शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेवस बंदरातील लाँच सेवा ‘गाळा’त, प्रवासी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:06 IST

मांडवा आणि रेवस ही रायगड जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीसाठी सर्वात व्यस्त असणारी बंदरे आहेत. फरक इतकाच आहे की, मांडवा बंदरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक प्रवास करतात, तर रेवस बंदरातून सर्वसामान्य चाकरमानी प्रवास करताना दिसून येतात.

- आविष्कार देसाईअलिबाग : मांडवा आणि रेवस ही रायगड जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीसाठी सर्वात व्यस्त असणारी बंदरे आहेत. फरक इतकाच आहे की, मांडवा बंदरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक प्रवास करतात, तर रेवस बंदरातून सर्वसामान्य चाकरमानी प्रवास करताना दिसून येतात. मेरीटाइम बोर्डाने बंदरातील गाळ काढताना रेवस बंदराकडे दुर्लक्ष केल्याने येथील लाँच सेवेच्या वेळापत्रकावर आहोटीमुळे विपरीत परिणाम झाला आहे, त्यामुळे या बंदरातून प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मांडवा बंदरातून थेट गेट वे आॅफ इंडिया (मुंबई) अगदी कमी वेळेत जाता येते. काही वर्षांत बंदराचा झपाट्याने विकास झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खासगी लाँच सेवा देणाºया संस्था उभ्या राहिल्या आहेत. आरामदायी प्रवासाबरोबरच सुरक्षित प्रवासामुळे या ठिकाणाहून प्रवासी बोटींच्या नियमित फेºया होत असतात. बोट सेवा देणाºया खासगी कंपन्यांना आणि मेरीटाइम बोर्डाला त्यामुळे चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. या बंदराची चांगल्या पद्धतीने देखभाल केली जाते. ओहोटीमुळे बोटसेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी बंदरातील गाळ काढण्याचे काम नियमित केले जाते. २०१७-१८ या कालावधीत मे. रॉक अ‍ॅण्ड रिफ ड्रेजिंग प्रा. लि. कंपनीने एक लाख ७२ हजार ५५७ घनमीटर गाळ काढला होता, तर २०१८-१९ या कालावधीमध्ये दोन लाख ५१ हजार ५५२ घनमीटर गाळ मे. रॉक अ‍ॅण्ड रिफ ड्रेजिंग प्रा. लि. या खासगी कंपनीनेच काढला आहे. यासाठी अनुक्रमे सहा कोटी ७२ लाख ९७ हजार २३० आणि नऊ कोटी ८१ लाख पाच हजार २८० असा एकूण १६ कोटी ५४ लाख दोन हजार ५१० रुपये खर्च करण्यात आला आहे. मांडवा येथील बंदरातून मोठ्या प्रमाणात नियमित गाळ काढला जात असल्याचे दिसून येते.रेवसला सर्वसामान्य नागरिकांची पसंतीरेवस बंदरातून सर्वसामान्य प्रवासी प्रवास करतात, तर मांडवा बंदरातून आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे प्रवास करतात. या बंदरातील गाळ काढण्याचे काम मेरीटाइम बोर्ड चोखपणे बजावताना दिसते. मात्र, रेवस बंदराबाबत उदासीनता दिसून येते.रेवस बंदरातील गाळ वेळेवर काढला जात नसल्यामुळे सद्यस्थितीतील तेथील लाँच सेवेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. रेवस बंदरावर मुंबई जलवाहतूक व औद्योगिक संस्थेच्या सूचनाफलकाखाली २२ नोव्हेंबरपासून २५ नोव्हेंबरपर्यंत ओहोटीच्या समस्येमुळे बदललेले वेळापत्रक लिहिले आहे. या वेळापत्रकामुळे प्रवाशांचेही वेळापत्रक कोलमडले आहे.ओहोटीच्या वेळी प्रवासात अडचणीरेवस बंदरातून मुंबई आणि करंजा असा जलप्रवास सुरू असतो. १ जून ते ३१ सप्टेंबरपर्यंत रेवस-मुंबई जलप्रवास पावसाळी हंगामामुळे बंद ठेवण्यात येतो. तर करंजा ते रेवस हा जलप्रवास कमी अंतराचा असल्याने वर्षाचे बाराही महिने सुरू असतो. रेवस आणि करंजा बंदरात गाळाची समस्या असल्याने संकष्टी चतुर्थीसह अन्य तिथीला ओहोटीच्या वेळी प्रवासात फार मोठा अडथळा निर्माण होतो. महिनाभर मेरीटाइम बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली रेवस बंदरात गाळ काढण्याचे काम सुरू आहे; पण गाळाची समस्या कायमस्वरूपी सुटत नाही.मांडवा बंदरातील गाळ काढण्याकरिता खासगी ठेकेदारासाठी सुमारे साडेसोळा कोटी रुपये सरकारने उधळले आहेत. त्याची चौकशीची मागणी राज्याच्या गृहविभागाकडे केली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मांडवा बंदरातून प्रवास करणारे हे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, तर रेवस बंदरातून सर्वसामान्य प्रवास करतात. त्यामुळे मेरीटाइम बोर्ड या बंदराकडे दुर्लक्ष करत आहे. मेरीटाइम बोर्डाने हा दुजाभाव बंद करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.११ हजार २५० घनमीटर गाळ काढलारेवस बंदराचा विचार केल्यास एप्रिल-मार्च २०१७ त्यानंतर १५ आॅक्टोबर २०१८ पासून आतापर्यंत सुमारे ११ हजार २५० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. रेवस बंदरातील गाळ काढण्याचे काम मेरीटाइम बोर्डाकडून सुरू आहे, अशी माहिती मेरीटाइम बंदराचे बंदर निरीक्षक आशिष मानकर यांनी ‘लोकमत’ला दिली.मांडवा बंदरातून होणाºया प्रवासी वाहतुकीसाठी चांगल्या दर्जाच्या लाँच प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत. लाँच सेवेचे तिकीटदर १५० रुपयांपासून १८५ रुपयांपर्यंत आहेत, तर रेवस ते भाऊचा धक्का (मुंबई) सुमारे ८० रुपये तिकीटदर आहे. हा दर मांडव्यापेक्षा खूपच कमी असल्याने सर्वसामान्य येथून मुंबईला जाणे पसंत करतात आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना ते परवडणारे आहे.

टॅग्स :Raigadरायगड