शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील आंबा उत्पादकांची कोंडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 03:58 IST

अमूलकुमार जैन ।बोर्ली मांडला : फळे आणि भाजीपाल्यावरील अडत बंद झाली असली, तरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा कोणताच फायदा झालेला नाही. आंबा विक्रीसाठी पर्यायी व्यवस्थाच नसल्याने व्यापारी, दलाल आणि अडते यांच्यातील संगनमत शेतकºयाला अपेक्षित भाव मिळण्यासाठी मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात विक्रीकेंद्र सुरू करावीत, अशी ...

अमूलकुमार जैन ।बोर्ली मांडला : फळे आणि भाजीपाल्यावरील अडत बंद झाली असली, तरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा कोणताच फायदा झालेला नाही. आंबा विक्रीसाठी पर्यायी व्यवस्थाच नसल्याने व्यापारी, दलाल आणि अडते यांच्यातील संगनमत शेतकºयाला अपेक्षित भाव मिळण्यासाठी मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात विक्रीकेंद्र सुरू करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.यंदा हवामान बदलाचा मोठा फटका कोकणातील आंबा उत्पादनाला बसला. हवामान बदलामुळे थंडी लांबणे, अवेळी पाऊस, दोन वेळा आलेला मोहर, तुडतुडा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव यामुळे आंबा उत्पादनात मोठी घट झाली. दरवर्षीपेक्षा केवळ ३५ टक्केच आंब्याचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे यंदा आंब्याला सोन्याचा भाव आला आहे. राज्य सरकारने २०१६मध्ये शेतीमालाच्या बाजार स्वातंत्र्यासाठी भाजीपाला व फळे नियमनमुक्ती करण्याचा निर्णय घेतला. दलालांच्या जाचातून शेतकºयांची सुटका होण्यासाठी हा निर्णय जरी चांगला असला, तरी शासनाने एपीएमसीमध्ये कोणत्याही पायाभूत सुविधा दिल्या नाहीत. त्यामुळे आपला माल विकण्यासाठी शेतकºयांना आजही व्यापारी आणि दलालांकडेच जावे लागत आहे. यात दलाल आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. शेतकºयांचा आंबा खरेदी करून तो दुपटीहून अधिक भावाने इतरत्र विकत आहेत.आंब्यामध्ये कीटकनाशक अंश आढळून आल्यानंतर चार वर्षांपूर्वी आशियाई देशांमध्ये आंब्याची निर्यात थांबण्यात आली होती. वर्षभरानंतर निर्यातबंदी उठवण्यात आली. तेव्हापासून आंब्याची निर्यात चांगल्या प्रकारे होत आहे. पणन विभागाच्या सहकार्याने जल वाहतुकीद्वारेही आंब्याची निर्यात होत आहे. मात्र, यंदा हे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. एपीएमसी (मुंबई), एपीएमसी (गुलटेकडी, पुणे), एपीएमसी (कोल्हापूर), या ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये अजूनही ५५ ते ६० टक्के कोकणातील आंबा जातो. मात्र, येथील दलाल आणि व्यापाºयांनाच हाताशी धरावे लागते. परिणामी, शेतकºयांची कायम फसवणूकच होते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली. आंब्यासाठी देशांतर्गत मार्केट उपलब्ध झाल्यास शेतकºयांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षाही मोकल यांनी व्यक्त केली.एक नजर आंबा उत्पादनावरच्कोकणातील आंबा व्यवसायात दरवर्षी सुमारे ११०० कोटींची उलाढाल होते. डझनला जास्तीत जास्त १२०० रु पये, तर किमान २५० ते ३०० रु पये भाव मिळतो.च्आंब्याची पहिली पेटी साधारणत: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येते. मात्र, तो केमिकल्स मारलेला असतो. आंब्याचा सीझन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतो.

 

संघटनेची प्रमुख मागणीत्या-त्या जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी विक्री केंद्र उभारणेदेशांतर्गत मार्केटला चालना देणेदेशातील पर्यटनस्थळी आंब्याची विक्री करणेदेशातील प्रमुख रेल्वेस्थानकांवर विक्रीसाठी दालन सुरू करणेदेशांतर्गत मार्केट उपलब्ध झाल्यास चांगला भाव मिळेलमहत्त्वाच्या विमानतळांवर आंब्यासाठी गाळे उपलब्ध करून देणे 

टॅग्स :Raigadरायगड