शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 04:11 IST

कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हासनदीवर अद्याप पूल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना नदी ओलांडताना जीवघेणा प्रवास करावा लागतो

विजय मांडेकर्जत : कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हासनदीवर अद्याप पूल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना नदी ओलांडताना जीवघेणा प्रवास करावा लागतो. बिरदोले येथून शेलू रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने आजूबाजूच्या गावातील रहिवासी नदीवर टाकलेल्या सिमेंट खांबांवरून नदी पार करतात. जीव मुठीत घेऊन नदी पार करावी लागत असल्याने ग्रामस्थांनी पुलाची मागणी केली आहे.पोशिर, बिरदोले, कोदिवले, अवसरे, वरई भागातील नोकरदार लोक तसेच उद्योग व्यवसायासाठी अनेक तरुण उल्हासनगर, बदलापूर या ठिकाणी जात असतात. त्यांना शेलू हे रेल्वेस्थानक जवळचे असल्याने ते सर्व जण उल्हासनदी पार करून रेल्वेस्टेशन गाठत असतात. पावसाळा वगळता ते सर्व लोक उल्हासनदीमधील उथळ भाग असलेल्या बिरदोले या गावाच्या पाणवठ्यावर असलेल्या भागातून बांधिवली गावाकडे नदी पार करून पोहोचतात. त्यासाठी हे ग्रामस्थ उल्हासनदीमध्ये पायी चालत जाण्यासाठी सिमेंट खांब वापरतात. साधारण पाऊण फूट ते एक फूट रुंदीचे असलेले सिमेंट खांब पावसाळा संपला की नदीजवळ आणून अंगमेहनत करून पायवाट तयार करतात. आठ महिने त्या पायवाटेने नोकरदार, कामगार वर्गाची ये-जा सुरू असते. उल्हासनदीला लागून ठेवण्यात आलेले सिमेंट खांब रात्रीच्या वेळी दिसत नसल्याने अनेक जण पाण्यात पडल्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे उल्हासनदीवर पूल बांधावा, अशी मागणी दहिवली ग्रामपंचायतीने ठराव करून केली आहे.सध्या त्या पाणवठ्यावर जाण्यासाठी बिरदोले गावातून पायवाट रस्ता आहे, तर पलीकडे देखील बांधिवली, शेलू गावातून पायवाट रस्ता आला आहे. दुसरीकडे तेथे उल्हासनदीचे पात्रदेखील अरुंद असून शासनाचा आर्थिक भारदेखील कमी होऊ शकतो, हे लक्षात घेऊन तेथे पूल बांधावा, अशी मागणी दहिवली ग्रामपंचायत महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष भगवान जामघरे यांनी केली आहे.