शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

माणगाव - दिघी महामार्ग धोकादायक; भरधाव वाहनांमुळे स्थानिकांना धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:34 IST

गतिरोधकांची मागणी : भरधाव वाहनांमुळे स्थानिकांना धास्ती

गणेश प्रभाळेदिघी : दिघी ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील दिघी-माणगाव रस्त्यावरील कामे पूर्ण होत आली असून, आता या वेगवान रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता वर्तविण्यात येते. त्यामुळे दिघी - माणगाव प्रवास धोकादायक बनला आहे.

माणगाव ते दिघीदरम्यानच्या मार्गात १७ गावे रस्त्यालगत आहेत. सोबत बसस्थानके, व्यावसायिक शिक्षणसंस्था, मराठी शाळा, पदवी कॉलेज व अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे खरेदीसाठी नागरिक व विद्यार्थ्यांची वर्दळ या मार्गावर कायम असते. मात्र, रस्ते सुरळीत असल्याने छोटे-मोठे अपघात हे नेहमीचे चित्र दिसते.

पुणे ते दिवेआगर व हरिहरेश्वर या पर्यटन स्थळांतील अंतर वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. श्रीवर्धन परिवहन आगारातून सुटणाऱ्या बहुतेक बस गाड्या याच मार्गावरून ये-जा करत असतात. दिघी पोर्टमधून अनेक अवजड वाहने व श्रीवर्धनकडे येणाऱ्या पर्यटकांमुळे या मार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते.

अशातच काहींना घाईगडबडीचा प्रवास करण्याच्या बेतात महामार्गाच्या मुख्य रस्त्याला गर्दीतून वाहनांना ओव्हरटेक करण्याचे सुचते. परंतु या ५० किलोमीटर अंतरावर रस्त्याला एकही गतिरोधक नसल्याने चालक वेगाने वाहन चालवितात. त्यामुळे अपघाताचे प्रसंग सातत्याने ओढावतात. रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांसाठी हा प्रवास धोक्याचा ठरत आहे.या पार्श्वभूमीवर वाहनांच्या वेगाला लगाम घालण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने या मार्गावर गतिरोधक बसवावे. त्यामुळे अपघातांना आळा बसेल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.