शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रेवस बंदरातील लाँच सेवा ‘गाळा’त, प्रवासी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:06 IST

मांडवा आणि रेवस ही रायगड जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीसाठी सर्वात व्यस्त असणारी बंदरे आहेत. फरक इतकाच आहे की, मांडवा बंदरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक प्रवास करतात, तर रेवस बंदरातून सर्वसामान्य चाकरमानी प्रवास करताना दिसून येतात.

- आविष्कार देसाईअलिबाग : मांडवा आणि रेवस ही रायगड जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीसाठी सर्वात व्यस्त असणारी बंदरे आहेत. फरक इतकाच आहे की, मांडवा बंदरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक प्रवास करतात, तर रेवस बंदरातून सर्वसामान्य चाकरमानी प्रवास करताना दिसून येतात. मेरीटाइम बोर्डाने बंदरातील गाळ काढताना रेवस बंदराकडे दुर्लक्ष केल्याने येथील लाँच सेवेच्या वेळापत्रकावर आहोटीमुळे विपरीत परिणाम झाला आहे, त्यामुळे या बंदरातून प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मांडवा बंदरातून थेट गेट वे आॅफ इंडिया (मुंबई) अगदी कमी वेळेत जाता येते. काही वर्षांत बंदराचा झपाट्याने विकास झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खासगी लाँच सेवा देणाºया संस्था उभ्या राहिल्या आहेत. आरामदायी प्रवासाबरोबरच सुरक्षित प्रवासामुळे या ठिकाणाहून प्रवासी बोटींच्या नियमित फेºया होत असतात. बोट सेवा देणाºया खासगी कंपन्यांना आणि मेरीटाइम बोर्डाला त्यामुळे चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. या बंदराची चांगल्या पद्धतीने देखभाल केली जाते. ओहोटीमुळे बोटसेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी बंदरातील गाळ काढण्याचे काम नियमित केले जाते. २०१७-१८ या कालावधीत मे. रॉक अ‍ॅण्ड रिफ ड्रेजिंग प्रा. लि. कंपनीने एक लाख ७२ हजार ५५७ घनमीटर गाळ काढला होता, तर २०१८-१९ या कालावधीमध्ये दोन लाख ५१ हजार ५५२ घनमीटर गाळ मे. रॉक अ‍ॅण्ड रिफ ड्रेजिंग प्रा. लि. या खासगी कंपनीनेच काढला आहे. यासाठी अनुक्रमे सहा कोटी ७२ लाख ९७ हजार २३० आणि नऊ कोटी ८१ लाख पाच हजार २८० असा एकूण १६ कोटी ५४ लाख दोन हजार ५१० रुपये खर्च करण्यात आला आहे. मांडवा येथील बंदरातून मोठ्या प्रमाणात नियमित गाळ काढला जात असल्याचे दिसून येते.रेवसला सर्वसामान्य नागरिकांची पसंतीरेवस बंदरातून सर्वसामान्य प्रवासी प्रवास करतात, तर मांडवा बंदरातून आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे प्रवास करतात. या बंदरातील गाळ काढण्याचे काम मेरीटाइम बोर्ड चोखपणे बजावताना दिसते. मात्र, रेवस बंदराबाबत उदासीनता दिसून येते.रेवस बंदरातील गाळ वेळेवर काढला जात नसल्यामुळे सद्यस्थितीतील तेथील लाँच सेवेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. रेवस बंदरावर मुंबई जलवाहतूक व औद्योगिक संस्थेच्या सूचनाफलकाखाली २२ नोव्हेंबरपासून २५ नोव्हेंबरपर्यंत ओहोटीच्या समस्येमुळे बदललेले वेळापत्रक लिहिले आहे. या वेळापत्रकामुळे प्रवाशांचेही वेळापत्रक कोलमडले आहे.ओहोटीच्या वेळी प्रवासात अडचणीरेवस बंदरातून मुंबई आणि करंजा असा जलप्रवास सुरू असतो. १ जून ते ३१ सप्टेंबरपर्यंत रेवस-मुंबई जलप्रवास पावसाळी हंगामामुळे बंद ठेवण्यात येतो. तर करंजा ते रेवस हा जलप्रवास कमी अंतराचा असल्याने वर्षाचे बाराही महिने सुरू असतो. रेवस आणि करंजा बंदरात गाळाची समस्या असल्याने संकष्टी चतुर्थीसह अन्य तिथीला ओहोटीच्या वेळी प्रवासात फार मोठा अडथळा निर्माण होतो. महिनाभर मेरीटाइम बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली रेवस बंदरात गाळ काढण्याचे काम सुरू आहे; पण गाळाची समस्या कायमस्वरूपी सुटत नाही.मांडवा बंदरातील गाळ काढण्याकरिता खासगी ठेकेदारासाठी सुमारे साडेसोळा कोटी रुपये सरकारने उधळले आहेत. त्याची चौकशीची मागणी राज्याच्या गृहविभागाकडे केली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मांडवा बंदरातून प्रवास करणारे हे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, तर रेवस बंदरातून सर्वसामान्य प्रवास करतात. त्यामुळे मेरीटाइम बोर्ड या बंदराकडे दुर्लक्ष करत आहे. मेरीटाइम बोर्डाने हा दुजाभाव बंद करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.११ हजार २५० घनमीटर गाळ काढलारेवस बंदराचा विचार केल्यास एप्रिल-मार्च २०१७ त्यानंतर १५ आॅक्टोबर २०१८ पासून आतापर्यंत सुमारे ११ हजार २५० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. रेवस बंदरातील गाळ काढण्याचे काम मेरीटाइम बोर्डाकडून सुरू आहे, अशी माहिती मेरीटाइम बंदराचे बंदर निरीक्षक आशिष मानकर यांनी ‘लोकमत’ला दिली.मांडवा बंदरातून होणाºया प्रवासी वाहतुकीसाठी चांगल्या दर्जाच्या लाँच प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत. लाँच सेवेचे तिकीटदर १५० रुपयांपासून १८५ रुपयांपर्यंत आहेत, तर रेवस ते भाऊचा धक्का (मुंबई) सुमारे ८० रुपये तिकीटदर आहे. हा दर मांडव्यापेक्षा खूपच कमी असल्याने सर्वसामान्य येथून मुंबईला जाणे पसंत करतात आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना ते परवडणारे आहे.

टॅग्स :Raigadरायगड