शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

सात धरणांची पातळी घटली

By admin | Updated: April 18, 2016 00:36 IST

गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या धरणांमध्ये केवळ ५९ टक्केच पाणी जमा झाले होते. त्यातच आता उन्हाची दाहकता अधिक प्रमाणात वाढली आहे. या एकत्रित

- आविष्कार देसाई, अलिबाग

गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या धरणांमध्ये केवळ ५९ टक्केच पाणी जमा झाले होते. त्यातच आता उन्हाची दाहकता अधिक प्रमाणात वाढली आहे. या एकत्रित परिणामामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये २३.७४६ द.ल.घ.मी (दशलक्ष घनमीटर) पाणी शिल्लक आहे. कोथुर्डे, रानिवली, आंबेघर, पुनाडे, खैरे, वरंध आणि साळोखे या सात धरणांमध्ये ४ ते १९ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना या धरणातून पाणी खरवडून घेण्याची वेळ आली आहे.रायगड जिल्ह्यामध्ये लघुपाटबंधारे विभागांतर्गत २८ धरणांचा समावेश होतो. या सर्व धरणांची एकत्रित साठवण क्षमता ही ७१.५७५ द.ल.घ.मी. आहे. ६८.२८६ द.ल.घ.मी. एवढा पाणीसाठा वापरण्याजोगा आहे. कमी पडलेला पाऊस आणि वातावरणात वाढलेल्या उष्णता आणि धरणातील न काढलेल्या गाळामुळे पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. या धरणांच्या माध्यमातून पिण्याबरोबरच उन्हाळी शेतीसाठीही पाण्याचा वापर केला जातो. नजीकच्या कालावधीमध्ये धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घसरण होणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच उन्हाळी शेतीसाठी पाण्याची कमतरता जाणवणार आहे. या परिसरातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होणार आहेत. पाणीसंकटातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आधीच एक हजार ८६६ गाव-वाड्यांसाठी सात कोटी ८८ लाख रुपयांच्या टंचाई कृती आराखड्याचे नियोजन केले आहे. मात्र प्रशासनाची ही उपाययोजना म्हणजे तात्पुरती असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी अस्तित्वात असणाऱ्या डोंगरांवरील कॅचिंग पॉइंटवर प्रशासनाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. जेणेकरुन कॅचिंग पॉइंटवरील पाण्याचे योग्य नियोजन करून परिसरातील नद्यांना मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते. तसेच त्या नद्यांवर छोटी धरणे बांधणे गरजेचे असल्याचेही भगत यांनी स्पष्ट केले.यंदा मान्सून लवकर दाखल होणार असतानाच ‘तो जमके बरसणार’ असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. परंतु एप्रिल महिन्याचे १५ दिवस आणि संपूर्ण मे महिना अद्याप शिल्लक आहे. पाण्याचे गणित १ दशलक्ष घनमीटर म्हणजे १० लाख क्युबिक मीटर, १ क्युबिक मीटर म्हणजे १००० लिटर. २८ धरणांमध्ये २३.७४६ दलघमीप्रमाणे २ कोटी ३७ लाख ४६ हजार दलघमी पाणी आहे. याचाच अर्थ म्हणजे २३ अब्ज ७४ कोटी ६० लाख लिटर पाणी शिल्लक आहे. परंतु धरणाची साठवण क्षमता ही ६८.२८६ दलघमी आहे. यातील तफावत ही ४४.५४ दलघमीची आहे. म्हणजेच ४४ अब्ज ५४ कोटी लिटर धरणाच्या पाणीसाठ्यात पाण्याच्या नावाने ठणठण आहे.पाण्याची स्थिती२०१५ साली याच तारखेला ३२.४२५ दलघमी पाणी शिल्लक होते, तर २०१४- ३३.५३९ दलघमी, २०१३- ३०.३४६, २०१२-३०.५९८ दलघमी आणि २०११ साली ३४.५६६ दलघमी पाणी शिल्लक होते.पाणी जपून वापरण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत. नागरिकांनीही पाणी वापरायचे योग्य नियोजन न केल्यास नागरिकांचे पाण्यासाठी हाल होणार आहेत.