शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
4
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
5
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
6
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
7
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
8
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
9
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
10
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
11
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
12
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
13
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
14
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
15
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
16
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
17
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
18
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
19
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
20
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
Daily Top 2Weekly Top 5

खांदेरी किल्ल्याचे होणार संरक्षित स्मारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 05:34 IST

रायगड जिल्ह्यातील खांदेरी बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७९ साली बांधलेल्या खांदेरी किल्ल्याचे ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून लवकरच घोषणा होणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना जारी झाली असून, ११ जूनपर्यंत कोणत्याही हरकती न आल्यास अंतिम अधिसूचनेचा प्रस्ताव सादर होणार असल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानने दिली.

मुंबई  -रायगड जिल्ह्यातील खांदेरी बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७९ साली बांधलेल्या खांदेरी किल्ल्याचे ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून लवकरच घोषणा होणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना जारी झाली असून, ११ जूनपर्यंत कोणत्याही हरकती न आल्यास अंतिम अधिसूचनेचा प्रस्ताव सादर होणार असल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानने दिली. तसे लेखी आश्वासन राज्य पुरातत्त्व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी प्रतिष्ठानला दिले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले.प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर म्हणाले, काहीच दिवसांपूर्वी खांदेरी किल्ल्यावरील गाडलेल्या तोफा प्रतिष्ठानने जमिनीवर काढल्या होत्या. मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने हे काम केले होते. त्या वेळी ‘लोकमत’ने किल्ल्याच्या दुर्दशेवर प्रकाश टाकला. किल्ल्यावरून सह्याद्री प्रतिष्ठानने दीड हजार दारूच्या बाटल्या गोळा केल्याचेही वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर किल्ल्याच्या संवर्धन, संरक्षणाची मागणी ‘लोकमत’ने लावून धरली होती. 

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या