शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सोगाव येथील बालग्राममध्ये ‘नो चाइल्ड अलोन’ मोहिमेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:12 IST

सन १९६४ मध्ये निराधार मुलांना कौटुंबिक आधार मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या एसओएस या आंतरराष्ट्रीय संस्थेने १५ मे या आंतरराष्ट्रीय कुटुंबदिनानिमित्त ‘नो चाइल्ड अलोन’ या जागतिक मोहिमेचा शुभारंभ केला आहे.

- जयंत धुळपअलिबाग : सन १९६४ मध्ये निराधार मुलांना कौटुंबिक आधार मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या एसओएस या आंतरराष्ट्रीय संस्थेने १५ मे या आंतरराष्ट्रीय कुटुंबदिनानिमित्त ‘नो चाइल्ड अलोन’ या जागतिक मोहिमेचा शुभारंभ केला आहे. भारतातील एसओएस इंडिया या संस्थेच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे कार्यरत एसओएस बालग्रामच्या वतीने देखील ‘नो चाइल्ड अलोन’ या मोहिमेचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला.भारतातील निराधार पालकहीन मुलांना कौटुंबिक आधार मिळवून देण्याची नितांत गरज आहे. काळाची गरज म्हणून एसओएस इंडिया या सामाजिक संस्थेने ‘नो चाइल्ड अलोन’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन एसओएस इंडिया या सामाजिक संस्थेचे सजिण अनुजा बन्सल यांनी केले आहे.भारतातील दोन कोटी निराधार मुलांच्या अडचणी जगासमोर आणण्यासाठी व एसओएसमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा यासाठी ही मोहीम समर्पित आहे. या २ कोटी मुलांची पुरेशी काळजी घेतली जात नाही. कारण त्यांनी आपले दोन्ही किंवा एक पालक गमावले आहेत किंवा पालक या मुलांचे पालन पोषण करण्यास सक्षम नाहीत. अशा कुटुंबाचे सक्षमीकरण नाही झाले आणि या मुलांना पुरेशी काळजी किंवा देखभाल सेवा मिळाली नाही तर ही संख्या २०२१ पर्यंत ४ कोटी एवढ्या भयंकर प्रमाणात वाढण्याची शक्यता विचारात घेऊन ‘नो चाइल्ड अलोन’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.एसओएस सध्या ४४० कुटुंबे तसेच २६ हजार मुलांसाठी संस्थेच्या कौटुंबिक वातावरणात मुलांची काळजी कार्यक्र म व कुटुंब सक्षमीकरण कार्यक्र माच्या माध्यमातून सेवा देत आहे. एसओएस बालग्राम सोगाव अलिबाग येथे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्यात येत आहे. ‘कुटुंब आणि पर्यावरण’ हा यावर्षीचा कुटुंब दिनाचा विषय आहे. या कार्यक्र माच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना मुलांचे आरोग्य, शिक्षण, मूल्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. एसओएस संस्था पालकदिन, निराधार मुलांची काळजी व देखभाल यासाठी कार्यरत असल्याचे अनुजा बन्सल यांनी सांगीतले.सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यकसंयुक्त राष्ट्राच्या बालहक्क परिषदेनुसार मुलांच्या योग्य वाढीसाठी कुटुंब हेच उत्तम ठिकाण आहे. कुटुंबामध्येच मुलांना प्रेम, काळजी, संरक्षण मिळू शकते. भारतातील या निराधार पालकहीन मुलांना कौटुंबिक आधार मिळवून देण्याची गरज आहे.काळाची गरज म्हणून एसओएस इंडिया या सामाजिक संस्थेने नो चाइल्ड अलोन ही मोहीम राबविली आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी ८५८६९९६६९९ याक्र मांकावर मिसकॉल देऊन आपला सहभाग नागरिक नोंदवू शकतात.

टॅग्स :Raigadरायगड