शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कर्जत-मुरबाड राज्यमार्ग धोकादायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 02:56 IST

नेरळ : कर्जत-मुरबाड राज्यमार्ग तालुक्यातील प्रमुख मार्ग म्हणून ओळखला जातो. काहीच महिन्यांपूर्वी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजुरी मिळाली आहे.

कांता हाबळेनेरळ : कर्जत-मुरबाड राज्यमार्ग तालुक्यातील प्रमुख मार्ग म्हणून ओळखला जातो. काहीच महिन्यांपूर्वी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजुरी मिळाली आहे. तीनच वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. याअंतर्गत अनेक ठिकाणी मो-यांचे कामदेखील करण्यात आले; परंतु संबंधित ठेकेदाराकडून हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने कशेळे गावाजवळील मोरीचा एक भाग खालच्या बाजूने खचला आहे. या मार्गावर अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मोरी खचून मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कर्जत तालुक्यातून अनेक महत्त्वाचे रस्ते जातात. त्यातील एक म्हणजे कर्जत-मुरबाड राज्यमार्ग हा होय. या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या काही ठिकाणच्या मोºया कमकुवत झाल्या आहेत. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे. कर्जत-मुरबाड हा राज्यमार्ग असून, या रस्त्यावर रोज हजारोंच्या संख्येने लहान-मोठी वाहने धावत असून, यामध्ये अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा रस्ता एक बाजूला चौककडे मुंबई-पुणे, तर दुसरीकडे कल्याण-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गांना जोडला असल्याने नेहमीच येथे वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. तसेच रस्त्यात कडाव, कशेळे मोठी लोकसंख्या आणि बाजारहाटी गावे असून, येथील नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. तसेच पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधून मुरबाड औद्योगिक वसाहतीकडे जाणाºया कंटेनर यांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. त्यामुळे नेहमीच हा रस्ता गजबजलेला असतो. कर्जत-मुरबाड रस्त्यावरील अनेक ठिकाणच्या मोºया कमकुवत झालेल्या आहेत. कशेळे गावच्या हद्दीतील वाकड्या पुलाजवळील मोरीला खालच्या बाजूने भले मोठे भगदाड पडले असून, सुरक्षा कठडाही संपूर्णपणे कोसळला आहे; परंतु संबंधित सार्वजनिक बांधकाम सुस्त झोपल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.