शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

शालेय पोषण आहारात लेंड्या

By admin | Updated: September 11, 2015 23:41 IST

विद्यार्थी सुदृढ होऊन देशाचे भविष्य घडवावे असे स्वप्न पाहून शालेय पोषण आहारात खिचडी, दूध, तांदूळ, अंडी, केळी आणि आता संपूर्ण कडधान्ययुक्त जेवण प्राथमिक व माध्यमिक

- अमोल जंगम,  म्हसळाविद्यार्थी सुदृढ होऊन देशाचे भविष्य घडवावे असे स्वप्न पाहून शालेय पोषण आहारात खिचडी, दूध, तांदूळ, अंडी, केळी आणि आता संपूर्ण कडधान्ययुक्त जेवण प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सरकारकडून दिले जात आहे. मात्र सरकारकडून शाळांना दिला जाणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा मिळत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडत आहे. म्हसळा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये शुक्रवारी पोषण आहार आला. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख सुशील यादव यांनी पोषण आहाराची पाहणी केली असता तांदळाच्या बोरीमध्ये उंदरांच्या लेंड्या, दगड व माती आढळून आली. त्याचबरोबर तांदळाच्या बोरीचे वजन केले असता वजन देखील पोहच पावतीवर नमूद असल्यापेक्षा कमी प्रमाणात आढळून आले.पन्नास किलोच्या बोरीमध्ये ४७ ते ४८ किलो धान्यच भरत होते. डाळ, तेल हे देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले. महाराष्ट्र स्टेट को-आॅप कन्झुमर फेडरेशन मुंबई यांच्याकडून हे धान्य जिल्ह्यातील वितरक व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत ओसवाल यांच्या येथे येते, तेथून ते धान्य महाड येथील वितरक महामुणकर यांच्याकडे आल्यानंतर धान्य कोंढे येथील कासरुंग या सब वितरकाकडे येते. तेथून ते धान्य म्हसळा व श्रीवर्धनमधील शाळांमध्ये वितरण केले जाते.जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळा मिळून एकूण ३,२५९ शाळांना पोषण आहार वितरीत केला जातो. एका शाळेच्या पोषण आहारामध्ये २० ते २५ किलोची घट मिळत असली तर या यंत्रणेमध्ये दर महिन्याला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अधिकारी व वितरकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख सुशील यादव यांनी केला आहे. जिल्ह्यातील सर्व वितरकांचे परवाने रद्द करण्याची मागणी देखील केली आहे. म्हसळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आला आहे हे समजताच शालेय समितीचे सदस्य बाबू बनकर यांनी तिथे येऊन पोषण आहाराचा गट शिक्षण अधिकारी जळगावकर व केंद्र प्रमुख धामणकर यांच्या समक्ष पंचनामा करून नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. 50 किलोच्या बोरीमध्ये ४७ ते ४८ किलो धान्यच भरत होते. डाळ, तेल हे देखील निकृष्ट दर्जाचे आढळून आले. तर तेलाच्या पाकीटचे पॅकिंग घरी बसून बनवले असल्याचे निदर्शनास येत आहे. शालेय पोषण आहारासाठी आलेले धान्य निकृष्ट होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी म्हसळा पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक मालुसरे यांनी सांगितले.3259 शाळांना पोषण आहार वितरीत केला जातो. एका शाळेच्या पोषण आहारमध्ये २० ते २५ किलोची घट मिळत असली तर या यंत्रणेमध्ये लाखो रु पयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे.