शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
4
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
5
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
6
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
7
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
8
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
9
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
10
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
11
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
12
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
13
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
14
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
15
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
16
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
17
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
18
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
19
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
20
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक

उन्हाचा पारा चढल्याने आंब्याची गळती

By admin | Updated: February 18, 2017 06:32 IST

यंदा हिवाळ्यात चांगली थंडी पडल्याने आंबा पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. यामुळे आंब्याला

बोर्ली-मांडला/मुरूड : यंदा हिवाळ्यात चांगली थंडी पडल्याने आंबा पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. यामुळे आंब्याला चांगला मोहरही आला. मात्र, अचानक उन्हाचा पारा चढल्याने आंब्याचा मोहर आणि फळधारणा झालेल्या झाडांच्या कैरी गळू लागल्या आहेत, याचा परिणाम आंबा उत्पादनावर होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत. गेल्या आठवड्यात पारा ११ ते १४ अंशांपर्यंत घसरल्याने त्याचा फटका आंब्याला बसला आहे. या कालावधीतील कमाल व किमान तापमानातील फरक सरासरीपेक्षा अधिक होता. ज्या आंब्याला फळधारणा झाली आहे. त्या आंब्याच्या कैऱ्याही गळून गेल्या आहेत. सुमारे ८० टक्के फळगळ झाल्याने मार्चअखेरीस येणारे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या १० टक्के मोहराला झालेल्या फळधारणेवरच बागायतदारांची धुरा आहे. एप्रिलनंतर बाजारात येणाऱ्या मालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने या वर्षीचा हंगाम कमी उत्पन्न देणारा राहील, अशी भीती बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे. हंगामाच्या सुरु वातीला पोषक वातावरण होते. त्यामुळे आंब्याला मोहरही चांगला आला. सुरु वातीच्या टप्प्यातील उत्पादन चांगले मिळाले आहे. दोनच दिवसांपूर्वी पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना झाली. रायगड जिल्ह्यातून सुमारे २५ पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. ४ हजार ते ८ हजार रु पये पेटीला दर मिळत आहे; परंतु थंडीचा जोर जानेवारीतही कायम राहिल्याने मोठ्या प्रमाणावर मोहर आला होता.कैरी लागलेल्या ठिकाणी मोहर नव्याने आला. उन्हामुळे सुपारीएवढी झालेली कैरी गळून गेली आहे. त्यातून मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात उत्पादन मिळाले असते. सध्या आलेल्या मोहराचे उत्पादन एप्रिलमध्ये मिळणार आहे. मार्चमध्ये अवघे १० टक्केच उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे. सध्या मार्केटमध्ये कर्नाटक, केरळमधील आंब्याची आवक सुरू झाली आहे. ती पुढे वाढतच जाईल. त्याचे आव्हान रायगडसहित कोकणातील हापूसपुढे असून दरावर त्याचा परिणाम होत असल्याचे आंबा बागायतदार शिरीष पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)गेल्या आठवड्यात तापमान वाढले आहे, त्याचा फटका आंब्याला बसला आहे. आंब्याचा मोहर आणि फळधारना झाडलेले सुपारी एवढ्या कैऱ्या गळून पडल्या आहेत.काही ठिकाणी नवीन मोहर आहे एप्रिलमध्ये बाजारात आंबा येईल- संजय चव्हाण, प्रभारी गटविकास अधिकारी