शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास होणार स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:11 IST

संडे अँकर । रविवारपासून १८ रुपयांची कपात : पावसाळी हंगामामुळे विस्कळीत झालेली वाहतूक होणार सुरळीत

रेवस, मांडवा सेवाही लवकरच सुरू होणार

भाऊचा धक्का-रेवस आणि मांडवा-मुंबई या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूकही पावसाळी हंगामात बंद केली जाते. मात्र, या दोन्ही मार्गावरील प्रवासी वाहतूक खराब हवामानामुळे सुरू करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी वाहतूक हवामान सुरळीत झाल्यावरच पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बंदर विभागाकडून देण्यात आली.उरण : मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गावरील पावसाळी हंगामासाठी वाढविण्यात आलेले तिकिटाचे दर १ सप्टेंबरपासून कमी करण्यात येणार आहेत. त्यामुळे या सागरी मार्गावरील प्रवास रविवारपासून १८ रुपयांनी स्वस्त होणार आहेत.पावसाळी हंगामासाठी या मार्गावरील विस्कळीत आणि अनियमित झालेली प्रवासीवाहतूक सुरळीत होणार असल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे अधिकारी पी. बी. पवार यांनी दिली.मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गावर उन्हाळी हंगामात दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. मुंबईसाठी जवळचा आणि स्वस्तातील सागरी मार्ग असल्याने प्रवासीही शक्यतो याच मार्गाला पसंती देतात. दरवर्षी जून ते आॅगस्टदरम्यान पावसाळी हंगामासाठी तिकीटदरात वाढ केली जाते. तशी या हंगामासाठी तिकीटदरात ५५ रुपयांवरून ७३ रुपयांपर्यंत अशी तब्बल १८ रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, पावसाळ्यात वाढविण्यात आलेले तिकिटाचे दर १ सप्टेंबरपासून पुन्हा पूर्ववत होणार आहेत. 

टॅग्स :RaigadरायगडMumbaiमुंबई