शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कर्जत तालुक्यात ‘कातकरी उत्थान’ कार्यक्र माला सुरु वात, कर्जत तहसीलदारांचा आॅन दि स्पॉट निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 02:31 IST

शासनाने आदिम जमात असलेल्या कातकरी समाजाच्या उत्थानासाठी कार्यक्र म हाती घेतला आहे. त्याचा भाग म्हणून सरकारी अधिकारी कातकरी वाडीमध्ये पोहोचत आहेत.

कर्जत : शासनाने आदिम जमात असलेल्या कातकरी समाजाच्या उत्थानासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचा भाग म्हणून सरकारी अधिकारी कातकरी वाडीमध्ये पोहोचत आहेत. सरकारी अधिकारी आपली कोणत्याही कागदावर सही घेतात आणि भलते-सलते घडते, या भीतीने लांब उभे राहून मजा बघणारे कातकरी लोक आणि त्यामुळे काही वेळ परेशान झालेले कर्जतचे तहसीलदार. मात्र, त्यांची खरी अडचण समजून तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी जागच्या जागी निर्णय घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले. यामुळे कातकरी लोक जवळ येऊ लागले.नांगुर्ले कातकरीवाडी ही कर्जत-खोपोली रस्त्यावर असून, काहीशी दुर्गम भागात असलेली ही वाडी पळसदरी ग्रामपंचायतमध्ये येते. काहीसे मागासपण असलेल्या या कातकरीवाडीतील लोकांच्या अनेक समस्या आजही प्रलंबित आहेत. तरीदेखील येथील कातकरी समाजाला सरकारच्या भूमिकेवर विश्वास नाही. त्याचे एक कारण म्हणजे, येथील कातकरी लोकांना प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी झगडावे लागले आहे. आता राज्य सरकार कातकरी समाजाच्या उत्थानासाठी सरसावले असून, या आदिम जमातीच्या उत्थानासाठी खुद्द राज्यपालांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी राबविण्यात येत असलेल्या कातकरी उत्थान कार्यक्र माला येथील लोकांचे सहकार्य मिळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे २४ आॅगस्ट रोजी गणेश उत्सवाची तयारी करीत असलेल्या आदिवासी कातकरी लोकांना सुखद धक्का तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी दिला. ते स्वत: पावसामुळे वाडीत जाणारी पायवाट निसरडी झालेली असताना देखील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या लवाजमा घेऊन पोहोचले. या वाडीत यापूर्वीपासून कातकरी समाजाच्या उत्थानासाठी काम करीत असलेले दिशा केंद्र या संघटनेचे कार्यकर्ते सोबत होते. त्यांनी कातकरी समूहाचा बेसलाइन सर्व्हे सुरू केला. मात्र, नांगुर्ले कातकरीवाडीत काही लोक सर्व्हे करण्यासाठी जात असलेल्या कर्मचाºयांना जवळ करीत नव्हते, तर काही कोणतीही माहिती सांगत नव्हते. त्यामुळे काहीसे परेशान झालेल्या तहसील कार्यालयातील कर्मचाºयांनी तेथील समाजमंदिरात बसलेल्या तहसीलदारांना त्याची माहिती दिली. तहसीलदार कोष्टी हे प्रत्येक घरात जाऊन त्यांना कातकरी उत्थान कार्यक्र माचे महत्त्व पटवून देत होते. तुम्ही सांगितले तर सरकारला वाडीत रस्ता नाही, वीज नाही, शाळा नाही, अंगणवाडी नाही, रेशन कार्डवर नावे नाहीत, रेशनवर पुरेसे धान्य मिळत नाही, याची माहिती मिळेल. तरीदेखील कातकरी लोकांची रेशन कार्डसंबंधी होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन आपण एक दिवसाचा कॅम्प लावून वाडीतच रेशन कार्ड देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.