शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

बदलत्या शिक्षणपद्धतीनुरूप शिक्षकांनी जागृत राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:54 IST

शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी, बहुजनांची मुले शिकली पाहिजेत, हा ध्यास घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली

अलिबाग : शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी, बहुजनांची मुले शिकली पाहिजेत, हा ध्यास घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. तोच वारसा घेऊन आज शिक्षक परिषद राज्यात काम करीत आहे. मात्र, शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा हळूहळू लोप पावत आहे. बदलत्या शिक्षण पद्धतीमुळे, बहुजनांना शिक्षणापासून दूर करण्याची व्यवस्था वेगात सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांनी जागृत राहून, हे प्रकार थांबविण्याची गरज आहे, असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले.महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने येथील पीएनपी नाट्यगृहात आयोजित राज्यव्यापी शिक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आ. पंडित पाटील, महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, उपाध्यक्ष मुरलीधर गोडबोले, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, बीडचे उपनगराध्यक्ष रजपुत इनामदार, प्राध्यापक संघटना जिल्हा अध्यक्ष प्रा. विनोद इंगेवाडा, प्राथमिक शिक्षक संघटना अध्यक्ष व्यंकटराव जाधव, माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष विकास चाभरीकर आदी मान्यवर उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले, महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेने राज्यात शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. जे समाजात चांगले काम करतात, त्यांना पुरस्कार देण्याची चांगली परंपरा परिषदेने सुरू केली आहे. खºया अर्थाने स्फूर्ती, प्रेरणा देण्याचे काम संस्थेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली संस्थेमार्फत केले जात आहे. जी चळवळ महात्मा ज्योतीराव फुलेंनी त्या वेळी सुरू केली. ती पुढे नेण्याची, वाढविण्याची आवश्यकता आहे. शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल अपेक्षित असून शेतकरी, कष्टकरी, बहुजनांची मुले शिकून समाजात टिकतील, त्यादृष्टीने, सामाजिक बांधिलकी म्हणून काम करा, असा सल्ला त्यांनी दिला.