शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

निवडणूक मतमोजणीत नियोजनाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 00:31 IST

उमेदवार, प्रतिनिधींचे पावसात हाल : भिजत पाहावे लागले निकाल

नेरळ : कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या ३१ आॅगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी घेण्यात आली. कर्जत तहसील कार्यालयात झालेल्या या मतमोजणी वेळी निवडणूक प्रशासनाने उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना पावसाचा मोठा फटका बसला. पावसात उभे राहून ताटकळत भिजत आपले निकाल उमेदवारांना घ्यावे लागले.

कर्जत तालुक्यातील नेरळ, वाकस, उमरोली, रजपे, जामरुख या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका ३१ आॅगस्ट रोजी घेण्यात आल्या होत्या. दोन दिवस सुट्टी असल्याने मंगळवार, ३ सप्टेंबर रोजी कर्जत तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती. मतमोजणी सुरू होताच पावसाने जोरदार सुरुवात केल्याने सुमारे तीन तास उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधी तसेच पत्रकार यांना पावसात भिजत बाहेर ताटकळत उभे राहावे लागले. मतमोजणी कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात घेण्यात आली, त्या वेळी उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना खिडकीत उभे राहून पावसात छत्री घेऊन ताटकळत, भिजत आपले निकाल घ्यावे लागले. या वेळी प्रशासनाने उमेदवारांसाठी आसन व्यवस्था करणे गरजेचे होते; परंतु कोणतीही उपाययोजना केली नसल्याने उमेदवारांनी निवडणूक प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. 

टॅग्स :Electionनिवडणूकalibag-acअलीबाग