शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

तीन हजार अंगणवाड्यांना कुलूप; प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका संपावर!

By निखिल म्हात्रे | Updated: December 6, 2023 16:53 IST

मुलांच्या किलबिलाटाने गजबजणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे. 

अलिबाग : सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, भरीव मानधन जाहीर करावे, सामाजिक सुरक्षा मिळावी, या व इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका संपावर गेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने हा लढा सुरू करण्यात आला आहे. त्यांच्या संपामुळे तीन हजार ९८अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे. मुलांच्या किलबिलाटाने गजबजणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे. 

एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना गेल्या अनेक वर्षांपासून अगदी ५० रुपयांपासून ते १० हजार रुपये इतक्या तुटपुंजा मानधनावर राबविले जात आहे. लसीकरण मोहीम, गरोदर माता, स्तनदा मातांचे लसीकरण, पोषण आहार, गृहभेटी, ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार, ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना पूरक पोषण आहाराबरोबर पूर्व प्राथमिक शिक्षण, त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भौतिक विकासाच्या दृष्टीने हसत-खेळत शिक्षण देणे, ई-आकार प्रशिक्षण, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, ऑनलाइन माहिती भरणे, रजिस्टर भरणे, जनजागृतीपर कार्यक्रम राबविणे, शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे वेगवेगळे उपक्रम राबविणे, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविणे, भाग्यश्री योजनेचा लाभ मिळवून देणे, किशोरवयीन मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी निधी मिळवून देणे, आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनासोबत काम करणे, अशी अनेक कामे अंगणवाडी सेविका करीत आहेत. त्यांच्यासोबत मदतनीसांचेदेखील योगदान राहिले आहे. रायगड जिल्ह्यात तीन हजार ५५४ अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून काम करीत आहेत. सोमवारपासून संप पुकारल्याने या अंगणवाड्या बंद आहेत. त्याचा परिणाम बालकांच्या शिक्षणावर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

महिला बालविकासमंत्र्यांकडून घोर निराशारायगड जिल्ह्याच्या आमदार महिला बालविकास मंत्रिपदावर आल्यानंतर अंगणवाडी सेविकांना योग्य न्याय मिळेल अशी आशा होती. मात्र, तमाम अंगणवाडी सेविकांची घोर निराशा झाली असून, मुलांच्या जडणघडणीत महत्त्वाचा दुवा असणाऱ्या अंगणवाडी सेविकांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याची खंत तालुका अध्यक्ष जीविता पाटील यांनी व्यक्त केली.

अंगणवाडी सेविकांचा प्रश्न आयुक्तालय स्तरावर आहे. सोमवारपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. आयुक्त स्तरावर चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच तोडगा निघेल. - निर्मला कुचिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला, बालकल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद 

टॅग्स :Raigadरायगड