शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील आंबा उत्पादकांची कोंडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 03:58 IST

अमूलकुमार जैन ।बोर्ली मांडला : फळे आणि भाजीपाल्यावरील अडत बंद झाली असली, तरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा कोणताच फायदा झालेला नाही. आंबा विक्रीसाठी पर्यायी व्यवस्थाच नसल्याने व्यापारी, दलाल आणि अडते यांच्यातील संगनमत शेतकºयाला अपेक्षित भाव मिळण्यासाठी मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात विक्रीकेंद्र सुरू करावीत, अशी ...

अमूलकुमार जैन ।बोर्ली मांडला : फळे आणि भाजीपाल्यावरील अडत बंद झाली असली, तरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा कोणताच फायदा झालेला नाही. आंबा विक्रीसाठी पर्यायी व्यवस्थाच नसल्याने व्यापारी, दलाल आणि अडते यांच्यातील संगनमत शेतकºयाला अपेक्षित भाव मिळण्यासाठी मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात विक्रीकेंद्र सुरू करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.यंदा हवामान बदलाचा मोठा फटका कोकणातील आंबा उत्पादनाला बसला. हवामान बदलामुळे थंडी लांबणे, अवेळी पाऊस, दोन वेळा आलेला मोहर, तुडतुडा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव यामुळे आंबा उत्पादनात मोठी घट झाली. दरवर्षीपेक्षा केवळ ३५ टक्केच आंब्याचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे यंदा आंब्याला सोन्याचा भाव आला आहे. राज्य सरकारने २०१६मध्ये शेतीमालाच्या बाजार स्वातंत्र्यासाठी भाजीपाला व फळे नियमनमुक्ती करण्याचा निर्णय घेतला. दलालांच्या जाचातून शेतकºयांची सुटका होण्यासाठी हा निर्णय जरी चांगला असला, तरी शासनाने एपीएमसीमध्ये कोणत्याही पायाभूत सुविधा दिल्या नाहीत. त्यामुळे आपला माल विकण्यासाठी शेतकºयांना आजही व्यापारी आणि दलालांकडेच जावे लागत आहे. यात दलाल आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. शेतकºयांचा आंबा खरेदी करून तो दुपटीहून अधिक भावाने इतरत्र विकत आहेत.आंब्यामध्ये कीटकनाशक अंश आढळून आल्यानंतर चार वर्षांपूर्वी आशियाई देशांमध्ये आंब्याची निर्यात थांबण्यात आली होती. वर्षभरानंतर निर्यातबंदी उठवण्यात आली. तेव्हापासून आंब्याची निर्यात चांगल्या प्रकारे होत आहे. पणन विभागाच्या सहकार्याने जल वाहतुकीद्वारेही आंब्याची निर्यात होत आहे. मात्र, यंदा हे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. एपीएमसी (मुंबई), एपीएमसी (गुलटेकडी, पुणे), एपीएमसी (कोल्हापूर), या ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये अजूनही ५५ ते ६० टक्के कोकणातील आंबा जातो. मात्र, येथील दलाल आणि व्यापाºयांनाच हाताशी धरावे लागते. परिणामी, शेतकºयांची कायम फसवणूकच होते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली. आंब्यासाठी देशांतर्गत मार्केट उपलब्ध झाल्यास शेतकºयांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षाही मोकल यांनी व्यक्त केली.एक नजर आंबा उत्पादनावरच्कोकणातील आंबा व्यवसायात दरवर्षी सुमारे ११०० कोटींची उलाढाल होते. डझनला जास्तीत जास्त १२०० रु पये, तर किमान २५० ते ३०० रु पये भाव मिळतो.च्आंब्याची पहिली पेटी साधारणत: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येते. मात्र, तो केमिकल्स मारलेला असतो. आंब्याचा सीझन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतो.

 

संघटनेची प्रमुख मागणीत्या-त्या जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी विक्री केंद्र उभारणेदेशांतर्गत मार्केटला चालना देणेदेशातील पर्यटनस्थळी आंब्याची विक्री करणेदेशातील प्रमुख रेल्वेस्थानकांवर विक्रीसाठी दालन सुरू करणेदेशांतर्गत मार्केट उपलब्ध झाल्यास चांगला भाव मिळेलमहत्त्वाच्या विमानतळांवर आंब्यासाठी गाळे उपलब्ध करून देणे 

टॅग्स :Raigadरायगड