शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
3
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
4
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
5
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
6
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
7
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
8
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
9
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
10
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
11
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
12
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
13
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
14
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
15
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
16
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
17
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
18
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
19
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही

कळंब परिसरात वणव्यांचे प्रमाण वाढले

By admin | Updated: April 21, 2017 00:23 IST

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे. शेती कसण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने ओसाड पडलेली जमीन

नेरळ : दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे. शेती कसण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने ओसाड पडलेली जमीन, ओसाड माळराने यामुळे वणव्यांचे प्रकार अधिक वाढत असून यामुळे वनसंपत्तीचा आणि जमिनीतील उपयुक्त जीवांचा नाश होत आहे. पर्यायाने पर्यावरणाला मोठे नुकसान होत आहे. हे वणवे मानवनिर्मित असल्याने ग्रामपातळीवर वणवामुक्त मोहीम राबविणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाने पुढाकार घेऊन ग्रामपंचायतींना सहभागी करून लोकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. परंतु असे होताना दिसत नसल्याने याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड परिसरातील नागरिकांकडून होत आहे.तालुक्यातील अनेक डोंगर दऱ्यांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत व झाडेझुडपे वाढत असतात. गवत पेटविल्याने तेथे चांगले गवत उगवते अशी मानसिकता लोकांची आहे. त्यामुळे हे वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वनसंपत्ती, सांैदर्य नष्ट पावत आहे. या परिसरात स्थानिक लोकांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु काही जण जमीन न कसता, नोकरी करत असतात. त्यामुळे शेतीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे शेतीविषयक ज्ञान व जागृतीचा अभाव दिसतो.काही ठिकाणी ओसाड जमिनी आणि त्या ठिकाणी वाढलेले गवत, राब भाजवणी पद्धत यामुळे वणव्यांचे प्रमाण वाढत आहे. मार्च-एप्रिल-मे महिन्यात वणव्यांचे प्रमाण वाढते. संपूर्ण माळराने या वणव्यात बेचिराख होत असतात, छोटी मोठी झाडेही जळून जातात. काही अर्धवट जळतात, ती झाडे वृक्षतोड करणाऱ्यांकडून लक्ष्य केली जातात. त्यामुळे अशा वणव्यांमुळे व वृक्षतोडीमुळे नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होत असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची सर्वांत मोठी हानी करणाऱ्या या वणव्यांमुळे अनेक आंब्याची, काजूची आदी झाडे नष्ट होत आहे. त्यामुळे लहान मुलांसारखी जतन केलेली झाडे नष्ट होतात. वनविभागाने प्रबोधन केल्यास वणव्याचे दुष्परिणाम लोकांच्या निदर्शनात आणून दिल्यास वणवा मुक्तीची मोहीम सफल होईल.परंतु जीवसृष्टीच्या रक्षणासाठी लोकजागृती, स्थानिक मंडळे, कार्यकर्ते व वन विभाग प्रशासन यांनी प्रबोधन मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे. वणवा लावणाऱ्यांसाठी ग्रामपंचायतीमध्ये कठोर शिक्षेची तरतूद करून कार्यवाही केली पाहिजे, असे तज्ज्ञ मंडळींचे मत आहे. (वार्ताहर)