शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

जागतिक बँकेची योजनेसाठी दिलेल्या मदतीवर नजर

By admin | Updated: July 27, 2015 03:04 IST

भारतातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये जागतिक बँक कोट्यवधी रुपयांची सढळ हस्ते मदत करीत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील

आविष्कार देसाई , अलिबागभारतातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये जागतिक बँक कोट्यवधी रुपयांची सढळ हस्ते मदत करीत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय पेयजल योजना आणि जल स्वराज्य टप्पा- दोन या प्रकल्पांचा समावेश आहे. देण्यात येणाऱ्या मदतीवर जागतिक बँकेने आपली नजर रोखली आहे. त्यांच्याकडून वेळोवेळी आढावाही घेण्यात येणार असल्याने कागदावरील आणि जमिनीवरील कृतीबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता अपडेट राहावे लागणार आहे.रायगड जिल्ह्यातील ८२४ ग्रामपंचायतींपैकी ४७१ ग्रामपंचायती निर्मल झाल्या आहेत, तर ३५३ ग्रामपंचायती निर्मल होणे बाकी आहे. या ग्रामपंचायती निर्मल करण्याकडे रायगड जिल्हा परिषदेचा कल असून २०१९ पर्यंत हे उद्दिष्ट गाठायचे आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेमार्फत प्रत्येकाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी देणे आणि जल स्वराज्य टप्पा दोनअंतर्गत टंचाईग्रस्त गावांना पिण्यासाठी शाश्वत पाणीपुरवठा करणे हे आहे. या प्रकल्पांसाठी जागतिक बँकेने कोट्यवधी रुपयांचा निधी भारत सरकारला देऊ केला आहे. या निधीचा योग्य पद्धतीने वापर होतो की नाही यासाठी जागतिक बँकेने विविध पथके नेमली आहेत. रायगड, औरंगाबाद, पुणे आणि जळगाव या चार जिल्ह्यात जागतिक बँकेचे पथक पाहणी करणार आहे. याबाबतची तयारी सुरू असल्याची माहिती उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी दिली.