शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे कोट्यवधींचे नुकसान

By admin | Updated: October 9, 2016 02:56 IST

रायगड जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा ७ सप्टेंबरपर्यंत तब्बल १२ हजार ४५२ मिमी अधिक पर्जन्यमान झाले आहे. आतापर्यंत एकूण ६२ हजार ७३४ मिमी झालेल्या विक्रमी पावसाने

- जयंत धुळप,  अलिबागरायगड जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा ७ सप्टेंबरपर्यंत तब्बल १२ हजार ४५२ मिमी अधिक पर्जन्यमान झाले आहे. आतापर्यंत एकूण ६२ हजार ७३४ मिमी झालेल्या विक्रमी पावसाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षी रायगड जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत एकूण ३३ हजार ३६५ मिमी पाऊस झाला होता. यंदा याच कालावधीत तब्बल २९ हजार ३६९ मिमी अधिक पाऊस होऊन ६२ हजार ७३४ मिमीवर पोहोचला आहे. तर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान सप्टेंबरअखेर १९९ टक्के झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट झालेल्या या पावसाने जलशिवार योजनेस मोठी साथ दिली असली तरी सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिपावसामुळे जिल्ह्यात एकूण ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुरात वाहून गेलेले ४०, दरड कोसळून मृत्युमुखी पडलेले एक आणि इतर आपत्तींमुळे ३७ मृत्यू आहेत. इतर आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या ३७ जणांमध्ये १७ वाहन अपघात, ३ तळ्याच्या पाण्यात बुडून, एक ट्रेकिंग करीत असता, एक अंगावर दगड पडून, ८ पाण्यात बुडून, एक अंगावर भिंत पडून, एक समुद्राच्या भोवऱ्यात, २ सोलनपाडा धरणात बुडून, २ विजेचा धक्का लागून तर एक झाडाची फांदी अंगावर पडून मृत झाला आहे. नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या ७८ जणांपैकी ३८ जणांना नुकसानभरपाई मिळणार आहे. प्रत्यक्षात पात्र ३८पैकी ३६ मृतांच्या वारसांना एकूण १ कोटी ४४ लाखांची आर्थिक मदत रायगड जिल्हा प्रशासनाने दिली आहे.६४ पाळीव जनावरे मृत्युमुखीजिल्ह्यातील ६४ पाळीव जनावरे अतिवृष्टीत मृत्युमूखी पडली असून, त्यांच्या मालकांना जिल्हा प्रशासनाकडून २ लाख ७० हजार रुपयांची नुकसानभरपाई आतापर्यंत देण्यात आली आहे. याशिवाय काही पंचनाम्यांवर अद्याप निर्णय अपेक्षित आहेत. महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेला अपघात नैसर्गिक आपत्तीतील मृत्यू नाही. त्यामुळे नुकसानभरपाईच्या शासन निर्णयाच्या चौकटीत बसत नसल्याने या घटनेतील मृतांचा समावेश नैसर्गिक आपत्ती मृत्यूमध्ये नाही.- यंदाच्या विक्रमी अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील १ हजार ४०३ घरांना बसला आहे. यामध्ये ३३ घरे पूर्णपणे कोसळली, ३७२ घरांचे अंशत: नुकसान झाले, ८४६ कच्ची घरे अंशत: पडली, ३३ घरांची मोठी पडझड झाली; तर ११९ गुरांचे गोठे बाधित झाले आहेत. दरम्यान, १ हजार ४०३ अतिवृष्टीबाधित घरांपैकी ८८३ घरांतील कुटुंबांना जिल्हा प्रशासनाने ६ लाख ५३ हजार १८० रुपये एकूण नुकसानभरपाई दिली आहे.