्ज्ञ.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग