शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतचा पर्यटन व्यवसाय धोक्यात

By admin | Updated: July 25, 2016 03:02 IST

गेल्या सहा-सात वर्षांत कर्जत तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांना प्रसिद्धी मिळाली आहे. शिवाय पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत तेथील स्थानिकांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त झाले आहे

कांता हाबळे,  नेरळगेल्या सहा-सात वर्षांत कर्जत तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांना प्रसिद्धी मिळाली आहे. शिवाय पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत तेथील स्थानिकांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त झाले आहे. मुंबई-पुण्याहून अगदी काही तासांच्या अंतरावर असलेल्या नेरळ, भिवपुरी रोड, कर्जत व खोपोली या रेल्वे स्थानकांवर पर्यटनासाठी आलेल्या मुंबईकरांची असलेली तुफान गर्दी हे चित्र स्पष्ट करते. मात्र कर्जत तालुक्यातील पर्यटनस्थळांवर शासनाने जमावबंदी लागू केल्याने या अलोट गर्दीला ओहोटी लागली आहे.पावसाला सुरुवात झाली की कर्जत परिसराला जणू हिरवेगार शालू परिधान केलेलं रूप प्राप्त होतं. आल्हाददायक व थंडगार वातावरण निर्माण होऊन डोंगरातून झरे वाहायला सुरुवात होते. आता मोबाइल कॅमेऱ्यातही उत्तम दर्जाचे छायाचित्रण करणे शक्य असल्याने एखाद्या ठिकाणची छायाचित्रं काही क्षणांत सोशल नेटवर्किं गवर सेल्फीच्या स्वरूपात अपलोड होतात व तितक्याच लाइक्स अन् पोस्ट शेअर केल्या जातात व पर्यटकांचे एकदा तरी जाऊ या, म्हणत प्लॅन्स ठरले जातात. याआधी माथेरान या थंड हवेच्या ठिकाणासाठी प्रसिद्ध असलेला कर्जत तालुका पावसाळी पर्यटनासाठी ओळखला जाऊ लागला. तो येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या डोंगरकपारीतील फेसाळत वाहणाऱ्या धबधब्यांमुळे वीकेंडला येणाऱ्यांची भलतीच गर्दी होते. यामुळे येथील आषाणे-कोषाणे, कोंदीवडे, खांडसमार्गे भीमाशंकर घाटमाथा ट्रेकिंग, नेरळ येथील टपालवाडी, बेकरे येथील धबधब्यांची पावसाळी पर्यटनस्थळांच्या यादीत नोंद झाली. सोलनपाडा हे नेरळपासून अर्ध्या तासाच्या अंतरावरील धरण असून, त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाले. या धरणावर पर्यटकांची अलोट गर्दी होऊ लागली. या जमाव बंदीचा सर्वात जास्त परिणाम येथील हॉटेल व्यवसायावर झाला आहे. पर्यटकांचा ओघ कमी झाल्याने ऐन हंगामात हा व्यवसाय थंडावल्याचे चित्र आहे.नेरळ, कशेळे, कर्जत येथील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहावयास मिळतो. सोलनपाडा तसेच इतर धरणांवर गर्दी कमी झाल्याने मद्य विक्र ीवर देखील परिणाम झाला आहे. येथील खासगी वाहतूक करणाऱ्या चालकांना याचा खूप फायदा होत होता. पावसाळ्याच्या तीन -चार महिन्यांत चांगले उत्पन्न मिळत असल्याचे सांगतात, मात्र या बंदीचा परिणाम व्यवसायावर झाल्याचे या चालकांनी सांगितले. नेरळ व कशेळे येथून पर्यटनस्थळी पोचवणारे खासगी वाहनचालक नाखूश आहेत. खासगी भाडे मारून दिवसागणिक २,५०० ते ३,००० एवढी कमाई होत होती. मात्र पर्यटकांनी पाठ फिरवल्याने १,००० रु पये कमवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.