शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा पारा चढल्याने आंब्याची गळती

By admin | Updated: February 18, 2017 06:32 IST

यंदा हिवाळ्यात चांगली थंडी पडल्याने आंबा पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. यामुळे आंब्याला

बोर्ली-मांडला/मुरूड : यंदा हिवाळ्यात चांगली थंडी पडल्याने आंबा पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. यामुळे आंब्याला चांगला मोहरही आला. मात्र, अचानक उन्हाचा पारा चढल्याने आंब्याचा मोहर आणि फळधारणा झालेल्या झाडांच्या कैरी गळू लागल्या आहेत, याचा परिणाम आंबा उत्पादनावर होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत. गेल्या आठवड्यात पारा ११ ते १४ अंशांपर्यंत घसरल्याने त्याचा फटका आंब्याला बसला आहे. या कालावधीतील कमाल व किमान तापमानातील फरक सरासरीपेक्षा अधिक होता. ज्या आंब्याला फळधारणा झाली आहे. त्या आंब्याच्या कैऱ्याही गळून गेल्या आहेत. सुमारे ८० टक्के फळगळ झाल्याने मार्चअखेरीस येणारे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या १० टक्के मोहराला झालेल्या फळधारणेवरच बागायतदारांची धुरा आहे. एप्रिलनंतर बाजारात येणाऱ्या मालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने या वर्षीचा हंगाम कमी उत्पन्न देणारा राहील, अशी भीती बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे. हंगामाच्या सुरु वातीला पोषक वातावरण होते. त्यामुळे आंब्याला मोहरही चांगला आला. सुरु वातीच्या टप्प्यातील उत्पादन चांगले मिळाले आहे. दोनच दिवसांपूर्वी पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना झाली. रायगड जिल्ह्यातून सुमारे २५ पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. ४ हजार ते ८ हजार रु पये पेटीला दर मिळत आहे; परंतु थंडीचा जोर जानेवारीतही कायम राहिल्याने मोठ्या प्रमाणावर मोहर आला होता.कैरी लागलेल्या ठिकाणी मोहर नव्याने आला. उन्हामुळे सुपारीएवढी झालेली कैरी गळून गेली आहे. त्यातून मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात उत्पादन मिळाले असते. सध्या आलेल्या मोहराचे उत्पादन एप्रिलमध्ये मिळणार आहे. मार्चमध्ये अवघे १० टक्केच उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे. सध्या मार्केटमध्ये कर्नाटक, केरळमधील आंब्याची आवक सुरू झाली आहे. ती पुढे वाढतच जाईल. त्याचे आव्हान रायगडसहित कोकणातील हापूसपुढे असून दरावर त्याचा परिणाम होत असल्याचे आंबा बागायतदार शिरीष पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)गेल्या आठवड्यात तापमान वाढले आहे, त्याचा फटका आंब्याला बसला आहे. आंब्याचा मोहर आणि फळधारना झाडलेले सुपारी एवढ्या कैऱ्या गळून पडल्या आहेत.काही ठिकाणी नवीन मोहर आहे एप्रिलमध्ये बाजारात आंबा येईल- संजय चव्हाण, प्रभारी गटविकास अधिकारी