शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 04:11 IST

कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हासनदीवर अद्याप पूल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना नदी ओलांडताना जीवघेणा प्रवास करावा लागतो

विजय मांडेकर्जत : कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हासनदीवर अद्याप पूल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना नदी ओलांडताना जीवघेणा प्रवास करावा लागतो. बिरदोले येथून शेलू रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने आजूबाजूच्या गावातील रहिवासी नदीवर टाकलेल्या सिमेंट खांबांवरून नदी पार करतात. जीव मुठीत घेऊन नदी पार करावी लागत असल्याने ग्रामस्थांनी पुलाची मागणी केली आहे.पोशिर, बिरदोले, कोदिवले, अवसरे, वरई भागातील नोकरदार लोक तसेच उद्योग व्यवसायासाठी अनेक तरुण उल्हासनगर, बदलापूर या ठिकाणी जात असतात. त्यांना शेलू हे रेल्वेस्थानक जवळचे असल्याने ते सर्व जण उल्हासनदी पार करून रेल्वेस्टेशन गाठत असतात. पावसाळा वगळता ते सर्व लोक उल्हासनदीमधील उथळ भाग असलेल्या बिरदोले या गावाच्या पाणवठ्यावर असलेल्या भागातून बांधिवली गावाकडे नदी पार करून पोहोचतात. त्यासाठी हे ग्रामस्थ उल्हासनदीमध्ये पायी चालत जाण्यासाठी सिमेंट खांब वापरतात. साधारण पाऊण फूट ते एक फूट रुंदीचे असलेले सिमेंट खांब पावसाळा संपला की नदीजवळ आणून अंगमेहनत करून पायवाट तयार करतात. आठ महिने त्या पायवाटेने नोकरदार, कामगार वर्गाची ये-जा सुरू असते. उल्हासनदीला लागून ठेवण्यात आलेले सिमेंट खांब रात्रीच्या वेळी दिसत नसल्याने अनेक जण पाण्यात पडल्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे उल्हासनदीवर पूल बांधावा, अशी मागणी दहिवली ग्रामपंचायतीने ठराव करून केली आहे.सध्या त्या पाणवठ्यावर जाण्यासाठी बिरदोले गावातून पायवाट रस्ता आहे, तर पलीकडे देखील बांधिवली, शेलू गावातून पायवाट रस्ता आला आहे. दुसरीकडे तेथे उल्हासनदीचे पात्रदेखील अरुंद असून शासनाचा आर्थिक भारदेखील कमी होऊ शकतो, हे लक्षात घेऊन तेथे पूल बांधावा, अशी मागणी दहिवली ग्रामपंचायत महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष भगवान जामघरे यांनी केली आहे.