शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग-वडखळ मार्गामुळे स्थानिक रोजगार होणार नष्ट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 06:15 IST

अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गामुळे अलिबाग तालुक्यातील असंख्य रोजगार नष्ट होणार आहेत तर, हजारो घरे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यावर उपाय म्हणून वेश्वी ते चेंढरे बायपास रस्त्यापर्यंत उड्डाणपूल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता ढवळे यांनी केली. महामार्गाला अजिबात विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अलिबाग : अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गामुळे अलिबाग तालुक्यातील असंख्य रोजगार नष्ट होणार आहेत तर, हजारो घरे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यावर उपाय म्हणून वेश्वी ते चेंढरे बायपास रस्त्यापर्यंत उड्डाणपूल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता ढवळे यांनी केली. महामार्गाला अजिबात विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिका-यांना देऊन सरकारपर्यंत भावना पोचविण्याची विनंती केली.अलिबाग शहरासह तालुक्यामध्ये विकास होत आहे. त्यामुळे येथे नागरीकरणही मोठ्या संख्येने वाढले आहे. अलिबाग हे टुरिस्ट डेस्टीनेशन असल्याने वीकेन्डसह सुटीच्या हंगामामध्ये येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे अलिबाग-वडखळ या मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण येत होता. यासाठी केंद्र सरकारने अलिबाग-वडखळ मार्गाचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात केले. आता या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. तब्बल एक हजार ७०० कोटी रुपये या महामार्गासाठी खर्च केले जाणार आहेत.अलिबाग-वडखळ महामार्गाच्या लगतची जमीन संपादित केली जाणार आहे. विकासकामांना आमचा अजिबात विरोध नाही. परंतु विकास होताना सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून विकास केल्यास विकासाची खरी संकल्पना साकार होईल, असेही निवेदनात नमूद केले आहे. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी हे महत्त्वाच्या बैठकीमध्ये व्यस्त असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग तालुकाध्यक्ष मनोज धुमाळ, उपाध्यक्ष संतोष निगडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जगदीश घरत आदी उपस्थित होते.स्थानिकांवर उपासमारीची वेळराष्ट्रीय महामार्ग १६६ ए हा अलिबाग-वडखळला जोडला जाणार आहे. हा महामार्ग झाल्यास निश्चितच विकासाची नवनवीन दारे खुली होतील. परंतु या महामार्गामुळे बाधित होणाºयावर फार मोठे संकट कोसळणार आहे. या माहामार्गालगत अलिबाग तालुक्यातील चेंढरे, वेश्वी, वाडगाव, खंडाळे यासह अन्य मोठ्या ग्रामपंचायती आहेत. येथे दोन्ही बाजूंना मोठ्या संख्येने लोकवस्ती, तसेच विविध छोटे-मोठे व्यावसायिक आहेत. त्यांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. ते नष्ट झाल्यास स्थानिकांवर रोजगार बुडून उपासमारीची वेळ येणार आहे.उड्डाणपूल झाल्यास काही अंशी प्रश्न सुटणारमहामार्ग झाल्यामुळे या ग्रामपंचायती तसेच गावांना सर्व्हिस रोड दिला, तरी महामार्ग असल्याने वाहने सुसाट वेगाने जातील. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग असल्याने तेथे गतिरोधक ही टाकता येणार नाहीत. यावर उपाय म्हणून वेश्वी-चेंढरे बायपास रोड या भागामध्ये उड्डाणपूल झाल्यास काही अंशी प्रश्न सुटणार आहेत. या महामार्गावरील गोंधळपाडा, वेश्वी, स्वामी समर्थ नगर, आरसीएफ कॉलनी, सुजलाम नगर, गुरव नगर, कृष्ण दर्शन, पिंपळ भाट येथे उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोड दिल्यास हा मार्ग सोयीस्कर होणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.