शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

कर्जत तालुक्यात ‘कातकरी उत्थान’ कार्यक्र माला सुरु वात, कर्जत तहसीलदारांचा आॅन दि स्पॉट निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 02:31 IST

शासनाने आदिम जमात असलेल्या कातकरी समाजाच्या उत्थानासाठी कार्यक्र म हाती घेतला आहे. त्याचा भाग म्हणून सरकारी अधिकारी कातकरी वाडीमध्ये पोहोचत आहेत.

कर्जत : शासनाने आदिम जमात असलेल्या कातकरी समाजाच्या उत्थानासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचा भाग म्हणून सरकारी अधिकारी कातकरी वाडीमध्ये पोहोचत आहेत. सरकारी अधिकारी आपली कोणत्याही कागदावर सही घेतात आणि भलते-सलते घडते, या भीतीने लांब उभे राहून मजा बघणारे कातकरी लोक आणि त्यामुळे काही वेळ परेशान झालेले कर्जतचे तहसीलदार. मात्र, त्यांची खरी अडचण समजून तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी जागच्या जागी निर्णय घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले. यामुळे कातकरी लोक जवळ येऊ लागले.नांगुर्ले कातकरीवाडी ही कर्जत-खोपोली रस्त्यावर असून, काहीशी दुर्गम भागात असलेली ही वाडी पळसदरी ग्रामपंचायतमध्ये येते. काहीसे मागासपण असलेल्या या कातकरीवाडीतील लोकांच्या अनेक समस्या आजही प्रलंबित आहेत. तरीदेखील येथील कातकरी समाजाला सरकारच्या भूमिकेवर विश्वास नाही. त्याचे एक कारण म्हणजे, येथील कातकरी लोकांना प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी झगडावे लागले आहे. आता राज्य सरकार कातकरी समाजाच्या उत्थानासाठी सरसावले असून, या आदिम जमातीच्या उत्थानासाठी खुद्द राज्यपालांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी राबविण्यात येत असलेल्या कातकरी उत्थान कार्यक्र माला येथील लोकांचे सहकार्य मिळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे २४ आॅगस्ट रोजी गणेश उत्सवाची तयारी करीत असलेल्या आदिवासी कातकरी लोकांना सुखद धक्का तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी दिला. ते स्वत: पावसामुळे वाडीत जाणारी पायवाट निसरडी झालेली असताना देखील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या लवाजमा घेऊन पोहोचले. या वाडीत यापूर्वीपासून कातकरी समाजाच्या उत्थानासाठी काम करीत असलेले दिशा केंद्र या संघटनेचे कार्यकर्ते सोबत होते. त्यांनी कातकरी समूहाचा बेसलाइन सर्व्हे सुरू केला. मात्र, नांगुर्ले कातकरीवाडीत काही लोक सर्व्हे करण्यासाठी जात असलेल्या कर्मचाºयांना जवळ करीत नव्हते, तर काही कोणतीही माहिती सांगत नव्हते. त्यामुळे काहीसे परेशान झालेल्या तहसील कार्यालयातील कर्मचाºयांनी तेथील समाजमंदिरात बसलेल्या तहसीलदारांना त्याची माहिती दिली. तहसीलदार कोष्टी हे प्रत्येक घरात जाऊन त्यांना कातकरी उत्थान कार्यक्र माचे महत्त्व पटवून देत होते. तुम्ही सांगितले तर सरकारला वाडीत रस्ता नाही, वीज नाही, शाळा नाही, अंगणवाडी नाही, रेशन कार्डवर नावे नाहीत, रेशनवर पुरेसे धान्य मिळत नाही, याची माहिती मिळेल. तरीदेखील कातकरी लोकांची रेशन कार्डसंबंधी होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन आपण एक दिवसाचा कॅम्प लावून वाडीतच रेशन कार्ड देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.