शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

‘लाख’मोलाच्या दहीहंडींनी वेधले गोविंदांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:49 IST

जिल्ह्यात गोपाळकाला जल्लोषात। आकर्षक चित्ररथांचाही सहभाग

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये लाखो रुपयांचे बक्षीस दहीहंडी फोडण्यासाठी लावण्यात आले होते, त्यामुळे याच दहीहंडी नागरिकांच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी होत्या. काही ठिकाणी चित्ररथ सजावट स्पर्धेचे आयोजन करून गोपाळकाला उत्सवात पारंपरिकतेचा नूर आणल्याचे दिसून आले.

अलिबागमधील भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते आणि शेकापचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या दहीहंडींसाठी अनुक्रमे दीड लाख आणि एक लाख रुपयांचे बक्षीस लावण्यात आल्याने मुंबईतील काही गोविंदा पथकांनी येथे हजेरी लावल्याचे दिसून आले. या ‘लाख’मोलाच्या दहीहंडी फोडण्याचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

सकाळपासूनच गोविंदा पथके हंडी फोडण्यासाठी बाहेर पडली. पावसाने पाठ फिरवली असतानाही गोविंदांचा उत्साह तूसभरही कमी झालेला नव्हता. दिवसभर जिल्ह्यात असेच चित्र पाहायला मिळत होते. विशेष म्हणजे, महिला गोविंदा पथकांची संख्याही वाढली असल्याचे त्यांच्या उपस्थितीवरून दिसून आले. महिलावर्गासाठी खास हंडी बांधण्यात आल्या होत्या. शहरी भागात उत्साहाला उधाण होते. दहीहंडी पाहण्यासाठी लहान मुले आणि महिलांची मोठ्या संख्येने गर्दी होती.

ग्रामीण भागात मात्र गोपाळकाल्याचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. त्या ठिकाणी सनई, खालूबाजाच्या तालावर गोविंदा पथके फेर धरून नाचताना दिसून आली. प्रसाद म्हणून मिळणारे दही, ताक-पोहे यांच्यावरही त्यांच्याकडून ताव मारण्यात आला.जिल्ह्यातील लाख-दीड लाख रु पयांची बक्षिसे असलेल्या दहीहंडी सर्वांचेच आकर्षण ठरल्या. अलिबाग, पनवेल, पेण, उरण, कर्जत, रोहे, महाड, गोरेगाव, पाली या शहरांतील लाखमोलाच्या दहीहंडी फोडण्यासाठी विविध पथकांनीही हजेरी लावली होती. शुक्रवारी रात्री उशिरा श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये या निमित्ताने भजन, कीर्तन, पूजापाठ असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.सोंगाची परंपराकोकणामध्ये दहीहंडी उत्सवामध्ये सोंग काढण्याची परंपरा बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. अलिबाग कोळीवाडा परिसरातून आजही पौराणिक, ऐतिहासिक तसेच सद्यस्थितीवर भाष्य करणारी सोंगे काढण्यात आली होती. त्यामध्ये यंत्रावरील चलचित्रांचा वापर न करता कलाकारांचा त्यामध्ये थेट सहभाग घेऊन देखावा उभा करण्यात आला होता. शहरातील विविध भागातून हे चित्ररथ फिरवण्यात आले, ते पाहण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.