शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown News: रायगड जिल्ह्यात दारूच्या दुकानांसमोर रांगा; ग्राहकांच्या हातावर सॅनिटायझरचे स्प्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 02:06 IST

खरेदीसाठी झुंबड : ; सोशल डिस्टन्सिंग पाळत मद्य विक्री

अलिबाग : मंगळवारी सकाळी दारूची दुकाने उघडी होणार हे नक्की होताच रायगड जिल्ह्यातील तळीराम पहाटेपासूनच बंद असलेल्या दारूच्या दुकानासमोर रांगा लावून उभे होते. दुकान सुरू होताच ती खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. प्रत्येक जण आपला नंबर कधी येणार या प्रतीक्षेत उभा होता. दरम्यान, दुकाने सुरू झाल्यावर ग्राहकांच्या हातावर सॅनिटायझरचा स्प्रे देत सोशल डिस्टन्सिंग पाळत मद्य विक्री केली जात आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू केलेल्या संचारबंदी व लॉकडाउनला मंगळवारी ४० दिवसांचा कालावधी लोटला आहे. संचारबंदी दरम्यान मद्य विक्री बंद करण्यात आली होती. त्यामुळे मद्यपींना दारूची दुकाने उघडणार कधी, असा प्रश्न होता. लॉकडाउन कालावधीत अनधिकृत मद्य विक्रेत्यांकडून अव्वाच्या सव्वा पैसे देऊन तळीराम मद्य विकत घेत होते. तर काहींना इच्छा असूनही पैशाच्या अभावी दारू खरेदी करता येत नव्हती. त्यामुळे मद्याची दुकाने कधी सुरू होणार, याकडे तळीरामांचे लक्ष होते. अखेर मंगळवारी रायगड जिल्ह्यातील शासन आणि प्रशासनाने कोरोनाबाधित क्षेत्र वगळून मद्याची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रायगडमध्ये मंगळवार ५ मे रोजी पहाटेपासून दुकानासमोर लांबच-लांब अशा रांगा पाहावयास मिळल्या.

प्रत्येक व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मद्य विक्री सुरू केली. या वेळी मद्य खरेदी करणाऱ्या व्यक्तीला सॅनिटायझर लावूनच मद्य विक्री के ली जात आहे. त्यामुळे बीयर व वाइन शॉप चालकांनी आपल्या ग्राहकांची योग्य ती काळजी घेतली होती. रेड झोनसह आॅरेंज आणि ग्रीन झोनमधील मद्याची दुकाने सुरू करण्याची घोषणा झाल्यानंतर तळीरामांच्या आनंदाला पारावर नव्हता. ४ मे रोजी दुकाने उघडणार म्हणून दुकानासमोर रांगा लावून उभे होते. मात्र, दुकाने उघडली नसल्याने हिरमोड झाला होता.अखेर दीड महिन्यानंतर वाइन शॉप उघडले; कर्जतमध्ये खरेदीसाठी गर्दीकर्जत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन आहे, त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद आहे, ज्यापासून शासनास कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो असे वाइन शॉप मंगळवार ५ मेपासून सुमारे दीड महिन्याच्या कालावधीनंतर उघडण्यात आले आणि खरेदीसाठी सकाळपासूनच लांबच लांब रांग दिसू लागली. केंद्र सरकारने पुन्हा १७ मेपर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. मात्र या वेळी काही सवलती देण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सवलत म्हणजे देशातील दारूची दुकाने सुरू करण्यासाठी दिलेली परवानगी. त्यामुळे कर्जतमधील तळीरामांनी मंगळवारी वाइन शॉपसमोर रांग लावली होती.कर्जतमध्ये वाइन शॉप सकाळी १० वाजता उघडले, मात्र पहाटेपासूनच अनेकांनी आपला नंबर लावून ठेवला होता. वाइन शॉपमध्येमाल देण्यासाठी तीन-चार जण होते. त्यांनी तोंडाला मास्क व हातात ग्लोव्ह्ज घातले होते, बाहेर सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यासाठी माणसे उभी केली होती. ग्राहक दुकानाच्या काउंटरवर जाण्यापूर्वी त्यांच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येत होते. ज्याने मास्क लावले आहे अशांनाच बॉटल विकण्यात येत होती. सकाळपासून लांबच लांब असलेली रांग दुपारी भर उन्हात कमी होईल असे वाटत होते, मात्र कडक ऊन असूनसुद्धा रांग कमी व्हायचे नाव घेत नव्हती.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस