शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे कोट्यवधींचे नुकसान

By admin | Updated: October 9, 2016 02:56 IST

रायगड जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा ७ सप्टेंबरपर्यंत तब्बल १२ हजार ४५२ मिमी अधिक पर्जन्यमान झाले आहे. आतापर्यंत एकूण ६२ हजार ७३४ मिमी झालेल्या विक्रमी पावसाने

- जयंत धुळप,  अलिबागरायगड जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा ७ सप्टेंबरपर्यंत तब्बल १२ हजार ४५२ मिमी अधिक पर्जन्यमान झाले आहे. आतापर्यंत एकूण ६२ हजार ७३४ मिमी झालेल्या विक्रमी पावसाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षी रायगड जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत एकूण ३३ हजार ३६५ मिमी पाऊस झाला होता. यंदा याच कालावधीत तब्बल २९ हजार ३६९ मिमी अधिक पाऊस होऊन ६२ हजार ७३४ मिमीवर पोहोचला आहे. तर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान सप्टेंबरअखेर १९९ टक्के झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट झालेल्या या पावसाने जलशिवार योजनेस मोठी साथ दिली असली तरी सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिपावसामुळे जिल्ह्यात एकूण ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुरात वाहून गेलेले ४०, दरड कोसळून मृत्युमुखी पडलेले एक आणि इतर आपत्तींमुळे ३७ मृत्यू आहेत. इतर आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या ३७ जणांमध्ये १७ वाहन अपघात, ३ तळ्याच्या पाण्यात बुडून, एक ट्रेकिंग करीत असता, एक अंगावर दगड पडून, ८ पाण्यात बुडून, एक अंगावर भिंत पडून, एक समुद्राच्या भोवऱ्यात, २ सोलनपाडा धरणात बुडून, २ विजेचा धक्का लागून तर एक झाडाची फांदी अंगावर पडून मृत झाला आहे. नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या ७८ जणांपैकी ३८ जणांना नुकसानभरपाई मिळणार आहे. प्रत्यक्षात पात्र ३८पैकी ३६ मृतांच्या वारसांना एकूण १ कोटी ४४ लाखांची आर्थिक मदत रायगड जिल्हा प्रशासनाने दिली आहे.६४ पाळीव जनावरे मृत्युमुखीजिल्ह्यातील ६४ पाळीव जनावरे अतिवृष्टीत मृत्युमूखी पडली असून, त्यांच्या मालकांना जिल्हा प्रशासनाकडून २ लाख ७० हजार रुपयांची नुकसानभरपाई आतापर्यंत देण्यात आली आहे. याशिवाय काही पंचनाम्यांवर अद्याप निर्णय अपेक्षित आहेत. महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेला अपघात नैसर्गिक आपत्तीतील मृत्यू नाही. त्यामुळे नुकसानभरपाईच्या शासन निर्णयाच्या चौकटीत बसत नसल्याने या घटनेतील मृतांचा समावेश नैसर्गिक आपत्ती मृत्यूमध्ये नाही.- यंदाच्या विक्रमी अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील १ हजार ४०३ घरांना बसला आहे. यामध्ये ३३ घरे पूर्णपणे कोसळली, ३७२ घरांचे अंशत: नुकसान झाले, ८४६ कच्ची घरे अंशत: पडली, ३३ घरांची मोठी पडझड झाली; तर ११९ गुरांचे गोठे बाधित झाले आहेत. दरम्यान, १ हजार ४०३ अतिवृष्टीबाधित घरांपैकी ८८३ घरांतील कुटुंबांना जिल्हा प्रशासनाने ६ लाख ५३ हजार १८० रुपये एकूण नुकसानभरपाई दिली आहे.