शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानचा बंद यशस्वी

By admin | Updated: January 31, 2017 03:38 IST

येथील माथेरान बचाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने हरित लवादाने २००३ ची बांधकामे हटविण्याच्या दिलेल्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारून

माथेरान : येथील माथेरान बचाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने हरित लवादाने २००३ ची बांधकामे हटविण्याच्या दिलेल्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारून या निर्णयाविरोधात आपली आक्र मकता दाखवली. परंतु माथेरान हे पर्यटन स्थळ असल्याने या बंदमध्ये पर्यटकांचे अतोनात हाल झाले.फेब्रुवारी २००३ मध्ये माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले त्यानुसार माथेरानमध्ये बांधकामांना परवानगी दिली जात नाही याचा आधार घेत मुंबई स्थित बॉम्बे एन्वायरमेंट अ‍ॅक्शन ग्रुपने एप्रिल २०१६ मध्ये बांधकामाविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका स्थानिकांविरोधात न करता शासन आणि अधिकारी यांच्याविरोधात केल्यामुळे याबाबत स्थानिकांना काहीच माहिती नसल्याचे संघर्ष समितीने सांगितले. तसेच २००३ नंतर जितकी बांधकामे झाली आहेत ती त्वरित हटवून तसा अहवाल हरित लवादास सादर करावा असा आदेश दिल्याने अधिकारी वर्गाने बांधकामे हटविण्यासाठी तयारी केली आहे. ॅयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माथेरान संघर्ष समितीने एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला. या बंदला सर्व हॉटेलधारक, लॉजधारक, दुकानदार, घोडेवाले, रिक्षावाले, टॅक्सी चालक-मालक संघटनेने पाठिंबा दर्शवून शंभर टक्के प्रतिसाद दिला. परंतु पर्यटकांचे अतोनात हाल झाले.न्यायालयात घ्यावी लागणार धावयाबाबतीत सर्वच नागरिकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन यातून काहीतरी सुवर्णमध्य काढावा असे सूचित केले. परंतु शासनाचा आदेश आम्हाला तसेच पोलीस खात्याला पाळणे बंधनकारक असल्याचे अधीक्षक संतोष शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आचरेकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे माथेरानकरांना आगामी कारवाई टाळण्यासाठी स्थगिती आणण्यासाठी केवळ सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यासाठी समस्त ग्रामस्थांच्या सहीनिशी मुख्यमंत्री फडणवीस यांना कारवाई थांबविण्यासाठी निवेदन देऊन मार्ग काढण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. एकंदरीतच सर्वच दुकाने तसेच दैनंदिन व्यवहार बंद केल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. बॉम्बे एन्वायरमेंट ग्रुपने हरित लवादात याचिका दाखल करून न्यायालयाने जी २००३ ची बांधकामे हटविण्याचा निर्णय दिला आहे तो आमच्यासाठी अतिशय दु:खद निर्णय आहे. आमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत.- प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षाअन्न, वस्त्र, निवारा हे माणसाचे मूलभूत अधिकार असताना हे पर्यावरणवादी आमचा अधिकार हिरावू पाहत आहेत. येथील स्थानिक भूमिपुत्रच पर्यावरण अबाधित राखत आलेला आहे. परंतु हे पर्यावरणवादी पर्यावरण वाचविण्यासाठी एक झाड सुद्धा माथेरानमध्ये लावत नाहीत यामुळे त्यांना पर्यावरणाशी काही देणे घेणे नाही, यांना जर पर्यावरणाची एवढी काळजी आहे तर मुंबईमधील प्रदूषण कमी करा.- प्रसाद सावंत,सर्वपक्षीय संघर्ष समिती