शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अपघात विभागात सोयी-सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 01:50 IST

जिल्हा सरकारी रु ग्णालय : परिसरात अस्वच्छता, रु ग्णांची गैरसोय

निखिल म्हात्रे 

अलिबाग : अपघात विभागात रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी कमकुवत असलेली यंत्रणा, उपचारानंतर हात धुण्यासाठी नसलेले वॉशबेसिन त्याचप्रमाणे अपघात विभागात कुठल्याच फोनला नसलेले नेटवर्कअशा एक ना अनेक कारणांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभाग सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसून येते.

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रु ग्णालय समस्यांच्या गर्तेत असताना आता याची झळ अपघात विभागालाही बसली आहे. अपघात विभागही अत्याधुनिक सेवांपासून वंचित असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. महिला रु ग्ण असल्यास त्यांच्यासाठी या अपघात विभागात विशेष सुविधा केली नसल्याने त्यांना सर्वांना एकाच ठिकाणी उपचार करावे लागत आहेत. तर दुसरीकडे या अपघात विभागात कुठल्याच फोनला नेटवर्क नसल्याने संपर्क साधण्यासाठी रुग्णालय परिसरामध्ये यावे लागत आहे. फोन न लागण्याचा मनस्ताप हा रुग्णांच्या नातेवाइकांसह डॉक्टरांनाही होत आहे.अलिबाग येथील रुग्णालयामध्ये जिल्ह्यातील कानाकोपºयातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असतात. त्या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही असतात. रुग्णालयामध्ये सोयी-सुविधा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यामध्ये महामार्ग, कोकण रेल्वे, विविध कंपन्यांचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडतच असतात. तातडीने रुग्णांची तपासणी करण्यासाठी २४ तास अपघात विभाग कार्यरत असतो. मात्र, याच ठिकाणी सोयी-सुविधांची वानवा असल्याने सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.जिल्हा रु ग्णालयाच्या आवारात गटाराच्या अर्धवट तुटलेल्या टाक्या, समोरच पडलेला कचारा हा थेट अपघात विभागाच्या समोरील भागातच असल्याने याची दुर्गंधी थेट अपघात विभागात पसरत आहे. येथे येणाºया वासानेच ड्युटीवर असलेले डॉक्टर्स व कर्मचारी हैराण झाले आहेत.1कोेट्यवधी रु पये खर्च करून जिल्हा सामान्य रु ग्णालयाची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, सध्या या रु ग्णालयाची अवस्था पाहता कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला आहे. इमारतीच्या अपघात विभागात छताचे पाणी अक्षरश: गळत आहे. येथे अपघात झालेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार होतात.2अशा गलिच्छ अवस्थेत सध्या रु ग्णांना उपचार घ्यावे लागत असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अपघात विभागात रु ग्णांवर उपचार करून झाल्यावर डॉक्टर्सना हात धुण्यासाठी अवश्यक असलेले वॉश बेसिन नाही, तसेच टॉयलेटची व्यवस्थाही नाही. अशा दुरवस्थेमुळे सध्या अपघात विभागात ड्युटीवर असलेल्या डॉक्टर्स, नर्स व शिपाई या सर्व कर्मचाऱ्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.सध्याचा अपघात विभाग तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आला आहे. सखी केंद्राच्या ठिकाणी लवकरच १० बेडचा अपघात विभाग उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. रुग्णालयाच्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात येतील.- डॉ. प्रमोद गवई,प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक 

टॅग्स :Raigadरायगड