शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सात धरणांची पातळी घटली

By admin | Updated: April 18, 2016 00:36 IST

गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या धरणांमध्ये केवळ ५९ टक्केच पाणी जमा झाले होते. त्यातच आता उन्हाची दाहकता अधिक प्रमाणात वाढली आहे. या एकत्रित

- आविष्कार देसाई, अलिबाग

गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या धरणांमध्ये केवळ ५९ टक्केच पाणी जमा झाले होते. त्यातच आता उन्हाची दाहकता अधिक प्रमाणात वाढली आहे. या एकत्रित परिणामामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये २३.७४६ द.ल.घ.मी (दशलक्ष घनमीटर) पाणी शिल्लक आहे. कोथुर्डे, रानिवली, आंबेघर, पुनाडे, खैरे, वरंध आणि साळोखे या सात धरणांमध्ये ४ ते १९ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना या धरणातून पाणी खरवडून घेण्याची वेळ आली आहे.रायगड जिल्ह्यामध्ये लघुपाटबंधारे विभागांतर्गत २८ धरणांचा समावेश होतो. या सर्व धरणांची एकत्रित साठवण क्षमता ही ७१.५७५ द.ल.घ.मी. आहे. ६८.२८६ द.ल.घ.मी. एवढा पाणीसाठा वापरण्याजोगा आहे. कमी पडलेला पाऊस आणि वातावरणात वाढलेल्या उष्णता आणि धरणातील न काढलेल्या गाळामुळे पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. या धरणांच्या माध्यमातून पिण्याबरोबरच उन्हाळी शेतीसाठीही पाण्याचा वापर केला जातो. नजीकच्या कालावधीमध्ये धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घसरण होणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच उन्हाळी शेतीसाठी पाण्याची कमतरता जाणवणार आहे. या परिसरातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होणार आहेत. पाणीसंकटातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आधीच एक हजार ८६६ गाव-वाड्यांसाठी सात कोटी ८८ लाख रुपयांच्या टंचाई कृती आराखड्याचे नियोजन केले आहे. मात्र प्रशासनाची ही उपाययोजना म्हणजे तात्पुरती असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी अस्तित्वात असणाऱ्या डोंगरांवरील कॅचिंग पॉइंटवर प्रशासनाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. जेणेकरुन कॅचिंग पॉइंटवरील पाण्याचे योग्य नियोजन करून परिसरातील नद्यांना मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते. तसेच त्या नद्यांवर छोटी धरणे बांधणे गरजेचे असल्याचेही भगत यांनी स्पष्ट केले.यंदा मान्सून लवकर दाखल होणार असतानाच ‘तो जमके बरसणार’ असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. परंतु एप्रिल महिन्याचे १५ दिवस आणि संपूर्ण मे महिना अद्याप शिल्लक आहे. पाण्याचे गणित १ दशलक्ष घनमीटर म्हणजे १० लाख क्युबिक मीटर, १ क्युबिक मीटर म्हणजे १००० लिटर. २८ धरणांमध्ये २३.७४६ दलघमीप्रमाणे २ कोटी ३७ लाख ४६ हजार दलघमी पाणी आहे. याचाच अर्थ म्हणजे २३ अब्ज ७४ कोटी ६० लाख लिटर पाणी शिल्लक आहे. परंतु धरणाची साठवण क्षमता ही ६८.२८६ दलघमी आहे. यातील तफावत ही ४४.५४ दलघमीची आहे. म्हणजेच ४४ अब्ज ५४ कोटी लिटर धरणाच्या पाणीसाठ्यात पाण्याच्या नावाने ठणठण आहे.पाण्याची स्थिती२०१५ साली याच तारखेला ३२.४२५ दलघमी पाणी शिल्लक होते, तर २०१४- ३३.५३९ दलघमी, २०१३- ३०.३४६, २०१२-३०.५९८ दलघमी आणि २०११ साली ३४.५६६ दलघमी पाणी शिल्लक होते.पाणी जपून वापरण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत. नागरिकांनीही पाणी वापरायचे योग्य नियोजन न केल्यास नागरिकांचे पाण्यासाठी हाल होणार आहेत.