शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

सोगाव येथील बालग्राममध्ये ‘नो चाइल्ड अलोन’ मोहिमेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:12 IST

सन १९६४ मध्ये निराधार मुलांना कौटुंबिक आधार मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या एसओएस या आंतरराष्ट्रीय संस्थेने १५ मे या आंतरराष्ट्रीय कुटुंबदिनानिमित्त ‘नो चाइल्ड अलोन’ या जागतिक मोहिमेचा शुभारंभ केला आहे.

- जयंत धुळपअलिबाग : सन १९६४ मध्ये निराधार मुलांना कौटुंबिक आधार मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या एसओएस या आंतरराष्ट्रीय संस्थेने १५ मे या आंतरराष्ट्रीय कुटुंबदिनानिमित्त ‘नो चाइल्ड अलोन’ या जागतिक मोहिमेचा शुभारंभ केला आहे. भारतातील एसओएस इंडिया या संस्थेच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे कार्यरत एसओएस बालग्रामच्या वतीने देखील ‘नो चाइल्ड अलोन’ या मोहिमेचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला.भारतातील निराधार पालकहीन मुलांना कौटुंबिक आधार मिळवून देण्याची नितांत गरज आहे. काळाची गरज म्हणून एसओएस इंडिया या सामाजिक संस्थेने ‘नो चाइल्ड अलोन’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन एसओएस इंडिया या सामाजिक संस्थेचे सजिण अनुजा बन्सल यांनी केले आहे.भारतातील दोन कोटी निराधार मुलांच्या अडचणी जगासमोर आणण्यासाठी व एसओएसमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा यासाठी ही मोहीम समर्पित आहे. या २ कोटी मुलांची पुरेशी काळजी घेतली जात नाही. कारण त्यांनी आपले दोन्ही किंवा एक पालक गमावले आहेत किंवा पालक या मुलांचे पालन पोषण करण्यास सक्षम नाहीत. अशा कुटुंबाचे सक्षमीकरण नाही झाले आणि या मुलांना पुरेशी काळजी किंवा देखभाल सेवा मिळाली नाही तर ही संख्या २०२१ पर्यंत ४ कोटी एवढ्या भयंकर प्रमाणात वाढण्याची शक्यता विचारात घेऊन ‘नो चाइल्ड अलोन’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.एसओएस सध्या ४४० कुटुंबे तसेच २६ हजार मुलांसाठी संस्थेच्या कौटुंबिक वातावरणात मुलांची काळजी कार्यक्र म व कुटुंब सक्षमीकरण कार्यक्र माच्या माध्यमातून सेवा देत आहे. एसओएस बालग्राम सोगाव अलिबाग येथे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्यात येत आहे. ‘कुटुंब आणि पर्यावरण’ हा यावर्षीचा कुटुंब दिनाचा विषय आहे. या कार्यक्र माच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना मुलांचे आरोग्य, शिक्षण, मूल्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. एसओएस संस्था पालकदिन, निराधार मुलांची काळजी व देखभाल यासाठी कार्यरत असल्याचे अनुजा बन्सल यांनी सांगीतले.सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यकसंयुक्त राष्ट्राच्या बालहक्क परिषदेनुसार मुलांच्या योग्य वाढीसाठी कुटुंब हेच उत्तम ठिकाण आहे. कुटुंबामध्येच मुलांना प्रेम, काळजी, संरक्षण मिळू शकते. भारतातील या निराधार पालकहीन मुलांना कौटुंबिक आधार मिळवून देण्याची गरज आहे.काळाची गरज म्हणून एसओएस इंडिया या सामाजिक संस्थेने नो चाइल्ड अलोन ही मोहीम राबविली आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी ८५८६९९६६९९ याक्र मांकावर मिसकॉल देऊन आपला सहभाग नागरिक नोंदवू शकतात.

टॅग्स :Raigadरायगड