शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी विकासाबरोबर राहावे

By admin | Updated: January 7, 2016 00:50 IST

कोकणातील प्रश्न तसेच येथील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या भागाचा विकास

अलिबाग : कोकणातील प्रश्न तसेच येथील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या भागाचा विकास होण्यासाठी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी नेहमी विकासाबरोबर राहिले पाहिजे, अशी अपेक्षा आमदार पंडित पाटील यांनी बुधवारी येथे बोलताना व्यक्त केली आहे. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या ना.ना.पाटील सभागृहात आयोजित पत्रकार दिन कार्यक्र मात आ. पाटील अध्यक्षपदावरुन बोलत होते.आ. पाटील पुढे म्हणाले, राज्याच्या उर्वरित भागापेक्षा कोकणातील शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत. हे प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधून कोकणाला न्याय मिळविणे आवश्यक आहे. पत्रकारांनी आपल्या भागाच्या विकासासाठी शासकीय निधी मिळाला पाहिजे यासाठी वस्तुनिष्ठ बातम्या देऊन आवाज उठविला पाहिजे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी असणारी उत्पन्न मर्यादा वाढविणे आवश्यक आहे. समाजाचे प्रश्न मांडत असताना पत्रकारांच्या स्वत:च्या अडचणी, प्रश्न दुर्लक्षित होतात. ते सोडविण्यासाठी पत्रकारांनी एकजुटीने प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले.ज्येष्ठ पत्रकार अभिजित राणे यांनी पत्रकार सामाजिक प्रश्नाला वाचा फोडत असताना त्यांचे मासिक वेतन तसेच इतर मूलभूत प्रश्न दुर्लक्षित केले जातात. हे प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकार संघांमार्फत एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. पत्रकारांचे प्रश्न सुटल्यास ते समाजाचे प्रश्न अधिक सक्षमपणे सोडवू शकतात असे प्रतिपादन केले.या कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अभिजित राणे, ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सावंत, पंचायत समितीचे उपसभापती अनिल गोमा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरणच्रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी राजा राजवाडे स्मृती पुरस्कार डॉ.पूर्वा प्रमोद अष्टपुत्रे (अंबरनाथ-ठाणे), कै.र.वा.दिघे पुरस्कार-सिध्दार्थ नवीन सोष्टे (नागोठणे), रायगड पत्रभूषण पुरस्कार दामोदर शहासने (कर्जत), स्व.म.ना.पाटील स्मृती पुरस्कार गुरु नाथ साठीलकर (खोपोली), रामनारायण युवा पत्रकार पुरस्कार-जितेंद्र जोशी (रोहा), संतोष चौकर (श्रीवर्धन), उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार जुगल दवे (रोहा) यांना प्रदान करण्यात आले.