शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

माणगाव - दिघी महामार्ग धोकादायक; भरधाव वाहनांमुळे स्थानिकांना धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:34 IST

गतिरोधकांची मागणी : भरधाव वाहनांमुळे स्थानिकांना धास्ती

गणेश प्रभाळेदिघी : दिघी ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील दिघी-माणगाव रस्त्यावरील कामे पूर्ण होत आली असून, आता या वेगवान रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता वर्तविण्यात येते. त्यामुळे दिघी - माणगाव प्रवास धोकादायक बनला आहे.

माणगाव ते दिघीदरम्यानच्या मार्गात १७ गावे रस्त्यालगत आहेत. सोबत बसस्थानके, व्यावसायिक शिक्षणसंस्था, मराठी शाळा, पदवी कॉलेज व अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे खरेदीसाठी नागरिक व विद्यार्थ्यांची वर्दळ या मार्गावर कायम असते. मात्र, रस्ते सुरळीत असल्याने छोटे-मोठे अपघात हे नेहमीचे चित्र दिसते.

पुणे ते दिवेआगर व हरिहरेश्वर या पर्यटन स्थळांतील अंतर वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. श्रीवर्धन परिवहन आगारातून सुटणाऱ्या बहुतेक बस गाड्या याच मार्गावरून ये-जा करत असतात. दिघी पोर्टमधून अनेक अवजड वाहने व श्रीवर्धनकडे येणाऱ्या पर्यटकांमुळे या मार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते.

अशातच काहींना घाईगडबडीचा प्रवास करण्याच्या बेतात महामार्गाच्या मुख्य रस्त्याला गर्दीतून वाहनांना ओव्हरटेक करण्याचे सुचते. परंतु या ५० किलोमीटर अंतरावर रस्त्याला एकही गतिरोधक नसल्याने चालक वेगाने वाहन चालवितात. त्यामुळे अपघाताचे प्रसंग सातत्याने ओढावतात. रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांसाठी हा प्रवास धोक्याचा ठरत आहे.या पार्श्वभूमीवर वाहनांच्या वेगाला लगाम घालण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने या मार्गावर गतिरोधक बसवावे. त्यामुळे अपघातांना आळा बसेल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.