शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
3
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
4
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
5
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
6
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
7
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
8
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
9
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
10
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
11
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
12
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
13
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
14
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
15
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
16
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
17
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
18
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
19
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
20
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार

जंजि-यावर जाणा-या पर्यटकांची जबाबदारी महाराष्ट्र मेरीटाइमवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 02:58 IST

मुरुड जंजिरा : ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातील जवळपास पाच लाखांहून अधिक पर्यटक मुरुडमध्ये दाखल होतात.

संजय करडे मुरुड जंजिरा : ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातील जवळपास पाच लाखांहून अधिक पर्यटक मुरुडमध्ये दाखल होतात. या पर्यटकांना सुरक्षितता देण्याचे काम महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे आहे, परंतु गेल्या काही दिवसात या बोर्डाच्या गलथान कामामुळे पर्यटकांच्या जीवास धोका उद्भवला आहे.जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी खोरा बंदर, राजपुरी जेटी, तसेच दिघी बंदरातून वाहतूक करून पर्यटकांना किल्ल्यात आणले जाते. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून काही इंजीन लाँच फेरीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र ही परवानगी देताना बोर्डाने प्रवासी वर्गाची सुरक्षा विचारात घेतलेली दिसत नाही.इंजीन लाँच किल्ल्यापर्यंत येत नसल्याने भर समुद्रात लाँच थांबवून त्यातील पर्यटकांना शिडाच्या बोटीत स्थलांतरित केले जाते. अशा वेळी भरती अथवा समुद्र खवळल्यास अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशा वेळी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डच अपघातास जबाबदार असेल, असा इशारा मुरुड तालुका प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे.जंजिरा किल्ल्यावर सध्या काही इंजीन बोटींना वाहतूक करण्याची परवानगी बोर्डाकडून देण्यात आली आहे. यावर आपली भूमिका मांडताना प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी याबाबत महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांना निवेदन पाठवून प्रवासीवर्गाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. शिडाच्या तसेच इंजीन बोटीतून किल्ल्यावर नेताना जेवढे प्रवासी आहेत तेवढ्या संख्येने लाइफ गार्ड जॅकेट असणे क्र मप्राप्त आहे. पट्टीचा पोहणारा याची जीवरक्षक म्हणून नियुक्ती करणे क्र मप्राप्त आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ बोटी एकाच वेळी आल्यास पर्यटक उतरण्याच्या घाई गडबडीत चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता आहे.अशावेळी एल्फिन्स्टनसारखी दुर्दैवी घटना सुद्धा होऊ शकते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने येथे वेळीच लक्ष घालून ज्या त्रुटी आहेत त्या दूर कराव्यात, अन्यथा प्रवासी वर्गातर्फे आंदोलन छेडू असा इशारा सुर्वे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.इंजीन लाँच किल्ल्यापर्यंत येत नसल्याने भर समुद्रात लाँच थांबवून त्यातील पर्यटकांना शिडाच्या बोटीत स्थलांतरित केले जाते. अशा वेळी भरती अथवा समुद्र खवळल्यास अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी भीती प्रवासी संघटनेकडून व्यक्त करण्यात येत आहे.प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. हे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे असून त्या कार्यालयाकडून सूचना येताच, पुढील कार्यवाही करण्यात येईल.- अतुल धोत्रे,बंदर निरीक्षक, मुरुड

टॅग्स :Raigadरायगड