शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शालेय पोषण आहारात लेंड्या

By admin | Updated: September 11, 2015 23:41 IST

विद्यार्थी सुदृढ होऊन देशाचे भविष्य घडवावे असे स्वप्न पाहून शालेय पोषण आहारात खिचडी, दूध, तांदूळ, अंडी, केळी आणि आता संपूर्ण कडधान्ययुक्त जेवण प्राथमिक व माध्यमिक

- अमोल जंगम,  म्हसळाविद्यार्थी सुदृढ होऊन देशाचे भविष्य घडवावे असे स्वप्न पाहून शालेय पोषण आहारात खिचडी, दूध, तांदूळ, अंडी, केळी आणि आता संपूर्ण कडधान्ययुक्त जेवण प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सरकारकडून दिले जात आहे. मात्र सरकारकडून शाळांना दिला जाणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा मिळत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडत आहे. म्हसळा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये शुक्रवारी पोषण आहार आला. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख सुशील यादव यांनी पोषण आहाराची पाहणी केली असता तांदळाच्या बोरीमध्ये उंदरांच्या लेंड्या, दगड व माती आढळून आली. त्याचबरोबर तांदळाच्या बोरीचे वजन केले असता वजन देखील पोहच पावतीवर नमूद असल्यापेक्षा कमी प्रमाणात आढळून आले.पन्नास किलोच्या बोरीमध्ये ४७ ते ४८ किलो धान्यच भरत होते. डाळ, तेल हे देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले. महाराष्ट्र स्टेट को-आॅप कन्झुमर फेडरेशन मुंबई यांच्याकडून हे धान्य जिल्ह्यातील वितरक व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत ओसवाल यांच्या येथे येते, तेथून ते धान्य महाड येथील वितरक महामुणकर यांच्याकडे आल्यानंतर धान्य कोंढे येथील कासरुंग या सब वितरकाकडे येते. तेथून ते धान्य म्हसळा व श्रीवर्धनमधील शाळांमध्ये वितरण केले जाते.जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळा मिळून एकूण ३,२५९ शाळांना पोषण आहार वितरीत केला जातो. एका शाळेच्या पोषण आहारामध्ये २० ते २५ किलोची घट मिळत असली तर या यंत्रणेमध्ये दर महिन्याला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अधिकारी व वितरकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख सुशील यादव यांनी केला आहे. जिल्ह्यातील सर्व वितरकांचे परवाने रद्द करण्याची मागणी देखील केली आहे. म्हसळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आला आहे हे समजताच शालेय समितीचे सदस्य बाबू बनकर यांनी तिथे येऊन पोषण आहाराचा गट शिक्षण अधिकारी जळगावकर व केंद्र प्रमुख धामणकर यांच्या समक्ष पंचनामा करून नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. 50 किलोच्या बोरीमध्ये ४७ ते ४८ किलो धान्यच भरत होते. डाळ, तेल हे देखील निकृष्ट दर्जाचे आढळून आले. तर तेलाच्या पाकीटचे पॅकिंग घरी बसून बनवले असल्याचे निदर्शनास येत आहे. शालेय पोषण आहारासाठी आलेले धान्य निकृष्ट होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी म्हसळा पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक मालुसरे यांनी सांगितले.3259 शाळांना पोषण आहार वितरीत केला जातो. एका शाळेच्या पोषण आहारमध्ये २० ते २५ किलोची घट मिळत असली तर या यंत्रणेमध्ये लाखो रु पयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे.