शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

भातकापणीसाठी मजूर महागले

By admin | Updated: October 24, 2016 01:47 IST

अवकाळी पावसाचा काही भरवसा नसल्याने तालुक्यातील सर्वच गाव-पाडयांत शेतकऱ्यांनी हळव्या भातकापणीच्या कामांनी वेग पकडला आहे.

विक्रमगड : अवकाळी पावसाचा काही भरवसा नसल्याने तालुक्यातील सर्वच गाव-पाडयांत शेतकऱ्यांनी हळव्या भातकापणीच्या कामांनी वेग पकडला आहे. सर्वच आदिवासी शेतकरीवर्गाने आपल्या रितीप्रमाणे शेतवरील देवतांना नारळ फोडून कापणीच्या कामाला लागलेला आहे. मात्र हा हंगाम भातकापणीचा असल्याने सर्वत्र शेतावर हीच कामे चालू आहेत. त्यामुळे या हंगामात कुणीही व्यक्ती मोकळा दिसत नाही.अगर त्यांस कामाची आवश्यकता नसते. कारण आपल्याच शेतावरील काम भरपूर असल्याने दुसरीकडे जाण्यास वेळस नसतो. भातकापणीची कामे एकच वेळेस सर्वत्र चालू झाल्याने आता मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही भागात कापणीची कामे खोळंबली आहेत.विक्रमगड तालुक्यातील ८६ गावे व अनेक पाडे असून ८५८५ हेक्टर क्षे़त्रावर भाताची लागवड केली जाते. येथील शेतकरी झिनी, सुरती, गुजरात-११, गुजरात-४, रत्ना, जया, सुवर्णा, कर्जत, मसुरी आदीविध भातांच्या वाणांची लागवड करुन उत्पन्न घेतात. येथील गावठी भाताच्या वाण प्रसिध्द असून त्याची मागणीही मोठी आहे.या भागात भाताचेच मोठे व एकच उदरनिर्वाहाचे साधन असल्याने या भागाला भातशेतीचे कोठार म्हणून ओळखले जात आहे. तालुक्यात कारखानदारी एम.आय.डी.सी वा कोणतेही मोठे धंदे नसल्याने येथील शेतीव्यवसायांवरच अवलंबून असलेल्या मजुरांना चार महिने हाताला काम मिळते. परंतु सर्वत्र शेती केली जात असल्याने प्रत्येक कुटुंबे आपल्या शेतावर काम करण्यातच चार महिने निघून जात असल्याने भातलावणीसाठी व अन्य शेतीच्या कामांसाठी इतर शेतकऱ्यांना तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा, नाशिक या ठिकाणाहुन मजूर आणावे लागत आहेत. या मजुरांना दररोज २०० ते ३०० रु मजुरीप्रमाणे मोजावे लागणार असून शिवाय दोन वेळच्या जेवणाचा खर्च द्यावा लागतो. मात्र मजुरी वाढलेली असली तरीही मजुरांअभावी भात संपुष्टांत येण्याच्या मार्गावर आहे. (वार्ताहर) हा ग्रामीण आदिवासी भागत असल्याने येथे मजुरांची संख्या मोठी आहे. जे शेत मजुरीची कामे करु शकतात असे मजूर बोटींवर मासेमारीकरिता जात असतात. तसेच बिल्डींगची कामे, नदी व खाडीकिनारी वर्षभर रेती काढण्याकरिता जात आहेत. यामुळे भातशेतीसाठी हंगामात मिळणारे मजूर मिळत नसल्याने भातपिकाची कामे कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यातच श्रीमंत शेतकरी शेतामध्ये स्वत: राबत नसल्याने मजूर लावूनच शेती करीत असल्याने त्यांना तर मोठा फटका बसलेला आहे.