शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ काळरात्रीच्या आठवणी वर्षानंतर आजही ताज्याच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:32 IST

मंगळवार, २ आॅगस्ट २०१६ आषाढी आमावस्येच्या काळरात्री ११.१५ वाजता, मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री नदीवरील पूल अतिवृष्टीमुळे अचानक कोसळला आणि सर्वत्र हाहाकार माजला.

संदीप जाधव ।महाड : मंगळवार, २ आॅगस्ट २०१६ आषाढी आमावस्येच्या काळरात्री ११.१५ वाजता, मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री नदीवरील पूल अतिवृष्टीमुळे अचानक कोसळला आणि सर्वत्र हाहाकार माजला. कोकणवासीयांनाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्टÑाला हादरवून सोडणाºया या दुर्घटनेमध्ये ४० निरपराध प्रवाशांचे बळी गेले होते. या दुर्घटनेला आज एक वर्ष होत असले, तरी ‘त्या’ काळीरात्रीच्या आठवणी आजही मनात आहेत. या दुर्घटनेत जयगड-मुंबई आणि राजापूर-मुंबई या दोन एसटी बसेस व एक तवेरा जीप अशी तीन वाहने प्रवाशांसह नदीच्या पात्रात वाहून गेली होती. तब्बल १४ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर वाहून गेलेल्या ४० प्रवाशांपैकी २८ प्रवाशांचे मृतदेह व तीन वाहनांचा शोध घेण्यात प्रशासनाला यश आले होते. तत्कालीन प्रांताधिकारी सुषमा सातपुते व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे-पोळ या दोन महिला अधिकाºयांनी अहोरात्र मेहनत घेऊन राबवलेली यंत्रणा शोधमोहीम ही त्या वेळी त्या महिला अधिकाºयांच्या कौतुकास पात्र ठरली होती.या कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी अवघ्या १६५ दिवसांत नवीन पूल उभारण्याची कामगिरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्टÑीय महामार्ग विभागाने केली असली, तरी मृत्यूचा सापळा बनलेल्या या मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांमधील प्रवाशांच्या मृत्यूचे तांडव कधी थांबणार? अशी भीती प्रवाशांच्या मनात अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे.२ आॅगस्टला रात्री दुर्घटना घडल्यानंतर दुसºया दिवशी पहाटेपासून बुडालेल्या प्रवाशांची शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. यासाठी एनडीआरएफच्या ९० जवानांची फौज सलग १४ दिवस शोधकार्यात मग्न होती. दोन हेलिकॉप्टरसह सुमारे १५-२० बोटींच्या साहाय्याने पुलापासून सावित्री खाडीपर्यंत बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू होता. दुर्घटनेपासून शेकडो कि.मी. अंतरावर बेपत्ता प्रवाशांचे मृतदेह नदीच्या किनारी आढळून येत होते. काही मृतदेह तर श्रीवर्धन, हर्णे समुद्रकिनाºयावरही आढळून आले होते. घटनेनंतर १४व्या दिवशी वाहून गेलेल्या तीन वाहनांचा शोध घेण्यात प्रशासनाला यश आल्यानंतर ही शोधमोहीम थांबविण्यात आली होती. दुर्घटनेनंतर प्रशासनासह सेवाभावी संस्था, एमएमए अशा विविध संस्थांचे असंख्य हात मदतकार्यात गुंतले होते. त्या वेळी उभारण्यात आलेल्या मदतकेंद्रात मृत व बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाइकांचा एकच आक्रोश पाहायला मिळत होता. मात्र, त्यांना तितक्याच धैर्याने प्रांताधिकारी सुषमा सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे-पोळ या संतप्त नातेवाइकांच्या आक्रोशाला सामोरे जात, सांत्वन करीत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होत्या.