शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

कर्जतचा पर्यटन व्यवसाय धोक्यात

By admin | Updated: July 25, 2016 03:02 IST

गेल्या सहा-सात वर्षांत कर्जत तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांना प्रसिद्धी मिळाली आहे. शिवाय पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत तेथील स्थानिकांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त झाले आहे

कांता हाबळे,  नेरळगेल्या सहा-सात वर्षांत कर्जत तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांना प्रसिद्धी मिळाली आहे. शिवाय पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत तेथील स्थानिकांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त झाले आहे. मुंबई-पुण्याहून अगदी काही तासांच्या अंतरावर असलेल्या नेरळ, भिवपुरी रोड, कर्जत व खोपोली या रेल्वे स्थानकांवर पर्यटनासाठी आलेल्या मुंबईकरांची असलेली तुफान गर्दी हे चित्र स्पष्ट करते. मात्र कर्जत तालुक्यातील पर्यटनस्थळांवर शासनाने जमावबंदी लागू केल्याने या अलोट गर्दीला ओहोटी लागली आहे.पावसाला सुरुवात झाली की कर्जत परिसराला जणू हिरवेगार शालू परिधान केलेलं रूप प्राप्त होतं. आल्हाददायक व थंडगार वातावरण निर्माण होऊन डोंगरातून झरे वाहायला सुरुवात होते. आता मोबाइल कॅमेऱ्यातही उत्तम दर्जाचे छायाचित्रण करणे शक्य असल्याने एखाद्या ठिकाणची छायाचित्रं काही क्षणांत सोशल नेटवर्किं गवर सेल्फीच्या स्वरूपात अपलोड होतात व तितक्याच लाइक्स अन् पोस्ट शेअर केल्या जातात व पर्यटकांचे एकदा तरी जाऊ या, म्हणत प्लॅन्स ठरले जातात. याआधी माथेरान या थंड हवेच्या ठिकाणासाठी प्रसिद्ध असलेला कर्जत तालुका पावसाळी पर्यटनासाठी ओळखला जाऊ लागला. तो येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या डोंगरकपारीतील फेसाळत वाहणाऱ्या धबधब्यांमुळे वीकेंडला येणाऱ्यांची भलतीच गर्दी होते. यामुळे येथील आषाणे-कोषाणे, कोंदीवडे, खांडसमार्गे भीमाशंकर घाटमाथा ट्रेकिंग, नेरळ येथील टपालवाडी, बेकरे येथील धबधब्यांची पावसाळी पर्यटनस्थळांच्या यादीत नोंद झाली. सोलनपाडा हे नेरळपासून अर्ध्या तासाच्या अंतरावरील धरण असून, त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाले. या धरणावर पर्यटकांची अलोट गर्दी होऊ लागली. या जमाव बंदीचा सर्वात जास्त परिणाम येथील हॉटेल व्यवसायावर झाला आहे. पर्यटकांचा ओघ कमी झाल्याने ऐन हंगामात हा व्यवसाय थंडावल्याचे चित्र आहे.नेरळ, कशेळे, कर्जत येथील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहावयास मिळतो. सोलनपाडा तसेच इतर धरणांवर गर्दी कमी झाल्याने मद्य विक्र ीवर देखील परिणाम झाला आहे. येथील खासगी वाहतूक करणाऱ्या चालकांना याचा खूप फायदा होत होता. पावसाळ्याच्या तीन -चार महिन्यांत चांगले उत्पन्न मिळत असल्याचे सांगतात, मात्र या बंदीचा परिणाम व्यवसायावर झाल्याचे या चालकांनी सांगितले. नेरळ व कशेळे येथून पर्यटनस्थळी पोचवणारे खासगी वाहनचालक नाखूश आहेत. खासगी भाडे मारून दिवसागणिक २,५०० ते ३,००० एवढी कमाई होत होती. मात्र पर्यटकांनी पाठ फिरवल्याने १,००० रु पये कमवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.