शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

रायगडमधील महावितरण कर्मचारी संपावर; अलिबाग येथे कर्मचाऱ्यांची निदर्शने

By राजेश भोस्तेकर | Updated: January 4, 2023 12:14 IST

विजेची समस्या निर्माण झाल्यास याला सर्वस्वी शासन जबाबदार राहणार असल्याचे संपकऱ्याचे म्हणणे आहे.

अलिबाग : शासनाने नफ्यात सुरू असलेल्या शासकीय कंपन्या उद्योजकाच्या हातात देण्याचा घाट सुरू केला आहे. नफ्यात असलेली महावितरण कंपनी ही अदाणी उद्योगाला देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना याचा फटका बसणार असून कर्मचाऱ्यांचेही नुकसान होणार आहे. आम्ही आमच्या आर्थिक कारणासाठी संप न करता अदाणी कंपनीला समांतर परवानगी देऊ नये यासाठी संप पुकारला आहे. त्यामुळे ग्राहकांना त्रास देण्याचा आमचा कोणताच हेतू नाही आहे. विजेची समस्या निर्माण झाल्यास याला सर्वस्वी शासन जबाबदार राहणार असल्याचे संपकऱ्याचे म्हणणे आहे.

रायगड जिल्ह्यातील महावितरणचे पंधराशे कर्मचारी, अधिकारी, अभियंते बुधवार पासून ७२ तासांच्या संपावर गेले आहेत. अलिबाग चेंढरे महावितरण कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून सरकार व अदाणी विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी, अधिकारी, अभियंते, महिला कर्मचारी या निदर्शनात सहभागी झाले होते. 

रायगड जिल्ह्यासह ठाणे जिल्ह्यातील काही भाग हा अदाणी समूहाकडे दिला जाणार आहे. महावितरणच्या या खाजगीकरणला सर्वं महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. वेळोवेळी आपला विरोध कर्मचाऱ्यांनी विविध मार्गाने शासनाकडे नोंदविला आहे. मात्र शासन याकडे डोळेझाक करीत आहे. त्यामुळे अखेर संपाचे अस्त्र उगारले आहे. ४ ते ६ जानेवारी असे ७२ तास संप सुरू राहणार आहे. त्यामुळे या काळात वीज गेल्यास ग्राहकांची अडचण होणार आहे. राज्यातील अनेक संच बंद झाले असून विजेचा तुटवडा जाणवणार असल्याचे संपकरी यांनी म्हटले आहे. 

रायगड जिल्ह्यातील कृती समितीच्या माध्यमातून कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. ग्राहकांना त्रास देण्याचा आमचा कोणताच हेतू नाही आहे. खाजगीकरणामुळे ग्राहकांनाही वाढीव बिले येणार आहेत. तसेच शासनाच्या विजे बाबत असलेल्या योजना बंद होणार आहेत. त्यामुळे आमच्या संपात ग्राहकांनीही आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन कर्मचाऱ्यांनी केले आहे. 

मेस्मा लावला तरी मागे हटणार नाहीशासनाने कर्मचाऱ्यांनी संप करू नये यासाठी मेस्मा लावण्याची नोटीस पाठवली आहे. मात्र या कारवाईला आम्ही घाबरत नाही आम्ही मागे हटणार नाही असा पावित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. 

मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपमहावितरण कर्मचारी यांचा खाजगी करणला विरोध आहे. याबाबत कर्मचारी हे ७२ तासाच्या संपावर गेले आहेत. याबाबत शासनाने काही तोडगा काढला नाही तर १८ जानेवारी पासून बेमुदत संप पुकारला जाणार असून पुढे होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार असेल असा इशारा कृती समितीचे सुरेश गोसावी यांनी दिला आहे.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग