शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

भातकापणीसाठी मजूर महागले

By admin | Updated: October 24, 2016 01:47 IST

अवकाळी पावसाचा काही भरवसा नसल्याने तालुक्यातील सर्वच गाव-पाडयांत शेतकऱ्यांनी हळव्या भातकापणीच्या कामांनी वेग पकडला आहे.

विक्रमगड : अवकाळी पावसाचा काही भरवसा नसल्याने तालुक्यातील सर्वच गाव-पाडयांत शेतकऱ्यांनी हळव्या भातकापणीच्या कामांनी वेग पकडला आहे. सर्वच आदिवासी शेतकरीवर्गाने आपल्या रितीप्रमाणे शेतवरील देवतांना नारळ फोडून कापणीच्या कामाला लागलेला आहे. मात्र हा हंगाम भातकापणीचा असल्याने सर्वत्र शेतावर हीच कामे चालू आहेत. त्यामुळे या हंगामात कुणीही व्यक्ती मोकळा दिसत नाही.अगर त्यांस कामाची आवश्यकता नसते. कारण आपल्याच शेतावरील काम भरपूर असल्याने दुसरीकडे जाण्यास वेळस नसतो. भातकापणीची कामे एकच वेळेस सर्वत्र चालू झाल्याने आता मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही भागात कापणीची कामे खोळंबली आहेत.विक्रमगड तालुक्यातील ८६ गावे व अनेक पाडे असून ८५८५ हेक्टर क्षे़त्रावर भाताची लागवड केली जाते. येथील शेतकरी झिनी, सुरती, गुजरात-११, गुजरात-४, रत्ना, जया, सुवर्णा, कर्जत, मसुरी आदीविध भातांच्या वाणांची लागवड करुन उत्पन्न घेतात. येथील गावठी भाताच्या वाण प्रसिध्द असून त्याची मागणीही मोठी आहे.या भागात भाताचेच मोठे व एकच उदरनिर्वाहाचे साधन असल्याने या भागाला भातशेतीचे कोठार म्हणून ओळखले जात आहे. तालुक्यात कारखानदारी एम.आय.डी.सी वा कोणतेही मोठे धंदे नसल्याने येथील शेतीव्यवसायांवरच अवलंबून असलेल्या मजुरांना चार महिने हाताला काम मिळते. परंतु सर्वत्र शेती केली जात असल्याने प्रत्येक कुटुंबे आपल्या शेतावर काम करण्यातच चार महिने निघून जात असल्याने भातलावणीसाठी व अन्य शेतीच्या कामांसाठी इतर शेतकऱ्यांना तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा, नाशिक या ठिकाणाहुन मजूर आणावे लागत आहेत. या मजुरांना दररोज २०० ते ३०० रु मजुरीप्रमाणे मोजावे लागणार असून शिवाय दोन वेळच्या जेवणाचा खर्च द्यावा लागतो. मात्र मजुरी वाढलेली असली तरीही मजुरांअभावी भात संपुष्टांत येण्याच्या मार्गावर आहे. (वार्ताहर) हा ग्रामीण आदिवासी भागत असल्याने येथे मजुरांची संख्या मोठी आहे. जे शेत मजुरीची कामे करु शकतात असे मजूर बोटींवर मासेमारीकरिता जात असतात. तसेच बिल्डींगची कामे, नदी व खाडीकिनारी वर्षभर रेती काढण्याकरिता जात आहेत. यामुळे भातशेतीसाठी हंगामात मिळणारे मजूर मिळत नसल्याने भातपिकाची कामे कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यातच श्रीमंत शेतकरी शेतामध्ये स्वत: राबत नसल्याने मजूर लावूनच शेती करीत असल्याने त्यांना तर मोठा फटका बसलेला आहे.