शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
2
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
3
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं करण कळताच पती हादरला!
4
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
5
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
6
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
7
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
8
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
9
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
10
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
11
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
12
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
13
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
14
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
15
Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
16
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
17
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
18
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
19
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
20
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

जिल्ह्यात आंबा बागायतदार चिंतित, मोहोर गळून जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 03:06 IST

मुरुड तालुक्यात दोन दिवसांपूर्वी तापमान ३९ डिग्री सेल्सियस एवढे होते. उन्हामुळे नागरिकांची काहिली होत असतानाच गुरुवारी अचानक वातावरण बदलले. सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते, तर काही ठिकाणी तुरळक पाऊसही पडला.

मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यात दोन दिवसांपूर्वी तापमान ३९ डिग्री सेल्सियस एवढे होते. उन्हामुळे नागरिकांची काहिली होत असतानाच गुरुवारी अचानक वातावरण बदलले. सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते, तर काही ठिकाणी तुरळक पाऊसही पडला. मुरुड तालुक्यात आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अनेक झाडांवर मोहोर फुलला आहे. मात्र अचानक वातावरणात बदलल्याने आंबा पिकावर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.याबाबत खारआंबोली येथील बागायतदार मनोज कमाने यांच्याशी संपर्क साधला असता, ढगाळ वातावरण आंब्यासाठी पोषक नाही. काही प्रमाणात पाऊस सुद्धा पडल्याने आंब्यावरील मोहर गळून पडला आहे. आंब्याच्या फळास कीड व बुरशी लागण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून जोरदार वाऱ्यामुळे झाडावरील काही फळे गळून पडल्याचे त्यांनी सांगितले. या अस्मानी संकटामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत. आंब्याबरोबरच कडधान्य पिकाचे नुकसान होण्याची भीतीही शेतकºयांकडून वर्तवण्यात येत आहे.रसायनी परिसरात ढगाळ हवामानरसायनी : रसायनी व परिसरात गुरूवारी सकाळपासूनच वातावरण आकाश आभ्राच्छादित होते. अवकाळी पाऊस रसायनी परिसरात झाला नसला तरी वीटभट्टी मालकाच्या विटांवर प्लास्टीक कागद झाकताना दिसत होते.आंबा बागायतदारही धास्तावलेले आहेत. गारांचा पाऊस पडला तर कैºयांना डाग पडतात शिवाय आंबे तुटूनही पडतात.उशिरा आलेला मोहोर गळून पडतो. अशा ढगाळ हवामानामुळे मोहोरावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होतो. उन्हाळी भात पिकावर खोडकिडीचाही प्रादुर्भाव होऊ शकतो, असे एका जाणकार शेतकºयाने सांगितले.पनवेलमध्ये अवकाळी पाऊसपनवेल : पनवेलमध्ये काही दिवसांपासून कडक उन्हाने अंगाची काहिली उडाली असताना गुरु वारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी शेतकरी मात्र चिंतित आहेत.दक्षिणेकडील समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने सकाळपासून पनवेलसह विविध भागात वादळसदृश स्थिती निर्माण झाली होती. आज पारा ३९ अंशावर असताना तुरळक पाऊस पडला.मुरु ड तालुक्यात १५९० हेक्टर क्षेत्राखाली आंबा पिकाची लागवड केली जाते. अजून किमान दोन दिवस जरी ढगाळ वातावरण राहिले तर आंबा पिकास धोका पोहचू शकतो. बदलत्या हवामानामुळे होणाºया नुकसानीवर कृषी खात्याचे लक्ष असून यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील.- सूरज नामदास, तालुका कृषी अधिकारी, मुरुड