शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

एलिफंटा बेटावरील ८३ स्थानिक गरीब व्यावसायिकांना दुकाने हटविण्याचे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2024 21:36 IST

गरीब कुटुंब  रस्त्यावर येण्याची भीती 

मधुकर ठाकूर

उरण : एलिफंटा बेटावर मागील ५० वर्षांपासून पर्यटक आधारित व्यवसाय करणाऱ्या गरीब  स्थानिकांना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी आठ दिवसात दुकाने काढण्यासाठी धमकावले आहे. रोजीरोटीला मुकावे लागणार असल्याने गरीब व्यावसायिकांवर उपासमारीची संकट येऊन ठेपण्याची भीती निर्माण झाल्याने बेटावरील ८३ कुटुंबियांवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

एलिफंटा बेटावर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अखत्यारीत शेतबंदर जेट्टीपासुन एक किमी अंतरापर्यंतच्या पोच मार्गापर्यत ८३ स्थानिक व्यावसायिकांची कटलरीची दुकाने आहेत.मागील ५० वर्षांपासून हे स्थानिक गरीब व्यावसायिक छोटी-छोटी दुकाने थाटून चणे-फुटाणे, मके, विविध प्रकारच्या रंगीबेरंगी टोप्या, शोभिवंत वस्तू, कटलरी सामान, खाद्य पदार्थ विक्री करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत आहेत.महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अखत्यारीतील जागा असल्याने भुईभाडे लागु करण्याची अनेक वर्षांपासून व्यावसायिकांची मागणीआहे.मात्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून व्यावसायिकांच्या या रास्त मागणीकडे सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले जात आहे.

बेटावर पर्यटक आधारित पारंपारिक पध्दतीने व्यवसाय करणाऱ्या बेटावरील या स्थानिक व्यावसायिकांना उपजिविकेचे अन्य कोणतेही साधन नाही.त्यामुळे या स्थानिक गरीब व्यावसायिकांवर कोणत्याही प्रकारे उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून प्रयत्न सुरु आहेत.

पर्यटक आधारित पारंपारिक पध्दतीने व्यवसाय करणाऱ्या बेटावरील या स्थानिक व्यावसायिकांना उपजिविकेचे अन्य कोणतेही साधन नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने खासदार निधीतून बेटावरील या ८३ गरीब व्यावसायिकांना व्यवसाय करीत असलेल्या ठिकाणीच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुंदर, सुशोभित एकसारखी दिसणारी आणि एकाच आकाराची दुकाने तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.आराखडा तयार करून दिलेला प्रस्ताव ग्रामपंचायतीने मंजुरीसाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे .मात्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मेरिटाईम बोर्डाकडे पाठविण्यात आलेला प्रस्ताव अद्यापही मंजुरीसाठी प्रलंबित आहे. स्थानिकच झारीतील काही राजकीय शुक्राचार्य गरीब व्यावसायिकांना आडवे जात असल्याने स्थानिक ८३ व्यावसायिकांचा प्रश्न आणखीनच जटील बनला असल्याचा आरोप या  व्यावसायिकांकडून केला जात आहे.

दरम्यान मागील आठवड्यात महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे ठाणे विभागाचे प्रादेशिक अधिकारी कॅप्टन सुरज नाईक यांनी संबंधित ८३ व्यावसायिकांनाही चर्चा करण्यासाठी ठाणे येथील कार्यालयात पाचारण केले होते.या बैठकीत राजकीय दबावाखाली असलेल्या सीईओनी व्यावसायिकांचे म्हणणे ऐकून न घेताच आठ दिवसात दुकाने हटविण्याची धमकी वजा आदेशच दिले असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. गरिबांवर येऊ घातलेले उपासमारीचे संकट  दूर करण्यासाठी या ८३ व्यावसायिकांनी पत्राद्वारे घारापुरी ग्रामपंचायतीलाच यातून मार्ग काढण्याची विनंती  केली आहे.व्यावसायिकांच्या पत्रानंतर  घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीनेही सरपंच मीना भोईर,उपसरपंच बळीराम ठाकूर यांनीही स्थानिक गरीब व्यावसायिकांचा कायमस्वरूपी प्रश्न निकाली काढण्याची विनंती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या सीईओंना पत्राद्वारे केली आहे.