शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
6
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
7
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
8
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
9
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
10
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
11
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
12
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
13
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
14
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
15
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
16
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
17
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
18
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
19
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
20
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात

‘त्या’ काळरात्रीच्या आठवणी वर्षानंतर आजही ताज्याच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:32 IST

मंगळवार, २ आॅगस्ट २०१६ आषाढी आमावस्येच्या काळरात्री ११.१५ वाजता, मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री नदीवरील पूल अतिवृष्टीमुळे अचानक कोसळला आणि सर्वत्र हाहाकार माजला.

संदीप जाधव ।महाड : मंगळवार, २ आॅगस्ट २०१६ आषाढी आमावस्येच्या काळरात्री ११.१५ वाजता, मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री नदीवरील पूल अतिवृष्टीमुळे अचानक कोसळला आणि सर्वत्र हाहाकार माजला. कोकणवासीयांनाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्टÑाला हादरवून सोडणाºया या दुर्घटनेमध्ये ४० निरपराध प्रवाशांचे बळी गेले होते. या दुर्घटनेला आज एक वर्ष होत असले, तरी ‘त्या’ काळीरात्रीच्या आठवणी आजही मनात आहेत. या दुर्घटनेत जयगड-मुंबई आणि राजापूर-मुंबई या दोन एसटी बसेस व एक तवेरा जीप अशी तीन वाहने प्रवाशांसह नदीच्या पात्रात वाहून गेली होती. तब्बल १४ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर वाहून गेलेल्या ४० प्रवाशांपैकी २८ प्रवाशांचे मृतदेह व तीन वाहनांचा शोध घेण्यात प्रशासनाला यश आले होते. तत्कालीन प्रांताधिकारी सुषमा सातपुते व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे-पोळ या दोन महिला अधिकाºयांनी अहोरात्र मेहनत घेऊन राबवलेली यंत्रणा शोधमोहीम ही त्या वेळी त्या महिला अधिकाºयांच्या कौतुकास पात्र ठरली होती.या कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी अवघ्या १६५ दिवसांत नवीन पूल उभारण्याची कामगिरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्टÑीय महामार्ग विभागाने केली असली, तरी मृत्यूचा सापळा बनलेल्या या मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांमधील प्रवाशांच्या मृत्यूचे तांडव कधी थांबणार? अशी भीती प्रवाशांच्या मनात अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे.२ आॅगस्टला रात्री दुर्घटना घडल्यानंतर दुसºया दिवशी पहाटेपासून बुडालेल्या प्रवाशांची शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. यासाठी एनडीआरएफच्या ९० जवानांची फौज सलग १४ दिवस शोधकार्यात मग्न होती. दोन हेलिकॉप्टरसह सुमारे १५-२० बोटींच्या साहाय्याने पुलापासून सावित्री खाडीपर्यंत बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू होता. दुर्घटनेपासून शेकडो कि.मी. अंतरावर बेपत्ता प्रवाशांचे मृतदेह नदीच्या किनारी आढळून येत होते. काही मृतदेह तर श्रीवर्धन, हर्णे समुद्रकिनाºयावरही आढळून आले होते. घटनेनंतर १४व्या दिवशी वाहून गेलेल्या तीन वाहनांचा शोध घेण्यात प्रशासनाला यश आल्यानंतर ही शोधमोहीम थांबविण्यात आली होती. दुर्घटनेनंतर प्रशासनासह सेवाभावी संस्था, एमएमए अशा विविध संस्थांचे असंख्य हात मदतकार्यात गुंतले होते. त्या वेळी उभारण्यात आलेल्या मदतकेंद्रात मृत व बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाइकांचा एकच आक्रोश पाहायला मिळत होता. मात्र, त्यांना तितक्याच धैर्याने प्रांताधिकारी सुषमा सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे-पोळ या संतप्त नातेवाइकांच्या आक्रोशाला सामोरे जात, सांत्वन करीत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होत्या.