शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 04:11 IST

कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हासनदीवर अद्याप पूल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना नदी ओलांडताना जीवघेणा प्रवास करावा लागतो

विजय मांडेकर्जत : कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हासनदीवर अद्याप पूल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना नदी ओलांडताना जीवघेणा प्रवास करावा लागतो. बिरदोले येथून शेलू रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने आजूबाजूच्या गावातील रहिवासी नदीवर टाकलेल्या सिमेंट खांबांवरून नदी पार करतात. जीव मुठीत घेऊन नदी पार करावी लागत असल्याने ग्रामस्थांनी पुलाची मागणी केली आहे.पोशिर, बिरदोले, कोदिवले, अवसरे, वरई भागातील नोकरदार लोक तसेच उद्योग व्यवसायासाठी अनेक तरुण उल्हासनगर, बदलापूर या ठिकाणी जात असतात. त्यांना शेलू हे रेल्वेस्थानक जवळचे असल्याने ते सर्व जण उल्हासनदी पार करून रेल्वेस्टेशन गाठत असतात. पावसाळा वगळता ते सर्व लोक उल्हासनदीमधील उथळ भाग असलेल्या बिरदोले या गावाच्या पाणवठ्यावर असलेल्या भागातून बांधिवली गावाकडे नदी पार करून पोहोचतात. त्यासाठी हे ग्रामस्थ उल्हासनदीमध्ये पायी चालत जाण्यासाठी सिमेंट खांब वापरतात. साधारण पाऊण फूट ते एक फूट रुंदीचे असलेले सिमेंट खांब पावसाळा संपला की नदीजवळ आणून अंगमेहनत करून पायवाट तयार करतात. आठ महिने त्या पायवाटेने नोकरदार, कामगार वर्गाची ये-जा सुरू असते. उल्हासनदीला लागून ठेवण्यात आलेले सिमेंट खांब रात्रीच्या वेळी दिसत नसल्याने अनेक जण पाण्यात पडल्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे उल्हासनदीवर पूल बांधावा, अशी मागणी दहिवली ग्रामपंचायतीने ठराव करून केली आहे.सध्या त्या पाणवठ्यावर जाण्यासाठी बिरदोले गावातून पायवाट रस्ता आहे, तर पलीकडे देखील बांधिवली, शेलू गावातून पायवाट रस्ता आला आहे. दुसरीकडे तेथे उल्हासनदीचे पात्रदेखील अरुंद असून शासनाचा आर्थिक भारदेखील कमी होऊ शकतो, हे लक्षात घेऊन तेथे पूल बांधावा, अशी मागणी दहिवली ग्रामपंचायत महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष भगवान जामघरे यांनी केली आहे.