शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रायगडमधील महावितरण कर्मचारी संपावर; अलिबाग येथे कर्मचाऱ्यांची निदर्शने

By राजेश भोस्तेकर | Updated: January 4, 2023 12:14 IST

विजेची समस्या निर्माण झाल्यास याला सर्वस्वी शासन जबाबदार राहणार असल्याचे संपकऱ्याचे म्हणणे आहे.

अलिबाग : शासनाने नफ्यात सुरू असलेल्या शासकीय कंपन्या उद्योजकाच्या हातात देण्याचा घाट सुरू केला आहे. नफ्यात असलेली महावितरण कंपनी ही अदाणी उद्योगाला देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना याचा फटका बसणार असून कर्मचाऱ्यांचेही नुकसान होणार आहे. आम्ही आमच्या आर्थिक कारणासाठी संप न करता अदाणी कंपनीला समांतर परवानगी देऊ नये यासाठी संप पुकारला आहे. त्यामुळे ग्राहकांना त्रास देण्याचा आमचा कोणताच हेतू नाही आहे. विजेची समस्या निर्माण झाल्यास याला सर्वस्वी शासन जबाबदार राहणार असल्याचे संपकऱ्याचे म्हणणे आहे.

रायगड जिल्ह्यातील महावितरणचे पंधराशे कर्मचारी, अधिकारी, अभियंते बुधवार पासून ७२ तासांच्या संपावर गेले आहेत. अलिबाग चेंढरे महावितरण कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून सरकार व अदाणी विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी, अधिकारी, अभियंते, महिला कर्मचारी या निदर्शनात सहभागी झाले होते. 

रायगड जिल्ह्यासह ठाणे जिल्ह्यातील काही भाग हा अदाणी समूहाकडे दिला जाणार आहे. महावितरणच्या या खाजगीकरणला सर्वं महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. वेळोवेळी आपला विरोध कर्मचाऱ्यांनी विविध मार्गाने शासनाकडे नोंदविला आहे. मात्र शासन याकडे डोळेझाक करीत आहे. त्यामुळे अखेर संपाचे अस्त्र उगारले आहे. ४ ते ६ जानेवारी असे ७२ तास संप सुरू राहणार आहे. त्यामुळे या काळात वीज गेल्यास ग्राहकांची अडचण होणार आहे. राज्यातील अनेक संच बंद झाले असून विजेचा तुटवडा जाणवणार असल्याचे संपकरी यांनी म्हटले आहे. 

रायगड जिल्ह्यातील कृती समितीच्या माध्यमातून कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. ग्राहकांना त्रास देण्याचा आमचा कोणताच हेतू नाही आहे. खाजगीकरणामुळे ग्राहकांनाही वाढीव बिले येणार आहेत. तसेच शासनाच्या विजे बाबत असलेल्या योजना बंद होणार आहेत. त्यामुळे आमच्या संपात ग्राहकांनीही आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन कर्मचाऱ्यांनी केले आहे. 

मेस्मा लावला तरी मागे हटणार नाहीशासनाने कर्मचाऱ्यांनी संप करू नये यासाठी मेस्मा लावण्याची नोटीस पाठवली आहे. मात्र या कारवाईला आम्ही घाबरत नाही आम्ही मागे हटणार नाही असा पावित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. 

मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपमहावितरण कर्मचारी यांचा खाजगी करणला विरोध आहे. याबाबत कर्मचारी हे ७२ तासाच्या संपावर गेले आहेत. याबाबत शासनाने काही तोडगा काढला नाही तर १८ जानेवारी पासून बेमुदत संप पुकारला जाणार असून पुढे होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार असेल असा इशारा कृती समितीचे सुरेश गोसावी यांनी दिला आहे.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग