शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

वादळातील नुकसानग्रस्त शाळांसाठी अल्प निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 00:43 IST

म्हसळ्यातील शाळांची अवस्था अत्यंत बिकट

म्हसळा : चक्रीवादळाने म्हसळा तालुक्याची अवस्था अत्यंत बिकट असून सर्वच शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. फार मोठ्या प्रमाणात शाळांची पडझड झाली असून जिल्हा परिषदेकडून फक्त दुरुस्तीच्या मंजुरीच्या याद्याच प्रसिद्ध झाल्याचे चर्चेत आहे.अगदी प्रत्येक गावात असणाऱ्या शाळांचे छत तर काही शाळांच्या इमारतीच्या भिंती पडल्या होत्या. या चक्रीवादळामध्ये तालुक्यात प्राथमिक शाळांसाठी अंदाजे एक ते दीड कोटीचा निधी तात्पुरत्या दुरुस्तीसाठी अत्यावश्यक असून, अजून निधीचा काही ठिकाणा नसल्याचे बोलले जाते. सध्याच्या परिस्थितीत तालुक्याचे ४० शाळांसाठी २ लाख रुपयांप्रमाणे ८० लाख मंजूर झालेले असले तरीदेखील ते नुकसान झालेल्या परिस्थितीला न पुरणारा निधी असून जखमेवरती मलम लावल्यासारखे आहे. तसेच १९ शाळांसाठी सर्व शिक्षण अभियाना अंतर्गत प्रास्ताविक निधी मंजूर केला आहे. परंतु ज्या १९ शाळा सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत प्रस्तावित आहेत त्याही शाळा चक्रीवादळामध्ये उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यांनादेखील शासनाने २ लाख घोषित केलेला निधी अपेक्षित आहे. असे असताना तालुक्यासाठी निधी कमी करून का दिला, हा प्रश्न निरुत्तरच आहे.शासनाने पारित केल्याप्रमाणे चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या शाळेचा निधी त्यांना उपलब्ध करून द्यावा तरच मोडकळीस झालेल्या शाळा नव्याने उभ्या राहतील. तालुक्यात एकूण १०२ शाळा मोडकळीस आल्या आहेत. त्यापैकी आताच्या यादीनुसार एकूण ५९ शाळांना निधी मंजूर झाला. परंतु उर्वरित राहिलेल्या ४३ शाळांचा निधी कधी मिळणार, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण कोरोनाचा प्रभाव कमी होत चालला आहे. काही दिवसांतच शाळा सुरू होण्याचे चिन्ह आहे. परंतु शाळाच जर जमीनदोस्त असतील तर विद्यार्थी बसणार कोठेॽ त्याकरिता शाळा दुरुस्तीसाठी लागणारा अंदाजे ३ कोटींचा निधी मिळणे गरजेचे आहे. शाळा पूर्ववत आणि सुस्थितीत व्हाव्यात  अशी मागणी होत आहे.