शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सामाजिक अंतर पाळून साधेपणाने बांधली लग्नगाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 00:38 IST

आगरी समाजाचे एक पाऊल पुढे

- अनंत पाटील नवी मुंबई : आगरी कोळी समाजातील लग्नसोहळा व हळदीचा कार्यक्रम वाजंत्री, डीजे, नाचगाणी, विद्युत रोशणाई आणि शाकाहारी, मांसाहारी जेवणावळी यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे गांभीर्य ओळखून फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करून गर्दी टाळण्यासाठी वधूवरांकडच्या १० ते १५ जणांच्या उपस्थितीत अगदी साध्या पद्धतीने नवी मुंबईतील वाशी गावातील एका मुलाचा विवाह सोहळा साधेपणाने पार पडला.वाशी गावातील अरुण भोईर यांचा मुलगा मनीष आणि पनवेल तालुक्यातील तक्का गावातील गोपीनाथ सोनके यांची कन्या सुहासिनी यांचा विवाह सोहळा गुरुवारी ११ रोजी सायंकाळी वधूच्या (तक्कागाव, पनवेल) येथील घरी पार पडला. हा अत्यंत कमी खर्चात आणि साधेपणाने विवाह करण्याबाबत या मुलाचे मामा आगरी कोळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय रामभाऊ पाटील आणि मुलीचे वडील गोपीनाथ सोनके यांच्यात बैठक झाली. लॉकडाऊनच्या परिस्थितीचे भान ओळखून वधूवरांच्या दोन्ही मंडळींकडून होकार मिळताच गुरुवारी लग्नगाठ बांधली. एरव्ही आगरी कोळी समाजात हळदी आणि विवाह सोहळ्यात लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाच दिवशी भिंती तांबडणे, हळदी आणि लग्न असे तीन दिवसांचे कार्यक्रम एकाच दिवशी आटोपून घेतले. सामाजिक जबाबदारी व सुरक्षिततेचे सामाजिक संदेश देणारा लग्न सोहळा पार पाडल्यामुळे कौतुक होत आहे.लग्नासाठी लाखो रुपयांचे कर्ज काढून अनाठायी खर्च करून केवळ पैशाचा चुराडा करणे योग्य नाही. आगरी कोळी समाजाने सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून अनाठायी खर्च न करता तोच पैसा त्यांच्या संसारासाठी दिला तर योग्य होईल.- रामभाऊ पाटील, ज्येष्ठ नागरिक, वाशी गाव, नवी मुंबई