शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

खारपाडा टोलवसुली बंद

By admin | Updated: August 28, 2015 23:23 IST

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पाताळगंगा नदीवर १९९८-९९ साली बांधलेल्या खारपाडा ब्रिजची टोल आकारणी शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद झाली. या ब्रिजचा बांधकाम खर्च

पेण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पाताळगंगा नदीवर १९९८-९९ साली बांधलेल्या खारपाडा ब्रिजची टोल आकारणी शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद झाली. या ब्रिजचा बांधकाम खर्च ३३ कोटी ३० लाख आयआरबी बिल्डर्स आणि जोईर व्हेंचर अमेय डेव्हलपर्स यांनी केला होता. ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ या बीओटी तत्त्वावर गेली १५ वर्षे या ब्रिजच्या टोल आकारणीतून जून २०१५ पर्यंत १२१ कोटी १७ लाख ४० हजारांची टोलवसुली करण्यात आली आहे. जुलै व आॅगस्ट महिन्यांत टोल आकारणी वसुलीच्या रकमेचा समावेश केल्यास हा आकडा १२५ कोटींच्या घरात जाण्यात शक्यता आहे. बांधकाम खर्चाच्या चौपटीपेक्षा जास्त रुपयांची झालेली करवसुली आयआरबीने केली आहे. टोलवसुलीची अंतिम तारीख संपण्यापूर्वीच आयआरबी बिल्डर्सने आपले सामान हलवाहलवी करण्यास सुरुवात केली आहे. या ब्रिजचे सर्व अधिकार एनएचआयचे प्रकल्प संचालक फेगडे व सहाय्यक प्रकल्प संचालक आगरखाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.खारपाडा टोलनाक्यावर खारपाडा गाव व परिसरातील अनेक कुटुंबे या ठिकाणी काकडी, टरबूज, कलिंगड व इतर फळांच्या काप करून प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये १० रुपये प्रति वाटा याप्रमाणे प्रवासी व वाहनचालकांना फळे विकून रोजीरोटी कमावित होते. नाक्यावर वाहने थांबणार नसल्याने याठिकाणचा फ्रूटसॅलेडचा धंदा बंद होणार आहे. गेली १५ वर्षे या ५० ते ६० कुटुंबांना या टोलनाक्याने चांगला रोजगार मिळत होता तो बंद होणार आहे त्यामुळे खारपाडा टोल बंद झाल्यावर या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांवर मोठा आघात होणार आहे. (वार्ताहर)वर्षनिहाय टोलवसुलीवर्षवसुली (लाखांत)१९९९ - २०००४१५.८१ २००० - २००१४१६.०० २००१ - २००२६७५.००२००२ - २००३६८१.०० २००३ - २००४६३९.०० २००४ - २००५६८४.०० २००५ - २००६९६०.०० २००६ - २००७८६७.८० २००७ - २००८७४९.३३ २००८ - २००९७०५.१५ २००९ - २०१०६७२.२२ २०१० - २०११७४१.५२ २०११ - २०१२७४८.४५ २०१२ - २०१३८५९.६५ २०१३ - २०१४८२२.३० २०१४ - २०१५८५३.१२ २०१५ - २०१६२२७.४० एकूण१२१,१७.८१ बीओटी तत्त्वावर गेली १५ वर्षे या ब्रिजच्या टोल आकारणीतून जून २०१५ पर्यंत १२१ कोटी १७ लाख ४० हजारांची टोलवसुली करण्यात आली आहे. स्थानिकांचा रोजगार बंद : खारपाडा टोलनाक्यावर काम करणाऱ्या ५० ते ६० स्थानिक रोजंदारी कामगारांची रोजीरोटी बंद होणार आहे. या कामगारांनी गेली पंधरा वर्षे आयआरबी बिल्डर्स कंपनीचा वसुलीचा आर्थिक व्यवहार सांभाळला. त्यांच्या पंधरा वर्षांच्या श्रमाचा प्रश्न व सर्व्हिस रकमेबाबत पेणचे आ. धैर्यशील पाटील यांनी ठेकेदार कंपनी व्यवस्थापनाशी सामंजस्य तडजोड करून निकाली काढला आहे.