शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
4
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
5
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
6
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
8
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
12
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
13
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
14
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
15
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
16
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
17
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
18
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
19
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
20
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी

कळंब परिसरात वणव्यांचे प्रमाण वाढले

By admin | Updated: April 21, 2017 00:23 IST

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे. शेती कसण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने ओसाड पडलेली जमीन

नेरळ : दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे. शेती कसण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने ओसाड पडलेली जमीन, ओसाड माळराने यामुळे वणव्यांचे प्रकार अधिक वाढत असून यामुळे वनसंपत्तीचा आणि जमिनीतील उपयुक्त जीवांचा नाश होत आहे. पर्यायाने पर्यावरणाला मोठे नुकसान होत आहे. हे वणवे मानवनिर्मित असल्याने ग्रामपातळीवर वणवामुक्त मोहीम राबविणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाने पुढाकार घेऊन ग्रामपंचायतींना सहभागी करून लोकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. परंतु असे होताना दिसत नसल्याने याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड परिसरातील नागरिकांकडून होत आहे.तालुक्यातील अनेक डोंगर दऱ्यांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत व झाडेझुडपे वाढत असतात. गवत पेटविल्याने तेथे चांगले गवत उगवते अशी मानसिकता लोकांची आहे. त्यामुळे हे वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वनसंपत्ती, सांैदर्य नष्ट पावत आहे. या परिसरात स्थानिक लोकांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु काही जण जमीन न कसता, नोकरी करत असतात. त्यामुळे शेतीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे शेतीविषयक ज्ञान व जागृतीचा अभाव दिसतो.काही ठिकाणी ओसाड जमिनी आणि त्या ठिकाणी वाढलेले गवत, राब भाजवणी पद्धत यामुळे वणव्यांचे प्रमाण वाढत आहे. मार्च-एप्रिल-मे महिन्यात वणव्यांचे प्रमाण वाढते. संपूर्ण माळराने या वणव्यात बेचिराख होत असतात, छोटी मोठी झाडेही जळून जातात. काही अर्धवट जळतात, ती झाडे वृक्षतोड करणाऱ्यांकडून लक्ष्य केली जातात. त्यामुळे अशा वणव्यांमुळे व वृक्षतोडीमुळे नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होत असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची सर्वांत मोठी हानी करणाऱ्या या वणव्यांमुळे अनेक आंब्याची, काजूची आदी झाडे नष्ट होत आहे. त्यामुळे लहान मुलांसारखी जतन केलेली झाडे नष्ट होतात. वनविभागाने प्रबोधन केल्यास वणव्याचे दुष्परिणाम लोकांच्या निदर्शनात आणून दिल्यास वणवा मुक्तीची मोहीम सफल होईल.परंतु जीवसृष्टीच्या रक्षणासाठी लोकजागृती, स्थानिक मंडळे, कार्यकर्ते व वन विभाग प्रशासन यांनी प्रबोधन मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे. वणवा लावणाऱ्यांसाठी ग्रामपंचायतीमध्ये कठोर शिक्षेची तरतूद करून कार्यवाही केली पाहिजे, असे तज्ज्ञ मंडळींचे मत आहे. (वार्ताहर)