शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

माणगाव - दिघी महामार्ग धोकादायक; भरधाव वाहनांमुळे स्थानिकांना धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:34 IST

गतिरोधकांची मागणी : भरधाव वाहनांमुळे स्थानिकांना धास्ती

गणेश प्रभाळेदिघी : दिघी ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील दिघी-माणगाव रस्त्यावरील कामे पूर्ण होत आली असून, आता या वेगवान रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता वर्तविण्यात येते. त्यामुळे दिघी - माणगाव प्रवास धोकादायक बनला आहे.

माणगाव ते दिघीदरम्यानच्या मार्गात १७ गावे रस्त्यालगत आहेत. सोबत बसस्थानके, व्यावसायिक शिक्षणसंस्था, मराठी शाळा, पदवी कॉलेज व अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे खरेदीसाठी नागरिक व विद्यार्थ्यांची वर्दळ या मार्गावर कायम असते. मात्र, रस्ते सुरळीत असल्याने छोटे-मोठे अपघात हे नेहमीचे चित्र दिसते.

पुणे ते दिवेआगर व हरिहरेश्वर या पर्यटन स्थळांतील अंतर वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. श्रीवर्धन परिवहन आगारातून सुटणाऱ्या बहुतेक बस गाड्या याच मार्गावरून ये-जा करत असतात. दिघी पोर्टमधून अनेक अवजड वाहने व श्रीवर्धनकडे येणाऱ्या पर्यटकांमुळे या मार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते.

अशातच काहींना घाईगडबडीचा प्रवास करण्याच्या बेतात महामार्गाच्या मुख्य रस्त्याला गर्दीतून वाहनांना ओव्हरटेक करण्याचे सुचते. परंतु या ५० किलोमीटर अंतरावर रस्त्याला एकही गतिरोधक नसल्याने चालक वेगाने वाहन चालवितात. त्यामुळे अपघाताचे प्रसंग सातत्याने ओढावतात. रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांसाठी हा प्रवास धोक्याचा ठरत आहे.या पार्श्वभूमीवर वाहनांच्या वेगाला लगाम घालण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने या मार्गावर गतिरोधक बसवावे. त्यामुळे अपघातांना आळा बसेल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.