शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

एलईडी, पर्ससीन मासेमारीमुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:09 IST

रेवस बंदरात ५०० बोटी उभ्या; उपासमारीची वेळ; मच्छीमारांचा आंदोलनाचा इशारा

अलिबाग : एलईडी पर्ससीन पद्धतीच्या बेसुमार मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून त्यांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे; त्याचबरोबर अनेक मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या असून, भविष्यात सुमारे ४० मत्स्य प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाचे नियंत्रण नसल्यामुळे बंदी असतानाही एलईडी-पर्ससीन मासेमारी सुरू असल्याने पारंपरिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.रेवस परिसरातील मासेमारी करणाऱ्या तब्बल ३०० टॉलर्स १ फेब्रुवारीपासून २२ दिवस खाडीत उभ्याच आहेत. त्यामुळे परिसरातील मच्छीमार हतबल झाले असून, सरकारने कडक कारवाई करून एलईडी पर्ससीन मासेमारी पूर्णपणे बंद केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा मच्छीमारांकडून देण्यात आला आहे.शासनाने एलईडी दिव्यांच्या साह्याने मासेमारी करण्यावर निर्बंध घातले आहेत. त्याचबरोबर पर्ससीन, बुलनेट पद्धतीने मासेमारी करण्यावरही प्रतिबंध आहे. मात्र तरीही मच्छीमार मोठ्या प्रमाणात पर्ससीन तसेच एलईडी दिव्यांचा वापर करून बेसुमार मासेमारी करीत आहेत. वारंवार तक्र ारी करूनही जिल्हा प्रशासनाने एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांवर कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही. एलईडी मच्छीमारीमुळे पारंपरिक मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे. त्याचा संसार उसनवारीवर सुरू आहे. ही उपासमार थांबायची असेल तर एलईडी पद्धतीची मच्छीमारी बंद व्हायला हवी, अशी भूमिका मच्छीमार बांधवांनी घेतली आहे. आम्हीही अशा प्रकारे बेसुमार मासेमारी करू शकतो; पण तसे केल्याने आमच्या भावी पिढ्यांसाठी समुद्रातील मत्स्यसंपदा तसेच अनेक प्रजाती नष्ट झालेल्या असतील, असे पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणारे अंकुश गोवर्धन कोळी, धनाजी गणपत कोळी यांनी सांगितले.पर्ससीन आणि एलईडी मासेमारी करणाºया बोटींद्वारे मुंबई ते रत्नागिरी परिसरातील समुद्रात १२ नोटिकलच्या आत आणि बाहेरही बेसुमार मासेमारी सुरू आहे. यात मोठ्या प्रमाणावर पैसा दिसत असल्याने मोठे भांडवलदार यात उतरलेत. एकेक बोट ३ दिवसांत २० ते ३० टन सर्व प्रकारचे लहानमोठे मासे गोळा करीत असल्याने संपूर्ण परिसरात एकही मासा उरत नसल्याने पारंपरिक पद्धतीने मासेमारीसाठी जाणाºया बोटींना हात हलवत परत यावे लागत आहे.प्रत्येक फेरीसाठी बर्फ, डिझेल, पगारावर केलेला खर्चही पाण्यात जात आहे. साधारणत: एका ट्रिपसाठी ४.५० लाखांचा खर्च वाया जात असल्याचे मच्छीमार सांगतात. त्यामुळे आमच्या बोटी उभ्या ठेवण्यावाचून पर्याय उरला नाही. अशीच परिस्थिती कायम राहिली तर तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेण्यावाचून पर्याय उरणार नाही. समुद्र आमची शेती आहे. ती आयुष्यभर जगवायची आहे, जाळायची नसल्याचे कमल्या नाखवा या मच्छीमाराने सांगितले.एलईडी, पर्ससीन मासेमारांनी संपूर्ण दर्याच नष्ट केला आहे. बांधलेल्या बोटींचे पैसे फेडायचे तरी कसे? आम्ही खायचे काय? आणि जगायचे कसे, असा प्रश्न तुळशीबाई चंदर कोळी यांनी उपस्थित केला आहे.