शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

जंजिरा किल्ला बंद होणार असल्याने स्थानिक नाराज, लाखो रुपयांच्या उलाढालीला लागणार ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:18 IST

Janjira fort : मुरुड समुद्रकिनारी व राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्याकरिता आल्याने येथील व्यावसायिकांना चांगला रोजगार मिळत असतो.

आगरदांडा : मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील समुद्रात असणारा जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी नाताळाच्या दिवशी व नववर्षाचे स्वागत करण्याकरिता लाखो पर्यटक महाराष्ट्राच्या विविध भागांतून येत असतात. मुरुड समुद्रकिनारी व राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्याकरिता आल्याने येथील व्यावसायिकांना चांगला रोजगार मिळत असतो. या रोजगारातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. परंतु कोरोना विषाणूचा नवा प्रकार लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याने त्यात ऐतिहासिक जंजिरा किल्ला बंद होत असल्याने स्थानिक व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.नाताळ सण आणि नववर्ष स्वागताचा संभाव्य जल्लोष लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्थानिक परिस्थितीनुसार रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यात सध्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी निथी चौधरी यांनी घेतला आहे. तसेच कोरोनासंबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि रिसॉर्टवर कारवाई करण्यात येणार असल्याने व्यावसायिक धास्तावले आहेत.

टॅग्स :Raigadरायगड