शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

माई महोत्सवात अवयवदानाचा संकल्प!

By admin | Updated: April 18, 2017 06:46 IST

जीवनविद्या मिशन या शैक्षणिक, सामाजिक व सेवाभावी संस्थेद्वारे थोर तत्त्वज्ञ सद्गुरू वामनराव पै यांच्या पत्नी शारदामार्इंच्या ९१व्या वाढदिवसानिमित्त १४ ते १६ एप्रिल दरम्यान

मुंबई : जीवनविद्या मिशन या शैक्षणिक, सामाजिक व सेवाभावी संस्थेद्वारे थोर तत्त्वज्ञ सद्गुरू वामनराव पै यांच्या पत्नी शारदामार्इंच्या ९१व्या वाढदिवसानिमित्त १४ ते १६ एप्रिल दरम्यान सायंकाळी ५ ते ९ या वेळेत एस.आर.पी.एफ. मैदान, पश्चिम द्रुतगती महामार्ग, एनएच-८, जयकोच, जोगेश्वरी (पू.) येथे भव्य ज्ञानप्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सुरुवात १४ एप्रिल रोजी एका विशेष अभियानाने करण्यात आली. या महोत्सवानिमित्त जीवनविद्या मिशनतर्फे ‘अवयवदान’ हे अभियान यंदा राबविण्यात येत आहे.विशेष म्हणजे या तीन दिवसांच्या महोत्सवादरम्यान हजारो लोकांनी अवयवदानासाठी उत्स्फूर्त नावनोंदणी केली. या अभियानांतर्गत शुक्रवार, १४ रोजी जीवनविद्या मिशनच्या बालसंस्कार वर्गात जाणाऱ्या लहान मुलांनी ‘आदर्शांचे आदर्श’ या नवनाट्यातून प्रचंड जनसमुदायाकडे अवयवदानाबद्दल आवाहन केले. या नवनाट्यामधील एक विशेष भूमिका सद्गुरूंचा पणतू यश निखिल पै याने रंगविली. प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. विद्याधर लाड व सांगलीचे प्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉ. प्रदीप पटवर्धन यांनी अवयवदान या विषयाबद्दल लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करण्यासाठी उत्तम असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये सद्गुरूंच्या शिष्या डॉ. विद्या जोशी यांनी ‘आरोग्य मनाचे’ या विषयावर मार्गदर्शन केले. या महोत्सवामध्ये १५ एप्रिल रोजी प्रल्हाद वामनराव पै यांचे ‘देव देव म्हणुनी व्यर्थ का फिरसी’ या विषयावर आधारित आगळेवेगळे असे दिव्य कीर्तन झाले. १६ एप्रिल हा मार्इंचा वाढदिवस असल्याने या दिवशी सर्व नामधारकांच्या उत्साहाला तर अक्षरश: पारावर नव्हता. मार्इंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वधू-वरांचा विवाह उपासनायज्ञाच्या उद्घोषामध्ये पार पडला. सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये कोणतेही कर्मकांड केले जात नसून केवळ नामघोष केला जातो. या कार्यक्रमासाठी तीन दिवसांमध्ये राज्यमंत्री रवींद्र वायकर, आ. सुनील प्रभू, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, नगरसेवक आदी उपस्थित होते.