शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

खारपाडा टोलवसुली बंद

By admin | Updated: August 28, 2015 23:23 IST

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पाताळगंगा नदीवर १९९८-९९ साली बांधलेल्या खारपाडा ब्रिजची टोल आकारणी शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद झाली. या ब्रिजचा बांधकाम खर्च

पेण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पाताळगंगा नदीवर १९९८-९९ साली बांधलेल्या खारपाडा ब्रिजची टोल आकारणी शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद झाली. या ब्रिजचा बांधकाम खर्च ३३ कोटी ३० लाख आयआरबी बिल्डर्स आणि जोईर व्हेंचर अमेय डेव्हलपर्स यांनी केला होता. ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ या बीओटी तत्त्वावर गेली १५ वर्षे या ब्रिजच्या टोल आकारणीतून जून २०१५ पर्यंत १२१ कोटी १७ लाख ४० हजारांची टोलवसुली करण्यात आली आहे. जुलै व आॅगस्ट महिन्यांत टोल आकारणी वसुलीच्या रकमेचा समावेश केल्यास हा आकडा १२५ कोटींच्या घरात जाण्यात शक्यता आहे. बांधकाम खर्चाच्या चौपटीपेक्षा जास्त रुपयांची झालेली करवसुली आयआरबीने केली आहे. टोलवसुलीची अंतिम तारीख संपण्यापूर्वीच आयआरबी बिल्डर्सने आपले सामान हलवाहलवी करण्यास सुरुवात केली आहे. या ब्रिजचे सर्व अधिकार एनएचआयचे प्रकल्प संचालक फेगडे व सहाय्यक प्रकल्प संचालक आगरखाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.खारपाडा टोलनाक्यावर खारपाडा गाव व परिसरातील अनेक कुटुंबे या ठिकाणी काकडी, टरबूज, कलिंगड व इतर फळांच्या काप करून प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये १० रुपये प्रति वाटा याप्रमाणे प्रवासी व वाहनचालकांना फळे विकून रोजीरोटी कमावित होते. नाक्यावर वाहने थांबणार नसल्याने याठिकाणचा फ्रूटसॅलेडचा धंदा बंद होणार आहे. गेली १५ वर्षे या ५० ते ६० कुटुंबांना या टोलनाक्याने चांगला रोजगार मिळत होता तो बंद होणार आहे त्यामुळे खारपाडा टोल बंद झाल्यावर या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांवर मोठा आघात होणार आहे. (वार्ताहर)वर्षनिहाय टोलवसुलीवर्षवसुली (लाखांत)१९९९ - २०००४१५.८१ २००० - २००१४१६.०० २००१ - २००२६७५.००२००२ - २००३६८१.०० २००३ - २००४६३९.०० २००४ - २००५६८४.०० २००५ - २००६९६०.०० २००६ - २००७८६७.८० २००७ - २००८७४९.३३ २००८ - २००९७०५.१५ २००९ - २०१०६७२.२२ २०१० - २०११७४१.५२ २०११ - २०१२७४८.४५ २०१२ - २०१३८५९.६५ २०१३ - २०१४८२२.३० २०१४ - २०१५८५३.१२ २०१५ - २०१६२२७.४० एकूण१२१,१७.८१ बीओटी तत्त्वावर गेली १५ वर्षे या ब्रिजच्या टोल आकारणीतून जून २०१५ पर्यंत १२१ कोटी १७ लाख ४० हजारांची टोलवसुली करण्यात आली आहे. स्थानिकांचा रोजगार बंद : खारपाडा टोलनाक्यावर काम करणाऱ्या ५० ते ६० स्थानिक रोजंदारी कामगारांची रोजीरोटी बंद होणार आहे. या कामगारांनी गेली पंधरा वर्षे आयआरबी बिल्डर्स कंपनीचा वसुलीचा आर्थिक व्यवहार सांभाळला. त्यांच्या पंधरा वर्षांच्या श्रमाचा प्रश्न व सर्व्हिस रकमेबाबत पेणचे आ. धैर्यशील पाटील यांनी ठेकेदार कंपनी व्यवस्थापनाशी सामंजस्य तडजोड करून निकाली काढला आहे.