शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

जिल्ह्यात आंबा बागायतदार चिंतित, मोहोर गळून जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 03:06 IST

मुरुड तालुक्यात दोन दिवसांपूर्वी तापमान ३९ डिग्री सेल्सियस एवढे होते. उन्हामुळे नागरिकांची काहिली होत असतानाच गुरुवारी अचानक वातावरण बदलले. सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते, तर काही ठिकाणी तुरळक पाऊसही पडला.

मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यात दोन दिवसांपूर्वी तापमान ३९ डिग्री सेल्सियस एवढे होते. उन्हामुळे नागरिकांची काहिली होत असतानाच गुरुवारी अचानक वातावरण बदलले. सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते, तर काही ठिकाणी तुरळक पाऊसही पडला. मुरुड तालुक्यात आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अनेक झाडांवर मोहोर फुलला आहे. मात्र अचानक वातावरणात बदलल्याने आंबा पिकावर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.याबाबत खारआंबोली येथील बागायतदार मनोज कमाने यांच्याशी संपर्क साधला असता, ढगाळ वातावरण आंब्यासाठी पोषक नाही. काही प्रमाणात पाऊस सुद्धा पडल्याने आंब्यावरील मोहर गळून पडला आहे. आंब्याच्या फळास कीड व बुरशी लागण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून जोरदार वाऱ्यामुळे झाडावरील काही फळे गळून पडल्याचे त्यांनी सांगितले. या अस्मानी संकटामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत. आंब्याबरोबरच कडधान्य पिकाचे नुकसान होण्याची भीतीही शेतकºयांकडून वर्तवण्यात येत आहे.रसायनी परिसरात ढगाळ हवामानरसायनी : रसायनी व परिसरात गुरूवारी सकाळपासूनच वातावरण आकाश आभ्राच्छादित होते. अवकाळी पाऊस रसायनी परिसरात झाला नसला तरी वीटभट्टी मालकाच्या विटांवर प्लास्टीक कागद झाकताना दिसत होते.आंबा बागायतदारही धास्तावलेले आहेत. गारांचा पाऊस पडला तर कैºयांना डाग पडतात शिवाय आंबे तुटूनही पडतात.उशिरा आलेला मोहोर गळून पडतो. अशा ढगाळ हवामानामुळे मोहोरावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होतो. उन्हाळी भात पिकावर खोडकिडीचाही प्रादुर्भाव होऊ शकतो, असे एका जाणकार शेतकºयाने सांगितले.पनवेलमध्ये अवकाळी पाऊसपनवेल : पनवेलमध्ये काही दिवसांपासून कडक उन्हाने अंगाची काहिली उडाली असताना गुरु वारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी शेतकरी मात्र चिंतित आहेत.दक्षिणेकडील समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने सकाळपासून पनवेलसह विविध भागात वादळसदृश स्थिती निर्माण झाली होती. आज पारा ३९ अंशावर असताना तुरळक पाऊस पडला.मुरु ड तालुक्यात १५९० हेक्टर क्षेत्राखाली आंबा पिकाची लागवड केली जाते. अजून किमान दोन दिवस जरी ढगाळ वातावरण राहिले तर आंबा पिकास धोका पोहचू शकतो. बदलत्या हवामानामुळे होणाºया नुकसानीवर कृषी खात्याचे लक्ष असून यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील.- सूरज नामदास, तालुका कृषी अधिकारी, मुरुड