शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

‘त्या’ काळरात्रीच्या आठवणी वर्षानंतर आजही ताज्याच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:32 IST

मंगळवार, २ आॅगस्ट २०१६ आषाढी आमावस्येच्या काळरात्री ११.१५ वाजता, मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री नदीवरील पूल अतिवृष्टीमुळे अचानक कोसळला आणि सर्वत्र हाहाकार माजला.

संदीप जाधव ।महाड : मंगळवार, २ आॅगस्ट २०१६ आषाढी आमावस्येच्या काळरात्री ११.१५ वाजता, मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री नदीवरील पूल अतिवृष्टीमुळे अचानक कोसळला आणि सर्वत्र हाहाकार माजला. कोकणवासीयांनाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्टÑाला हादरवून सोडणाºया या दुर्घटनेमध्ये ४० निरपराध प्रवाशांचे बळी गेले होते. या दुर्घटनेला आज एक वर्ष होत असले, तरी ‘त्या’ काळीरात्रीच्या आठवणी आजही मनात आहेत. या दुर्घटनेत जयगड-मुंबई आणि राजापूर-मुंबई या दोन एसटी बसेस व एक तवेरा जीप अशी तीन वाहने प्रवाशांसह नदीच्या पात्रात वाहून गेली होती. तब्बल १४ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर वाहून गेलेल्या ४० प्रवाशांपैकी २८ प्रवाशांचे मृतदेह व तीन वाहनांचा शोध घेण्यात प्रशासनाला यश आले होते. तत्कालीन प्रांताधिकारी सुषमा सातपुते व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे-पोळ या दोन महिला अधिकाºयांनी अहोरात्र मेहनत घेऊन राबवलेली यंत्रणा शोधमोहीम ही त्या वेळी त्या महिला अधिकाºयांच्या कौतुकास पात्र ठरली होती.या कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी अवघ्या १६५ दिवसांत नवीन पूल उभारण्याची कामगिरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्टÑीय महामार्ग विभागाने केली असली, तरी मृत्यूचा सापळा बनलेल्या या मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांमधील प्रवाशांच्या मृत्यूचे तांडव कधी थांबणार? अशी भीती प्रवाशांच्या मनात अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे.२ आॅगस्टला रात्री दुर्घटना घडल्यानंतर दुसºया दिवशी पहाटेपासून बुडालेल्या प्रवाशांची शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. यासाठी एनडीआरएफच्या ९० जवानांची फौज सलग १४ दिवस शोधकार्यात मग्न होती. दोन हेलिकॉप्टरसह सुमारे १५-२० बोटींच्या साहाय्याने पुलापासून सावित्री खाडीपर्यंत बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू होता. दुर्घटनेपासून शेकडो कि.मी. अंतरावर बेपत्ता प्रवाशांचे मृतदेह नदीच्या किनारी आढळून येत होते. काही मृतदेह तर श्रीवर्धन, हर्णे समुद्रकिनाºयावरही आढळून आले होते. घटनेनंतर १४व्या दिवशी वाहून गेलेल्या तीन वाहनांचा शोध घेण्यात प्रशासनाला यश आल्यानंतर ही शोधमोहीम थांबविण्यात आली होती. दुर्घटनेनंतर प्रशासनासह सेवाभावी संस्था, एमएमए अशा विविध संस्थांचे असंख्य हात मदतकार्यात गुंतले होते. त्या वेळी उभारण्यात आलेल्या मदतकेंद्रात मृत व बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाइकांचा एकच आक्रोश पाहायला मिळत होता. मात्र, त्यांना तितक्याच धैर्याने प्रांताधिकारी सुषमा सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे-पोळ या संतप्त नातेवाइकांच्या आक्रोशाला सामोरे जात, सांत्वन करीत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होत्या.