शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

आमच्या शेतजमिनी परत द्या!

By admin | Updated: July 27, 2015 03:04 IST

नगरपालिका हद्दीतील अगदी कर्जत शहराला लागून असलेली सुमारे सोळा एकर शेतजमीन शेतपिकाचे विविध प्रयोग करण्यासाठी साठ

कर्जत : नगरपालिका हद्दीतील अगदी कर्जत शहराला लागून असलेली सुमारे सोळा एकर शेतजमीन शेतपिकाचे विविध प्रयोग करण्यासाठी साठ वर्षांपूर्वी शासनाने सुरुवातीला भाडे तत्त्वावर आणि नंतर शेतकऱ्यांची संमती नसताना अत्यंत अल्प दरात घेतली आणि आता या जागेवर शासकीय कार्यालये उभारण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. असे होत असेल तर त्या जागा आम्हा शेतकऱ्यांना परत द्याव्यात अशी मागणी मूळ शेतकऱ्यांनी महसूल मंत्री, कृषी मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. १९५५ मध्ये कर्जत नगरपालिका हद्दीतील मुद्रे गावातील शेतकऱ्यांची १५ एकर ३० गुंठे शेतजमीन शासनाने भाडे तत्त्वावर घेतली आणि तेथे कोकण कृषी विद्यापीठाने प्रादेशिक कृषी केंद्र सुरु केले. उल्हास नदीवर मातीचा बंधारा बांधून तेथून या शेत जमिनीला पाणी उपलब्ध करून देण्यात आले. या प्रक्षेत्रावर विविध पिकांचे प्रयोग सुरु करण्यात आले. विशेष म्हणजे भात पैदास केंद्र म्हणून ते प्रसिद्धीला आले. १९५५ ते १९८० पर्यंत शेतकऱ्यांना एकरी मक्ता दिला गेला मात्र त्यानंतर १९८१ ला शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची संमती न घेता प्रति गुंठा केवळ २४५ रु पये म्हणजे एकरी नऊ हजार आठशे रु पये देऊन ही जागा ताब्यात घेतली त्यावेळी जमिनीचा दर कितीतरी पट होता. याबाबत तत्कालीन कुलाबा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्र ार अर्ज केले होते, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता या जागेवर शासकीय कार्यालये, सांस्कृतिक केंद्र आदी उभारण्याचा प्रयत्नही वरिष्ठ पातळीवर सुरु आहेत. विशेष म्हणजे या जागेवर शेतीचे विविध प्रयोग सुरु असताना नगरपालिकेने शासकीय कार्यालयांसाठी आरक्षण सुद्धा टाकले आहे. असे असेल तर ज्या हेतूसाठी आमच्या जमिनी घेतल्या आहेत तो हेतू बाजूला करून अन्य वापरासाठी या जमिनीचा उपयोग करण्यात येणार असेल तर आमच्या शेतजमिनी आम्हाला परत द्याव्यात, अशी मागणी शेतकरीवर्गाने केली आहे. सध्या ज्या प्रक्षेत्रावर विविध पिकांचे प्रयोग होत आहेत त्यासाठी उन्हाळ्यात पाणी नसल्याने कितीतरी वेळा प्रयोग वाया गेले आहेत. शासनाने राजनाला विभागात प्रादेशिक कृषी केंद्राला जागा द्यावी म्हणजे बारमाही शेतीसाठी पाणी मिळेल व शेतीचे प्रयोग यशस्वी होतील. आम्हाला आमच्या शेतजमिनी परत द्या, नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनाने दिला आहे. (वार्ताहर)