शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

लोकमत न्यूज नेटवर्कजलयुक्त शिवारच्या कामात मजुरांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 02:33 IST

जलयुक्त शिवार अभियानातून सात गावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केली जाणार होती. कर्जत तालुक्यात त्या सर्व ठिकाणी लोकसहभागातून कामेच झाली नाहीत.

कर्जत : जलयुक्त शिवार अभियानातून सात गावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केली जाणार होती. कर्जत तालुक्यात त्या सर्व ठिकाणी लोकसहभागातून कामेच झाली नाहीत. त्याला कामे पूर्ण करण्याची जबाबदारी घेणारी एनजीओ आणि कृषी विभाग यांचा उदासीनपणा कारणीभूत ठरला आहे. अद्याप मजुरांना कोणताही मोबदला मिळाला नाही, त्यामुळे मजुरांची फसवणूक होत आहे.तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानासाठी २०१८साठी तब्बल दहा गावे निवडण्यात आली होती. त्यातील तीन गावांत कृषी विभाग थेट निविदा स्तरावर निधी खर्च करणार होता. त्या तीन कोटींच्या निधीमधून कळंब, कुरुंग आणि बेडीसगाव येथे ८० कामे झाली आहेत. १० गावांतील जलसंधारणाची कामे करण्यासाठी सहा कोटींचा निधी शासनाने मंजूर केला असताना त्यातील तीन कोटींमधून सात गावांत लोकसहभाग घेऊन कामे पूर्ण केली जाणार होती. त्यासाठी सलग समतर चर, अनगड दगड, जुन्या सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती, गाळ काढणे, अशी १४० कामे प्रस्तावित होती. ती कामे लोकसहभागातून करण्यासाठी कर्जत तालुक्यातील प्रकृती स्वयंसेवी संस्था पुढे आली होती. त्यांनी रायगड जिल्हाधिकाºयांना सात गावांत जलसंधारणाची कामे करण्याचे मान्य केले होते. त्यांची मागणी असल्याने तेथे प्रकृती संस्थेला सहयोग म्हणून अधिकार देण्यात आले होते. या संस्थेला नांदगाव, बलिवरे,चई, चाफेवाडी, खांडस, चेवणे, झुगरेवाडी आदी गावांत कामे करण्याचे अधिकार मार्च २०१८मध्ये देण्यात आले होते.मात्र, प्रकृती स्वयंसेवी संस्थेने केवळ दोन गावात तीन हेक्टर जमिनीवर लोकसहभागातून सलग समतर चर खोदण्याचे काम केले आहे. त्यासाठी ४५ कामगारांनी मजूर म्हणून काम केल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, दोन महिने आठवड्यातून दोन दिवस काम करणाºया मजुरांना मोबदलाच मिळाला नाही. मग कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सात गावांत कामे असतील तर ती कोणती याचे उत्तर कर्जत कृषी विभागाकडे नाही. त्यामुळे सात गावांसाठी आलेला तीन कोटींचा निधी संबंधित स्वयंसेवी संस्था कृषी विभागाच्या सहकार्याने लाटत आहे का? याची चर्चा चई गावातील शेतकरी करीत आहेत.मजुरांबद्दल प्रकृती संस्थेचे प्रमुख डॉ. शिवाजी दाम हेदेखील अवाक्षर काढत नाहीत, त्यामुळे संशय बळावला असून कृषी विभाग मजुरांना वाºयावर सोडून देत असल्याचे स्पष्ट होत आहे.प्रकृती संस्थेकडून कामे सुरू आहेत. सलग समतर चर आणि अनगड दगड यांची कामे झाली आहेत. मजुरांना त्यांच्या कामाचा मोबदला का मिळाला नाही, याची माहिती घ्यावी लागेल.- वैभव विश्वे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, कर्जतआदिवासी लोकांना कामे करण्यासाठी बोलावून घेतले. त्या मजुरांना जॉबकार्ड तयार करण्यास सांगितले; पण केले नाहीत. त्यामुळे मोबदला देखील देण्यात आला नाही. तीन गावांत केवळ एक-एक काम करण्यात आल्याने ग्रामस्थांनी एकत्र येऊनही होऊ शकणारी कामे झाली नाहीत, त्यामुळे जमिनीत पाणी मुरविण्यासाठी केली जाणारी कामे झाली नाहीत. परिणामी, आमच्या भागातील पाण्याची समस्या कायम राहिली.- कृष्णा शिंगोळे, ग्रामस्थ, चई

 

टॅग्स :Raigadरायगड