शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

सामाजिक अंतर पाळून साधेपणाने बांधली लग्नगाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 00:38 IST

आगरी समाजाचे एक पाऊल पुढे

- अनंत पाटील नवी मुंबई : आगरी कोळी समाजातील लग्नसोहळा व हळदीचा कार्यक्रम वाजंत्री, डीजे, नाचगाणी, विद्युत रोशणाई आणि शाकाहारी, मांसाहारी जेवणावळी यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे गांभीर्य ओळखून फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करून गर्दी टाळण्यासाठी वधूवरांकडच्या १० ते १५ जणांच्या उपस्थितीत अगदी साध्या पद्धतीने नवी मुंबईतील वाशी गावातील एका मुलाचा विवाह सोहळा साधेपणाने पार पडला.वाशी गावातील अरुण भोईर यांचा मुलगा मनीष आणि पनवेल तालुक्यातील तक्का गावातील गोपीनाथ सोनके यांची कन्या सुहासिनी यांचा विवाह सोहळा गुरुवारी ११ रोजी सायंकाळी वधूच्या (तक्कागाव, पनवेल) येथील घरी पार पडला. हा अत्यंत कमी खर्चात आणि साधेपणाने विवाह करण्याबाबत या मुलाचे मामा आगरी कोळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय रामभाऊ पाटील आणि मुलीचे वडील गोपीनाथ सोनके यांच्यात बैठक झाली. लॉकडाऊनच्या परिस्थितीचे भान ओळखून वधूवरांच्या दोन्ही मंडळींकडून होकार मिळताच गुरुवारी लग्नगाठ बांधली. एरव्ही आगरी कोळी समाजात हळदी आणि विवाह सोहळ्यात लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाच दिवशी भिंती तांबडणे, हळदी आणि लग्न असे तीन दिवसांचे कार्यक्रम एकाच दिवशी आटोपून घेतले. सामाजिक जबाबदारी व सुरक्षिततेचे सामाजिक संदेश देणारा लग्न सोहळा पार पाडल्यामुळे कौतुक होत आहे.लग्नासाठी लाखो रुपयांचे कर्ज काढून अनाठायी खर्च करून केवळ पैशाचा चुराडा करणे योग्य नाही. आगरी कोळी समाजाने सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून अनाठायी खर्च न करता तोच पैसा त्यांच्या संसारासाठी दिला तर योग्य होईल.- रामभाऊ पाटील, ज्येष्ठ नागरिक, वाशी गाव, नवी मुंबई