शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

बदलत्या शिक्षणपद्धतीनुरूप शिक्षकांनी जागृत राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:54 IST

शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी, बहुजनांची मुले शिकली पाहिजेत, हा ध्यास घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली

अलिबाग : शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी, बहुजनांची मुले शिकली पाहिजेत, हा ध्यास घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. तोच वारसा घेऊन आज शिक्षक परिषद राज्यात काम करीत आहे. मात्र, शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा हळूहळू लोप पावत आहे. बदलत्या शिक्षण पद्धतीमुळे, बहुजनांना शिक्षणापासून दूर करण्याची व्यवस्था वेगात सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांनी जागृत राहून, हे प्रकार थांबविण्याची गरज आहे, असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले.महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने येथील पीएनपी नाट्यगृहात आयोजित राज्यव्यापी शिक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आ. पंडित पाटील, महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, उपाध्यक्ष मुरलीधर गोडबोले, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, बीडचे उपनगराध्यक्ष रजपुत इनामदार, प्राध्यापक संघटना जिल्हा अध्यक्ष प्रा. विनोद इंगेवाडा, प्राथमिक शिक्षक संघटना अध्यक्ष व्यंकटराव जाधव, माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष विकास चाभरीकर आदी मान्यवर उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले, महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेने राज्यात शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. जे समाजात चांगले काम करतात, त्यांना पुरस्कार देण्याची चांगली परंपरा परिषदेने सुरू केली आहे. खºया अर्थाने स्फूर्ती, प्रेरणा देण्याचे काम संस्थेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली संस्थेमार्फत केले जात आहे. जी चळवळ महात्मा ज्योतीराव फुलेंनी त्या वेळी सुरू केली. ती पुढे नेण्याची, वाढविण्याची आवश्यकता आहे. शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल अपेक्षित असून शेतकरी, कष्टकरी, बहुजनांची मुले शिकून समाजात टिकतील, त्यादृष्टीने, सामाजिक बांधिलकी म्हणून काम करा, असा सल्ला त्यांनी दिला.