शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

कर्जत-कल्याण राज्यमार्गाची खड्ड्यांमुळे चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:21 IST

६१ कोटींच्या रस्त्यावरील डांबर निखळले : स्थानिकांसह प्रवासी त्रस्त; काम निकृ ष्ट झाल्याचा आरोप

कांता हाबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील कर्जत तालुका हद्दीमधील २१ किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी ६१ कोटी कामाला मंजुरी दिली आहे. त्या कामातील मे २०१९ मध्ये डांबरीकरण पूर्ण केलेली आंबिवली केबिन ते ठाणे जिल्हा हद्दीतील रस्त्यावर डांबर पावसाच्या पाण्यासोबत निघू लागले आहे. त्याच वेळी ६१ कोटींच्या कामाची मुदत आॅक्टोबर २०१९ मध्ये संपत असताना रस्त्यावर ११ किलोमीटरच्या भागात कोणत्याही प्रकारचे काम ठेकेदार कंपनीने सुरू केले नाही. दरम्यान, पुन्हा एकदा वाहनचालकांना कर्जत-कल्याण रस्त्यावर खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे.

कर्जत-कल्याण हा रस्ता दुपदरी असून या रस्त्यावर कर्जत तालुका हद्दीत अत्यंत खराब झालेल्या रस्त्याचे काम करण्याच्या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली. शासनाने त्याआधी रस्त्याचे काम करण्यासाठी ६१ कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी दिली होती. मात्र, ठेकेदार कंपनी काम सुरू करीत नव्हती. शासनाने २१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी कामाचा ठेका दिलेल्या ठेकेदार कंपनीने फेब्रुवारी २०१९ मध्ये नेरळ भागात डांबरीकरण करण्यास सुरुवात केली. या रस्त्यावरील आंबिवली केबिनपासून नेरळ आणि पुढे शेलू येथील ठाणे जिल्हा हद्दीपर्यंत रस्त्यावर डांबरीकरण काम सुरू करून मे २०१९ मध्ये पूर्ण केले. त्या दहा किलोमीटर अंतरात तीन ठिकाणी वनविभागाच्याजमिनीमध्ये रस्त्याचे काम अपूर्ण ठेवून रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केले गेले. मात्र, कर्जतपर्यंतच्या ११ किलोमीटरच्या रस्त्याचे काम त्यानंतर सुरू होणे अपेक्षित असताना आजपर्यंत सुरू झाले नाही.

कर्जत ते ठाणे जिल्हा हद्द या २१ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी ६१ कोटी रुपयांची निविदा मंजूर करताना रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी आॅक्टोबर २०१९ पर्यंत मुदत ठेकेदार कंपनीला देण्यात आली होती. मात्र, या कालावधीत कर्जतपासून आंबिवली केबिन या ११ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला सुरुवातही करण्यात आली नाही. त्यात या ११ किलोमीटरच्या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून त्या खड्ड्यातून वाट काढताना वाहनचालकांची दमछाक होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाची मागणी सातत्याने होत होती; परंतु ठेकेदाराच्या मनात काय आहे? याची माहिती सर्वसामान्य वाहनचालकांना माहिती होत नसल्याने वाहनचालक खड्ड्यांतून प्रवास करीत आहेत. या भागातील रायगड हॉस्पिटल, वडवली, सावरगाव या ठिकाणी तर रस्त्याच्या सर्व भागात खड्डे दिसून येत आहेत.

दुसरीकडे मागील दोन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या दहा किलोमीटर रस्त्यावर टाकलेले डांबर आता निखळू लागले आहे. दामत, नेरळ भागात रस्त्यावर निखळलेले डांबर बाजूला करण्यासाठी या रस्त्याचे काम करणाऱ्या पी पी खारपाटील कंपनीचे कामगार हे रस्त्यावर पावसामुळे निघालेले डांबर बाजूला काढण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या रस्त्याचा दर्जा हाच का? असा प्रश्न सामान्य विचारू लागले आहेत. त्यामुळे काही दिवस बुळबुळीत रस्त्यावरून प्रवास किती फसवा होता, याचा अनुभव वाहनचालकांना येऊ लागला आहे. 

कर्जत-कल्याण रस्त्यावरील उर्वरित ११ किलोमीटरच्या रस्त्यावर काँक्रीटीकरणाचे काम मंजूर आहे. आंबिवली केबिनपासून कर्जत चार फाटा असा हा ११ किलोमीटरचा भाग दुपदरी काँक्रीटचा बनणार आहे. आम्ही कामे लवकर सुरू करावीत, असे पत्र कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.- सुरेश लाड, आमदार, कर्जतकर्जत-कल्याण रस्त्यावर २१ किलोमीटर काम हे शासनाने हायब्रीड योजनेमधून मंजूर केले आहे. ज्या योजनेत हे काम मंजूर आहे त्यानुसार त्या कामाची देखभाल पुढील दहा वर्षे करण्याचे नियम असून डांबर निघाले याबद्दल ठेकेदार कंपनी निर्णय घेईल.- अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागआम्ही आणखी किती वर्षे खड्डे असलेल्या रस्त्याने जायचे? रस्त्याचे काम मंजूर असतानाही करीत नसलेल्या ठेकेदार कंपनीविरुद्ध न्यायालयात जायला हवे. डिकसळ भागात पाच वर्षे असलेले खड्डे रस्त्याच्या कामासाठी ६१ कोटी मंजूर होऊनही रस्त्याची दुरवस्था कायम आहे.- किशोर गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते, डिकसळ