शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

अपघात विभागात सोयी-सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 01:50 IST

जिल्हा सरकारी रु ग्णालय : परिसरात अस्वच्छता, रु ग्णांची गैरसोय

निखिल म्हात्रे 

अलिबाग : अपघात विभागात रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी कमकुवत असलेली यंत्रणा, उपचारानंतर हात धुण्यासाठी नसलेले वॉशबेसिन त्याचप्रमाणे अपघात विभागात कुठल्याच फोनला नसलेले नेटवर्कअशा एक ना अनेक कारणांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभाग सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसून येते.

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रु ग्णालय समस्यांच्या गर्तेत असताना आता याची झळ अपघात विभागालाही बसली आहे. अपघात विभागही अत्याधुनिक सेवांपासून वंचित असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. महिला रु ग्ण असल्यास त्यांच्यासाठी या अपघात विभागात विशेष सुविधा केली नसल्याने त्यांना सर्वांना एकाच ठिकाणी उपचार करावे लागत आहेत. तर दुसरीकडे या अपघात विभागात कुठल्याच फोनला नेटवर्क नसल्याने संपर्क साधण्यासाठी रुग्णालय परिसरामध्ये यावे लागत आहे. फोन न लागण्याचा मनस्ताप हा रुग्णांच्या नातेवाइकांसह डॉक्टरांनाही होत आहे.अलिबाग येथील रुग्णालयामध्ये जिल्ह्यातील कानाकोपºयातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असतात. त्या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही असतात. रुग्णालयामध्ये सोयी-सुविधा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यामध्ये महामार्ग, कोकण रेल्वे, विविध कंपन्यांचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडतच असतात. तातडीने रुग्णांची तपासणी करण्यासाठी २४ तास अपघात विभाग कार्यरत असतो. मात्र, याच ठिकाणी सोयी-सुविधांची वानवा असल्याने सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.जिल्हा रु ग्णालयाच्या आवारात गटाराच्या अर्धवट तुटलेल्या टाक्या, समोरच पडलेला कचारा हा थेट अपघात विभागाच्या समोरील भागातच असल्याने याची दुर्गंधी थेट अपघात विभागात पसरत आहे. येथे येणाºया वासानेच ड्युटीवर असलेले डॉक्टर्स व कर्मचारी हैराण झाले आहेत.1कोेट्यवधी रु पये खर्च करून जिल्हा सामान्य रु ग्णालयाची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, सध्या या रु ग्णालयाची अवस्था पाहता कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला आहे. इमारतीच्या अपघात विभागात छताचे पाणी अक्षरश: गळत आहे. येथे अपघात झालेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार होतात.2अशा गलिच्छ अवस्थेत सध्या रु ग्णांना उपचार घ्यावे लागत असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अपघात विभागात रु ग्णांवर उपचार करून झाल्यावर डॉक्टर्सना हात धुण्यासाठी अवश्यक असलेले वॉश बेसिन नाही, तसेच टॉयलेटची व्यवस्थाही नाही. अशा दुरवस्थेमुळे सध्या अपघात विभागात ड्युटीवर असलेल्या डॉक्टर्स, नर्स व शिपाई या सर्व कर्मचाऱ्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.सध्याचा अपघात विभाग तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आला आहे. सखी केंद्राच्या ठिकाणी लवकरच १० बेडचा अपघात विभाग उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. रुग्णालयाच्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात येतील.- डॉ. प्रमोद गवई,प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक 

टॅग्स :Raigadरायगड