शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक स्टडी रिपोर्ट
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
6
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
7
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
8
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
9
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
10
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
11
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
12
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
13
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
14
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
15
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
16
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
17
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
18
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
19
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
20
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

कळंब परिसरात वणव्यांचे प्रमाण वाढले

By admin | Updated: April 21, 2017 00:23 IST

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे. शेती कसण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने ओसाड पडलेली जमीन

नेरळ : दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे. शेती कसण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने ओसाड पडलेली जमीन, ओसाड माळराने यामुळे वणव्यांचे प्रकार अधिक वाढत असून यामुळे वनसंपत्तीचा आणि जमिनीतील उपयुक्त जीवांचा नाश होत आहे. पर्यायाने पर्यावरणाला मोठे नुकसान होत आहे. हे वणवे मानवनिर्मित असल्याने ग्रामपातळीवर वणवामुक्त मोहीम राबविणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाने पुढाकार घेऊन ग्रामपंचायतींना सहभागी करून लोकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. परंतु असे होताना दिसत नसल्याने याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड परिसरातील नागरिकांकडून होत आहे.तालुक्यातील अनेक डोंगर दऱ्यांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत व झाडेझुडपे वाढत असतात. गवत पेटविल्याने तेथे चांगले गवत उगवते अशी मानसिकता लोकांची आहे. त्यामुळे हे वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वनसंपत्ती, सांैदर्य नष्ट पावत आहे. या परिसरात स्थानिक लोकांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु काही जण जमीन न कसता, नोकरी करत असतात. त्यामुळे शेतीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे शेतीविषयक ज्ञान व जागृतीचा अभाव दिसतो.काही ठिकाणी ओसाड जमिनी आणि त्या ठिकाणी वाढलेले गवत, राब भाजवणी पद्धत यामुळे वणव्यांचे प्रमाण वाढत आहे. मार्च-एप्रिल-मे महिन्यात वणव्यांचे प्रमाण वाढते. संपूर्ण माळराने या वणव्यात बेचिराख होत असतात, छोटी मोठी झाडेही जळून जातात. काही अर्धवट जळतात, ती झाडे वृक्षतोड करणाऱ्यांकडून लक्ष्य केली जातात. त्यामुळे अशा वणव्यांमुळे व वृक्षतोडीमुळे नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होत असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची सर्वांत मोठी हानी करणाऱ्या या वणव्यांमुळे अनेक आंब्याची, काजूची आदी झाडे नष्ट होत आहे. त्यामुळे लहान मुलांसारखी जतन केलेली झाडे नष्ट होतात. वनविभागाने प्रबोधन केल्यास वणव्याचे दुष्परिणाम लोकांच्या निदर्शनात आणून दिल्यास वणवा मुक्तीची मोहीम सफल होईल.परंतु जीवसृष्टीच्या रक्षणासाठी लोकजागृती, स्थानिक मंडळे, कार्यकर्ते व वन विभाग प्रशासन यांनी प्रबोधन मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे. वणवा लावणाऱ्यांसाठी ग्रामपंचायतीमध्ये कठोर शिक्षेची तरतूद करून कार्यवाही केली पाहिजे, असे तज्ज्ञ मंडळींचे मत आहे. (वार्ताहर)