शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

कोयना प्रकल्पग्रस्तांची बुधवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 03:28 IST

२४ प्रलंबित मागण्यांवर चर्चा : राज्य पुनर्वसन प्राधिकरण उपाध्यक्ष माधव भंडारी यांची उपस्थिती

अलिबाग : नवी मुंबईतील सिडकोची २४ एकर जमीन कोयना प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली खासगी बिल्डरला देण्याचे प्रकरण एकीकडे गाजत आहे. मात्र, खरे कोयना प्रकल्पग्रस्त गेली सहा दशके वाऱ्यावरच आहेत. त्यांच्या ३५ वसाहती, १२ वाड्यांमधील समस्यांना कोणीही वाली नाही.

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या चौथ्या पिढीपर्यंत सुरू असलेल्या विविध आंदोलनांची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी येत्या २९ आॅगस्ट रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात, कोयना प्रकल्पग्रस्तांसाठीच्या रायगड जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या अनुषंगाने विशेष बैठकीचे आयोजन केलेआहे. कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. कोयना धरण १९५६ ते १९६२ या काळात वीजनिर्मितीसाठी उभारण्यात आले. धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकºयांचे रायगडमध्ये पुनर्वसन करण्यात आले. मात्र, कोयना धरण जलविद्युत प्रकल्प व कोयना अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यामुळे विस्थापितांच्या पुनर्वसनांतीच्या प्रलंबित समस्या गेल्या ६० वर्षांत सुटल्या असून एकूण २४ प्रमुख मागण्या प्रलंबित असल्याचे कोयना प्रकल्पग्रस्त शेतकरी सेवा संघ रायगड या संस्थेचे अध्यक्ष आनंद मरागजे यांनी सांगितले.

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या जीवन-मरणाशी निगडित प्रमुख २४ मागण्यांमध्ये, मूळ खातेदार - शासन निर्णय १९९९ प्रमाणो किमान चार एकर पर्यायी जमीन मागणी प्रस्तावास मंजुरीचे लेखी आदेश पत्र देऊन त्या जमिनीचे मोजणी व ७/१२, ६ अ फेरफाराला वारसांची नावे नोंद करून मिळणे, बिगर खातेदारास शासन निर्णयाप्रमाणे पर्यायी जमीन प्रस्तावास मंजुरीचे आदेश पत्र देऊन पुढील कार्यवाही करणे,घर संपादित खातेदार - शासन निर्णयाप्रमाणे एक एकर पर्यायी जमीन मागणी प्रस्तावास मंजुरीचे लेखी आदेश पत्र देऊन पुढील कार्यवाही करणे, बलुतेदार खातेदारांची एकपेक्षा अधिक वसाहतीमध्ये जमीन शासनाने संपादित केलेली असून त्यांना संपादित जमिनीचा पर्यायी जमीन मोबदला मिळणे,भूमिहीन शेतकरी खातेदाराला भूमिहीन दर्जा देऊन उदरनिर्वाहासाठी शासन निर्णयाप्रमाणो एक एकर जमीन वाटप करणे व तलाठी पंचनामा करून यादी निश्चित करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Koyana Damकोयना धरणRaigadरायगड