शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

पाचाडमध्ये शिवसृष्टीसाठी जमिनीचे संपादन अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 02:43 IST

रायगड किल्ल्याच्या संवर्धनांतर्गत महाड तालुक्यातील पाचाड येथे शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे.

- आविष्कार देसाई अलिबाग : रायगड किल्ल्याच्या संवर्धनांतर्गत महाड तालुक्यातील पाचाड येथे शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. शिवसृष्टी उभारण्यासाठी ८७ एकर जमिनीची आवश्यकता आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाला ५० एकर जमिनीचे संपादन करण्यात यश आले आहे. उर्वरित जमिनीचे संपादन लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.शिवसृष्टी ज्या जमिनीवर उभी केली जाणार आहे ती सर्व जमीन खासगी मालकीची आहे. शिवाजी महाराजांविषयी प्रत्येकाच्या मनात आत्मीयता आहे. आपल्या राजाच्या शिवसृष्टीसाठी जमीन लागणार असल्याने कोणत्याच जमीन मालकाने आढेवेढे घेतले नाहीत. त्यामुळेच जमिनीचे संपादन करताना कोणतीच अडचण आली नसल्याची माहिती महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली.सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या या किल्ल्याला भारताच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला आहे. १६ व्या शतकातील या किल्ल्याला त्यांनी आपली राजधानी बनवली. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा याच किल्ल्यावर पार पडला आहे. इंग्रजांनी किल्ला ताब्यात घेतल्यानंतर त्याची नासधूस केली होती. सध्या रायगड किल्ला महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडे संरक्षित आहे.शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची गाथा सर्वदूर पसरावी यासाठी सरकारने येथे विविध सुविधा पुरवण्यासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे.सुविधा पुरवल्याने येथे मोठ्या संख्येने देश-विदेशातील पर्यटक येऊन तेथील स्थानिकांनाही रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. रायगड किल्ल्याचा विकास करताना या ठिकाणी शिवसृष्टीही उभारण्यात येणार आहे. शिवसृष्टीसाठी ८७ एकर जागेचे संपादन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ८७ एकर जागेमध्ये सुमारे ४८ खोतदार आहेत. त्यांच्या जमिनी घेताना २०१३ चा भूसंपादन कायदा लागू करण्यात आला आहे. भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. निवाडे जाहीर झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा आर्थिक मोबदला दिला जाणार आहे. आतापर्यंत ८७ एकरपैकी ५० एकर जमीन प्रशासनाने संपादित केली आहे. उर्वरित जमिनीचे संपादन लवकरच पूर्ण करून सदरची जमिनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द केली जाणार असल्याची माहिती विठ्ठल इनामदार यांनी दिली. ८७ एकर जागेमधील सुमारे सात एकर जागा ही रस्त्यासाठी लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.