शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

अलिबाग-वडखळ मार्गामुळे स्थानिक रोजगार होणार नष्ट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 06:15 IST

अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गामुळे अलिबाग तालुक्यातील असंख्य रोजगार नष्ट होणार आहेत तर, हजारो घरे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यावर उपाय म्हणून वेश्वी ते चेंढरे बायपास रस्त्यापर्यंत उड्डाणपूल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता ढवळे यांनी केली. महामार्गाला अजिबात विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अलिबाग : अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गामुळे अलिबाग तालुक्यातील असंख्य रोजगार नष्ट होणार आहेत तर, हजारो घरे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यावर उपाय म्हणून वेश्वी ते चेंढरे बायपास रस्त्यापर्यंत उड्डाणपूल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता ढवळे यांनी केली. महामार्गाला अजिबात विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिका-यांना देऊन सरकारपर्यंत भावना पोचविण्याची विनंती केली.अलिबाग शहरासह तालुक्यामध्ये विकास होत आहे. त्यामुळे येथे नागरीकरणही मोठ्या संख्येने वाढले आहे. अलिबाग हे टुरिस्ट डेस्टीनेशन असल्याने वीकेन्डसह सुटीच्या हंगामामध्ये येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे अलिबाग-वडखळ या मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण येत होता. यासाठी केंद्र सरकारने अलिबाग-वडखळ मार्गाचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात केले. आता या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. तब्बल एक हजार ७०० कोटी रुपये या महामार्गासाठी खर्च केले जाणार आहेत.अलिबाग-वडखळ महामार्गाच्या लगतची जमीन संपादित केली जाणार आहे. विकासकामांना आमचा अजिबात विरोध नाही. परंतु विकास होताना सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून विकास केल्यास विकासाची खरी संकल्पना साकार होईल, असेही निवेदनात नमूद केले आहे. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी हे महत्त्वाच्या बैठकीमध्ये व्यस्त असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग तालुकाध्यक्ष मनोज धुमाळ, उपाध्यक्ष संतोष निगडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जगदीश घरत आदी उपस्थित होते.स्थानिकांवर उपासमारीची वेळराष्ट्रीय महामार्ग १६६ ए हा अलिबाग-वडखळला जोडला जाणार आहे. हा महामार्ग झाल्यास निश्चितच विकासाची नवनवीन दारे खुली होतील. परंतु या महामार्गामुळे बाधित होणाºयावर फार मोठे संकट कोसळणार आहे. या माहामार्गालगत अलिबाग तालुक्यातील चेंढरे, वेश्वी, वाडगाव, खंडाळे यासह अन्य मोठ्या ग्रामपंचायती आहेत. येथे दोन्ही बाजूंना मोठ्या संख्येने लोकवस्ती, तसेच विविध छोटे-मोठे व्यावसायिक आहेत. त्यांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. ते नष्ट झाल्यास स्थानिकांवर रोजगार बुडून उपासमारीची वेळ येणार आहे.उड्डाणपूल झाल्यास काही अंशी प्रश्न सुटणारमहामार्ग झाल्यामुळे या ग्रामपंचायती तसेच गावांना सर्व्हिस रोड दिला, तरी महामार्ग असल्याने वाहने सुसाट वेगाने जातील. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग असल्याने तेथे गतिरोधक ही टाकता येणार नाहीत. यावर उपाय म्हणून वेश्वी-चेंढरे बायपास रोड या भागामध्ये उड्डाणपूल झाल्यास काही अंशी प्रश्न सुटणार आहेत. या महामार्गावरील गोंधळपाडा, वेश्वी, स्वामी समर्थ नगर, आरसीएफ कॉलनी, सुजलाम नगर, गुरव नगर, कृष्ण दर्शन, पिंपळ भाट येथे उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोड दिल्यास हा मार्ग सोयीस्कर होणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.