शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

सात धरणांची पातळी घटली

By admin | Updated: April 18, 2016 00:36 IST

गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या धरणांमध्ये केवळ ५९ टक्केच पाणी जमा झाले होते. त्यातच आता उन्हाची दाहकता अधिक प्रमाणात वाढली आहे. या एकत्रित

- आविष्कार देसाई, अलिबाग

गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या धरणांमध्ये केवळ ५९ टक्केच पाणी जमा झाले होते. त्यातच आता उन्हाची दाहकता अधिक प्रमाणात वाढली आहे. या एकत्रित परिणामामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये २३.७४६ द.ल.घ.मी (दशलक्ष घनमीटर) पाणी शिल्लक आहे. कोथुर्डे, रानिवली, आंबेघर, पुनाडे, खैरे, वरंध आणि साळोखे या सात धरणांमध्ये ४ ते १९ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना या धरणातून पाणी खरवडून घेण्याची वेळ आली आहे.रायगड जिल्ह्यामध्ये लघुपाटबंधारे विभागांतर्गत २८ धरणांचा समावेश होतो. या सर्व धरणांची एकत्रित साठवण क्षमता ही ७१.५७५ द.ल.घ.मी. आहे. ६८.२८६ द.ल.घ.मी. एवढा पाणीसाठा वापरण्याजोगा आहे. कमी पडलेला पाऊस आणि वातावरणात वाढलेल्या उष्णता आणि धरणातील न काढलेल्या गाळामुळे पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. या धरणांच्या माध्यमातून पिण्याबरोबरच उन्हाळी शेतीसाठीही पाण्याचा वापर केला जातो. नजीकच्या कालावधीमध्ये धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घसरण होणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच उन्हाळी शेतीसाठी पाण्याची कमतरता जाणवणार आहे. या परिसरातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होणार आहेत. पाणीसंकटातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आधीच एक हजार ८६६ गाव-वाड्यांसाठी सात कोटी ८८ लाख रुपयांच्या टंचाई कृती आराखड्याचे नियोजन केले आहे. मात्र प्रशासनाची ही उपाययोजना म्हणजे तात्पुरती असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी अस्तित्वात असणाऱ्या डोंगरांवरील कॅचिंग पॉइंटवर प्रशासनाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. जेणेकरुन कॅचिंग पॉइंटवरील पाण्याचे योग्य नियोजन करून परिसरातील नद्यांना मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते. तसेच त्या नद्यांवर छोटी धरणे बांधणे गरजेचे असल्याचेही भगत यांनी स्पष्ट केले.यंदा मान्सून लवकर दाखल होणार असतानाच ‘तो जमके बरसणार’ असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. परंतु एप्रिल महिन्याचे १५ दिवस आणि संपूर्ण मे महिना अद्याप शिल्लक आहे. पाण्याचे गणित १ दशलक्ष घनमीटर म्हणजे १० लाख क्युबिक मीटर, १ क्युबिक मीटर म्हणजे १००० लिटर. २८ धरणांमध्ये २३.७४६ दलघमीप्रमाणे २ कोटी ३७ लाख ४६ हजार दलघमी पाणी आहे. याचाच अर्थ म्हणजे २३ अब्ज ७४ कोटी ६० लाख लिटर पाणी शिल्लक आहे. परंतु धरणाची साठवण क्षमता ही ६८.२८६ दलघमी आहे. यातील तफावत ही ४४.५४ दलघमीची आहे. म्हणजेच ४४ अब्ज ५४ कोटी लिटर धरणाच्या पाणीसाठ्यात पाण्याच्या नावाने ठणठण आहे.पाण्याची स्थिती२०१५ साली याच तारखेला ३२.४२५ दलघमी पाणी शिल्लक होते, तर २०१४- ३३.५३९ दलघमी, २०१३- ३०.३४६, २०१२-३०.५९८ दलघमी आणि २०११ साली ३४.५६६ दलघमी पाणी शिल्लक होते.पाणी जपून वापरण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत. नागरिकांनीही पाणी वापरायचे योग्य नियोजन न केल्यास नागरिकांचे पाण्यासाठी हाल होणार आहेत.