शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आंबा बागायतदार चिंतित, मोहोर गळून जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 03:06 IST

मुरुड तालुक्यात दोन दिवसांपूर्वी तापमान ३९ डिग्री सेल्सियस एवढे होते. उन्हामुळे नागरिकांची काहिली होत असतानाच गुरुवारी अचानक वातावरण बदलले. सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते, तर काही ठिकाणी तुरळक पाऊसही पडला.

मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यात दोन दिवसांपूर्वी तापमान ३९ डिग्री सेल्सियस एवढे होते. उन्हामुळे नागरिकांची काहिली होत असतानाच गुरुवारी अचानक वातावरण बदलले. सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते, तर काही ठिकाणी तुरळक पाऊसही पडला. मुरुड तालुक्यात आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अनेक झाडांवर मोहोर फुलला आहे. मात्र अचानक वातावरणात बदलल्याने आंबा पिकावर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.याबाबत खारआंबोली येथील बागायतदार मनोज कमाने यांच्याशी संपर्क साधला असता, ढगाळ वातावरण आंब्यासाठी पोषक नाही. काही प्रमाणात पाऊस सुद्धा पडल्याने आंब्यावरील मोहर गळून पडला आहे. आंब्याच्या फळास कीड व बुरशी लागण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून जोरदार वाऱ्यामुळे झाडावरील काही फळे गळून पडल्याचे त्यांनी सांगितले. या अस्मानी संकटामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत. आंब्याबरोबरच कडधान्य पिकाचे नुकसान होण्याची भीतीही शेतकºयांकडून वर्तवण्यात येत आहे.रसायनी परिसरात ढगाळ हवामानरसायनी : रसायनी व परिसरात गुरूवारी सकाळपासूनच वातावरण आकाश आभ्राच्छादित होते. अवकाळी पाऊस रसायनी परिसरात झाला नसला तरी वीटभट्टी मालकाच्या विटांवर प्लास्टीक कागद झाकताना दिसत होते.आंबा बागायतदारही धास्तावलेले आहेत. गारांचा पाऊस पडला तर कैºयांना डाग पडतात शिवाय आंबे तुटूनही पडतात.उशिरा आलेला मोहोर गळून पडतो. अशा ढगाळ हवामानामुळे मोहोरावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होतो. उन्हाळी भात पिकावर खोडकिडीचाही प्रादुर्भाव होऊ शकतो, असे एका जाणकार शेतकºयाने सांगितले.पनवेलमध्ये अवकाळी पाऊसपनवेल : पनवेलमध्ये काही दिवसांपासून कडक उन्हाने अंगाची काहिली उडाली असताना गुरु वारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी शेतकरी मात्र चिंतित आहेत.दक्षिणेकडील समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने सकाळपासून पनवेलसह विविध भागात वादळसदृश स्थिती निर्माण झाली होती. आज पारा ३९ अंशावर असताना तुरळक पाऊस पडला.मुरु ड तालुक्यात १५९० हेक्टर क्षेत्राखाली आंबा पिकाची लागवड केली जाते. अजून किमान दोन दिवस जरी ढगाळ वातावरण राहिले तर आंबा पिकास धोका पोहचू शकतो. बदलत्या हवामानामुळे होणाºया नुकसानीवर कृषी खात्याचे लक्ष असून यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील.- सूरज नामदास, तालुका कृषी अधिकारी, मुरुड