शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

माथेरानचा बंद यशस्वी

By admin | Updated: January 31, 2017 03:38 IST

येथील माथेरान बचाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने हरित लवादाने २००३ ची बांधकामे हटविण्याच्या दिलेल्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारून

माथेरान : येथील माथेरान बचाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने हरित लवादाने २००३ ची बांधकामे हटविण्याच्या दिलेल्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारून या निर्णयाविरोधात आपली आक्र मकता दाखवली. परंतु माथेरान हे पर्यटन स्थळ असल्याने या बंदमध्ये पर्यटकांचे अतोनात हाल झाले.फेब्रुवारी २००३ मध्ये माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले त्यानुसार माथेरानमध्ये बांधकामांना परवानगी दिली जात नाही याचा आधार घेत मुंबई स्थित बॉम्बे एन्वायरमेंट अ‍ॅक्शन ग्रुपने एप्रिल २०१६ मध्ये बांधकामाविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका स्थानिकांविरोधात न करता शासन आणि अधिकारी यांच्याविरोधात केल्यामुळे याबाबत स्थानिकांना काहीच माहिती नसल्याचे संघर्ष समितीने सांगितले. तसेच २००३ नंतर जितकी बांधकामे झाली आहेत ती त्वरित हटवून तसा अहवाल हरित लवादास सादर करावा असा आदेश दिल्याने अधिकारी वर्गाने बांधकामे हटविण्यासाठी तयारी केली आहे. ॅयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माथेरान संघर्ष समितीने एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला. या बंदला सर्व हॉटेलधारक, लॉजधारक, दुकानदार, घोडेवाले, रिक्षावाले, टॅक्सी चालक-मालक संघटनेने पाठिंबा दर्शवून शंभर टक्के प्रतिसाद दिला. परंतु पर्यटकांचे अतोनात हाल झाले.न्यायालयात घ्यावी लागणार धावयाबाबतीत सर्वच नागरिकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन यातून काहीतरी सुवर्णमध्य काढावा असे सूचित केले. परंतु शासनाचा आदेश आम्हाला तसेच पोलीस खात्याला पाळणे बंधनकारक असल्याचे अधीक्षक संतोष शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आचरेकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे माथेरानकरांना आगामी कारवाई टाळण्यासाठी स्थगिती आणण्यासाठी केवळ सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यासाठी समस्त ग्रामस्थांच्या सहीनिशी मुख्यमंत्री फडणवीस यांना कारवाई थांबविण्यासाठी निवेदन देऊन मार्ग काढण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. एकंदरीतच सर्वच दुकाने तसेच दैनंदिन व्यवहार बंद केल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. बॉम्बे एन्वायरमेंट ग्रुपने हरित लवादात याचिका दाखल करून न्यायालयाने जी २००३ ची बांधकामे हटविण्याचा निर्णय दिला आहे तो आमच्यासाठी अतिशय दु:खद निर्णय आहे. आमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत.- प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षाअन्न, वस्त्र, निवारा हे माणसाचे मूलभूत अधिकार असताना हे पर्यावरणवादी आमचा अधिकार हिरावू पाहत आहेत. येथील स्थानिक भूमिपुत्रच पर्यावरण अबाधित राखत आलेला आहे. परंतु हे पर्यावरणवादी पर्यावरण वाचविण्यासाठी एक झाड सुद्धा माथेरानमध्ये लावत नाहीत यामुळे त्यांना पर्यावरणाशी काही देणे घेणे नाही, यांना जर पर्यावरणाची एवढी काळजी आहे तर मुंबईमधील प्रदूषण कमी करा.- प्रसाद सावंत,सर्वपक्षीय संघर्ष समिती