शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
4
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
5
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
6
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
7
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
8
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
9
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
10
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
11
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
12
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
13
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
14
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
15
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
16
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
17
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
18
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
19
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
20
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!

एलईडी, पर्ससीन मासेमारीमुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:09 IST

रेवस बंदरात ५०० बोटी उभ्या; उपासमारीची वेळ; मच्छीमारांचा आंदोलनाचा इशारा

अलिबाग : एलईडी पर्ससीन पद्धतीच्या बेसुमार मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून त्यांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे; त्याचबरोबर अनेक मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या असून, भविष्यात सुमारे ४० मत्स्य प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाचे नियंत्रण नसल्यामुळे बंदी असतानाही एलईडी-पर्ससीन मासेमारी सुरू असल्याने पारंपरिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.रेवस परिसरातील मासेमारी करणाऱ्या तब्बल ३०० टॉलर्स १ फेब्रुवारीपासून २२ दिवस खाडीत उभ्याच आहेत. त्यामुळे परिसरातील मच्छीमार हतबल झाले असून, सरकारने कडक कारवाई करून एलईडी पर्ससीन मासेमारी पूर्णपणे बंद केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा मच्छीमारांकडून देण्यात आला आहे.शासनाने एलईडी दिव्यांच्या साह्याने मासेमारी करण्यावर निर्बंध घातले आहेत. त्याचबरोबर पर्ससीन, बुलनेट पद्धतीने मासेमारी करण्यावरही प्रतिबंध आहे. मात्र तरीही मच्छीमार मोठ्या प्रमाणात पर्ससीन तसेच एलईडी दिव्यांचा वापर करून बेसुमार मासेमारी करीत आहेत. वारंवार तक्र ारी करूनही जिल्हा प्रशासनाने एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांवर कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही. एलईडी मच्छीमारीमुळे पारंपरिक मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे. त्याचा संसार उसनवारीवर सुरू आहे. ही उपासमार थांबायची असेल तर एलईडी पद्धतीची मच्छीमारी बंद व्हायला हवी, अशी भूमिका मच्छीमार बांधवांनी घेतली आहे. आम्हीही अशा प्रकारे बेसुमार मासेमारी करू शकतो; पण तसे केल्याने आमच्या भावी पिढ्यांसाठी समुद्रातील मत्स्यसंपदा तसेच अनेक प्रजाती नष्ट झालेल्या असतील, असे पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणारे अंकुश गोवर्धन कोळी, धनाजी गणपत कोळी यांनी सांगितले.पर्ससीन आणि एलईडी मासेमारी करणाºया बोटींद्वारे मुंबई ते रत्नागिरी परिसरातील समुद्रात १२ नोटिकलच्या आत आणि बाहेरही बेसुमार मासेमारी सुरू आहे. यात मोठ्या प्रमाणावर पैसा दिसत असल्याने मोठे भांडवलदार यात उतरलेत. एकेक बोट ३ दिवसांत २० ते ३० टन सर्व प्रकारचे लहानमोठे मासे गोळा करीत असल्याने संपूर्ण परिसरात एकही मासा उरत नसल्याने पारंपरिक पद्धतीने मासेमारीसाठी जाणाºया बोटींना हात हलवत परत यावे लागत आहे.प्रत्येक फेरीसाठी बर्फ, डिझेल, पगारावर केलेला खर्चही पाण्यात जात आहे. साधारणत: एका ट्रिपसाठी ४.५० लाखांचा खर्च वाया जात असल्याचे मच्छीमार सांगतात. त्यामुळे आमच्या बोटी उभ्या ठेवण्यावाचून पर्याय उरला नाही. अशीच परिस्थिती कायम राहिली तर तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेण्यावाचून पर्याय उरणार नाही. समुद्र आमची शेती आहे. ती आयुष्यभर जगवायची आहे, जाळायची नसल्याचे कमल्या नाखवा या मच्छीमाराने सांगितले.एलईडी, पर्ससीन मासेमारांनी संपूर्ण दर्याच नष्ट केला आहे. बांधलेल्या बोटींचे पैसे फेडायचे तरी कसे? आम्ही खायचे काय? आणि जगायचे कसे, असा प्रश्न तुळशीबाई चंदर कोळी यांनी उपस्थित केला आहे.