शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

वादळातील नुकसानग्रस्त शाळांसाठी अल्प निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 00:43 IST

म्हसळ्यातील शाळांची अवस्था अत्यंत बिकट

म्हसळा : चक्रीवादळाने म्हसळा तालुक्याची अवस्था अत्यंत बिकट असून सर्वच शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. फार मोठ्या प्रमाणात शाळांची पडझड झाली असून जिल्हा परिषदेकडून फक्त दुरुस्तीच्या मंजुरीच्या याद्याच प्रसिद्ध झाल्याचे चर्चेत आहे.अगदी प्रत्येक गावात असणाऱ्या शाळांचे छत तर काही शाळांच्या इमारतीच्या भिंती पडल्या होत्या. या चक्रीवादळामध्ये तालुक्यात प्राथमिक शाळांसाठी अंदाजे एक ते दीड कोटीचा निधी तात्पुरत्या दुरुस्तीसाठी अत्यावश्यक असून, अजून निधीचा काही ठिकाणा नसल्याचे बोलले जाते. सध्याच्या परिस्थितीत तालुक्याचे ४० शाळांसाठी २ लाख रुपयांप्रमाणे ८० लाख मंजूर झालेले असले तरीदेखील ते नुकसान झालेल्या परिस्थितीला न पुरणारा निधी असून जखमेवरती मलम लावल्यासारखे आहे. तसेच १९ शाळांसाठी सर्व शिक्षण अभियाना अंतर्गत प्रास्ताविक निधी मंजूर केला आहे. परंतु ज्या १९ शाळा सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत प्रस्तावित आहेत त्याही शाळा चक्रीवादळामध्ये उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यांनादेखील शासनाने २ लाख घोषित केलेला निधी अपेक्षित आहे. असे असताना तालुक्यासाठी निधी कमी करून का दिला, हा प्रश्न निरुत्तरच आहे.शासनाने पारित केल्याप्रमाणे चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या शाळेचा निधी त्यांना उपलब्ध करून द्यावा तरच मोडकळीस झालेल्या शाळा नव्याने उभ्या राहतील. तालुक्यात एकूण १०२ शाळा मोडकळीस आल्या आहेत. त्यापैकी आताच्या यादीनुसार एकूण ५९ शाळांना निधी मंजूर झाला. परंतु उर्वरित राहिलेल्या ४३ शाळांचा निधी कधी मिळणार, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण कोरोनाचा प्रभाव कमी होत चालला आहे. काही दिवसांतच शाळा सुरू होण्याचे चिन्ह आहे. परंतु शाळाच जर जमीनदोस्त असतील तर विद्यार्थी बसणार कोठेॽ त्याकरिता शाळा दुरुस्तीसाठी लागणारा अंदाजे ३ कोटींचा निधी मिळणे गरजेचे आहे. शाळा पूर्ववत आणि सुस्थितीत व्हाव्यात  अशी मागणी होत आहे.